शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जिल्ह्यात ६६४ विहिरी अधिग्रहणाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 9:26 PM

जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती निवारण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक आराखडाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायतींनी सादर केला आहे. या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे.

ठळक मुद्देप्रश्न पाणीटंचाईचा : भूजल सर्वेक्षणला मुबलक जलस्त्रोतांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती निवारण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक आराखडाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायतींनी सादर केला आहे. या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासोबतच मुबलक पाण्याचे स्त्रोत असणाऱ्या ठिकाणाचा शोधही भूजल सर्वेक्षण विभाग घेत आहे.यावर्षी जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार आहे. त्यावर मात करण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. यामध्ये कळंब तालुक्यात ९३, दारव्हा ३५, यवतमाळ ६४, नेर १७, पांढरकवडा २३, बाभूळगाव ३३, दिग्रस ४३, वणी ६, उमरखेड ५४, आर्णी ८१, घाटंजी ३५, मारेगाव १४, पुसद ४४, राळेगाव ५, महागाव १०३, झरी १६ आणि वणी तालुक्यातील ८ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे.या विहिरींवरून पाणीटंचाईग्रस्त भागात पाणी पोहचविण्यासाठी ८९ टँकरची मदत घेतली जाणार आहे. त्यामध्ये कळंब ६, दारव्हा ५, यवतमाळ १२, बाभूळगाव ४, वणी २, नेर ५, उमरखेड २, महागाव २, आर्णी ११, पुसद १८, घाटंजी ४, मारेगाव १, पांढरकवडा २, दिग्रस ९, झरी ६ टँकरची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने टँकरचे नियोजनही जिल्हा परिषदेने केले आहे. गरज भासताच हे टँकर सुरू केले जाणार आहेत. यंदा पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने तगड्या उपाययोजना आखल्या आहे. मात्र खालची यंत्रणा गावपातळीवर अंमलबजावणी कशी करते यावरच सारे अवलंबून आहे.सहा गावात भीषण स्थितीजिल्ह्यात ८९ टँकर प्रस्तावित आहेत. असे असले तरी अत्यंत भीषण स्थिती असलेल्या सहा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बाभूळगाव तालुक्यातील फत्तेपूर, नेरमधील खरडपूर, दारव्हा तालुक्यातील भांडेगाव, पुसद तालुक्यातील बाळवाडी, पाळोदी आणि मारवाडी अशा सहा ठिकाणी सध्या टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गतवर्षी १०८ टँकरने पाणीपुरवठापाणीटंचाई निवारण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यात १०८ टँकर सुरू करण्यात आले होते. यावर्षी पाणीटंचाई निवारण्यासाठी ८९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत १९ टँक र कमी लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई