शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या 'कर्जमुक्ती' साठी योजनेच्या निकषात बदल करावे; देवानंद पवार यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 19:10 IST

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे.

यवतमाळ: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेतून कोणतेही शेतकरी वंचित राहू नये. यासाठी प्रसंगी कर्जमाफी योजनेच्या निकषांमध्ये बदल करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात काढलेला शासन निर्णय बघितल्यास अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. योजनेतील काही निकष शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत. याबाबत शेतकरीवर्गात नाराजी आहे हि बाब महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निदर्शनास आणून दिली .

नानाभाऊ पटोले यांनी या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषांमध्ये बदल करावे अशा सूचना दिल्या.ज्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे राज्य शासनाने दुष्काळी स्थितीमुळे पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठित केले आहे अशा शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा, ज्या शेतकऱ्यांचे नाव या पूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपलोड झाले आहे मात्र त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांचा या योजनेत समावेश झाला पाहिजे त्यांचाही या योजनेत समावेश करावा अशी मागणी देवानंद पवार यांनी केली. ज्या शेतकऱ्यांकडे २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मात्र त्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आली. 

तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरीप २०१५ साली जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी गावातील शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या सूत्रानुसार आर्थिक अनुदान अजूनही देण्यात आलेले नाही. उलट तत्कालीन भाजप सरकारने उच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याची बाब महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी उपस्थित केली. यानुसार त्या शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त मदत देण्याबाबत लगेच पावले उचलण्याच्या सूचना नानाभाऊ पटोले यांनी दिल्या. राज्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेतून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न करावे असे आवाहन नानाभाऊ पटोले यांनी यावेळी केले.

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारYavatmalयवतमाळ