शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या 'कर्जमुक्ती' साठी योजनेच्या निकषात बदल करावे; देवानंद पवार यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 19:10 IST

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे.

यवतमाळ: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेतून कोणतेही शेतकरी वंचित राहू नये. यासाठी प्रसंगी कर्जमाफी योजनेच्या निकषांमध्ये बदल करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात काढलेला शासन निर्णय बघितल्यास अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. योजनेतील काही निकष शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत. याबाबत शेतकरीवर्गात नाराजी आहे हि बाब महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निदर्शनास आणून दिली .

नानाभाऊ पटोले यांनी या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषांमध्ये बदल करावे अशा सूचना दिल्या.ज्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे राज्य शासनाने दुष्काळी स्थितीमुळे पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठित केले आहे अशा शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा, ज्या शेतकऱ्यांचे नाव या पूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपलोड झाले आहे मात्र त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांचा या योजनेत समावेश झाला पाहिजे त्यांचाही या योजनेत समावेश करावा अशी मागणी देवानंद पवार यांनी केली. ज्या शेतकऱ्यांकडे २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मात्र त्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आली. 

तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरीप २०१५ साली जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी गावातील शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या सूत्रानुसार आर्थिक अनुदान अजूनही देण्यात आलेले नाही. उलट तत्कालीन भाजप सरकारने उच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याची बाब महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी उपस्थित केली. यानुसार त्या शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त मदत देण्याबाबत लगेच पावले उचलण्याच्या सूचना नानाभाऊ पटोले यांनी दिल्या. राज्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेतून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न करावे असे आवाहन नानाभाऊ पटोले यांनी यावेळी केले.

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारYavatmalयवतमाळ