शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शेतकऱ्यांच्या 'कर्जमुक्ती' साठी योजनेच्या निकषात बदल करावे; देवानंद पवार यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 19:10 IST

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे.

यवतमाळ: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेतून कोणतेही शेतकरी वंचित राहू नये. यासाठी प्रसंगी कर्जमाफी योजनेच्या निकषांमध्ये बदल करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात काढलेला शासन निर्णय बघितल्यास अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. योजनेतील काही निकष शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत. याबाबत शेतकरीवर्गात नाराजी आहे हि बाब महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निदर्शनास आणून दिली .

नानाभाऊ पटोले यांनी या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषांमध्ये बदल करावे अशा सूचना दिल्या.ज्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे राज्य शासनाने दुष्काळी स्थितीमुळे पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठित केले आहे अशा शेतकऱ्यांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा, ज्या शेतकऱ्यांचे नाव या पूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अपलोड झाले आहे मात्र त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांचा या योजनेत समावेश झाला पाहिजे त्यांचाही या योजनेत समावेश करावा अशी मागणी देवानंद पवार यांनी केली. ज्या शेतकऱ्यांकडे २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मात्र त्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी विनंती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आली. 

तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरीप २०१५ साली जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी गावातील शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या सूत्रानुसार आर्थिक अनुदान अजूनही देण्यात आलेले नाही. उलट तत्कालीन भाजप सरकारने उच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याची बाब महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी उपस्थित केली. यानुसार त्या शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त मदत देण्याबाबत लगेच पावले उचलण्याच्या सूचना नानाभाऊ पटोले यांनी दिल्या. राज्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी योजनेतून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न करावे असे आवाहन नानाभाऊ पटोले यांनी यावेळी केले.

टॅग्स :Farmerशेतकरीcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारYavatmalयवतमाळ