शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

यवतमाळच्या बेंबळामध्ये लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 1:13 PM

बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून कळंब तालुक्यात शेकडो लीटर पाणी वाया जात आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट कामाचा परिणाम लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचीही झाली घोर निराशा

गजानन अक्कलवार।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून कळंब तालुक्यात शेकडो लीटर पाणी वाया जात आहे.यावर्षी प्रथमच बहुतेक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेकडो परिसरातील कपाशीच्या संपूर्ण पिकांची वाताहत झाली. खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर आता पाण्याअभावी रबी हंगामालाही शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची वेळ आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील माटेगाव, परसोडी, सावरगाव, दहेगाव, चिंचोली, उमरी, बोरजई आदी भागातील नाल्यावाटे बेंबळाच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. अतिशय निकृष्ट कामामुळे शेतापर्यंत पाणीच पोहचत नाही. वितरीकेची स्थिती अतिशय नाजुक आहे. दरवर्षी शेतात पाणी घुसून नुकसान होण्याचे प्रमाण मोठे आहे. आता तर लाखो गॅलन लिटर पाणी नदी-नाल्यावाटे वाहून जात आहे. एकप्रकारे नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली. यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरूध्द कारवाई, होणे अपेक्षित आहे, नागरिकांची तशी मागणीही आहे. एका तपापासूनचे शेतकऱ्यांचे स्वप्न असणाऱ्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी अजुनही शेतापर्यंत पोहचलेच नाही.यापूर्वी अनेकदा कालव्याद्वारे पाणी वाटपाची चाचपणी घेण्यात आली़ चाचणीनंतर प्रकल्पाच्या कामाचे पार पितळ उघडे पडले़ अक्षम्य तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचे स्वप्न धुळीस मिळते की काय? अशी स्थिती आहे़ त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची या प्रकल्पामुळे घोर निराशा झाली आहे़ परिणामी बेंबळा कालव्याच्याच विरोधात यापूर्वी शेतकऱ्यांनी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आहे.दोषींवर कारवाईची मागणीचुकीचा सर्व्हेमुळे अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. दर्जाहीन कामांमुळे धरणाच्या बांधकामांना अनेक ठिकाणी तडे गेल्याचेही दिसून येते.बहुतांश ठिकाणी कालव्याचे पाणी खाली व शेत जमीन वर आहे़ अशा स्थितीत पाणी कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ यासंबधी अधिकाऱ्यांपुढे शेतकऱ्यांनी वेळोवेळी अडचणी मांडल्या़ परंतु कोणीही याकडे लक्ष दिलेले नाही.यावर्षी बेंबळा धरणही केवळ २८ टक्केच भरले. धरणातील काही पाणी पिण्यासाठी राखिव ठेवण्यात आले. असे असताना हजारो गॅलन लिटर पाणी निरर्थक वाहत जाणे ही बाब अक्षम्य आहे. त्यामुळे या प्रकाराला दोषी असणाऱ्यांविरुद्ध कारवाईची गरज आहे. यासंदर्भात बेंबळाचे उपअभियंता प्रशांत पिंगळे यांचेशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, सावरगाव परिसर माझ्याकडे नाही. नगराळे साहेबांकडे हा परिसर येतो. त्यांना या प्रकाराची माहिती देऊन दखल घेण्यास सांगतो.

टॅग्स :Waterपाणी