शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मन्याळीला २५ वर्षांपासून बसच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:44 PM

गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी व मन्याळी तांडा गावात एसटी बस सेवा बंद आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी फरपट सुरू आहे.

ठळक मुद्देशिक्षणाची फरपट : सावित्रीच्या लेकींची पायदळ वारी सुरूच

भास्कर देवकते ।लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी व मन्याळी तांडा गावात एसटी बस सेवा बंद आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी फरपट सुरू आहे.मन्याळी ते बिटरगाव हे चार किलोमीटरचे अंतर आहे. मात्र शासनाने अद्याप गावात बस सुरू केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांना शाळेला चक्क बुटी मारावी लागते. गावात पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बिटरगावला जावे लागते. मात्र बसअभावी त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.बिटरगावला बारावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी थेट उमरखेडलाच जावे लागते. त्यासाठी पुन्हा मन्याळी ते बिटरगाव हे चार किलोमिटरचे अंतर पायदळच तुडवावे लागत आहे.राज्य शासनाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळेत ये-जा करण्यासाठी राज्यभर मुलींसाठी एसटी महामंडळाने बसची व्यवस्था सुरू केली. मात्र गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी येथील सावित्रीच्या लेकी पायदळच शाळेत जात आहे. पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या किमान १०० विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कसरत करावी लागत आहे. सावित्रीच्या लेकींचा हा वनवास कधी संपणार, असा प्रश्न आहे.मानव विकास मिशन नावालाचमानव विकास मिशन केवळ नावालाच उरले आहे. या मिशनअंतर्गत एसटी बस नसल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड, मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. चार किलोमीटरचा पायदळ प्रवास केल्याने त्यांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होतो. मात्र कोणताही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. मुलींसाठी किमान मानव विकास मिशनची एसटी बस सेवा तातडीने सुरू करावी, अशी पालकांची मागणी आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ