शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

‘मजिप्रा’चा ना एसएमएस, ना फोन, विचारणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:17 IST

पाणी समस्येवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल. त्यात पाणी सोडल्या जाणाऱ्या नगराचे नाव आणि वेळ कळविण्यात येईल, असा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना बैठकीत दिला होता.

ठळक मुद्दे४० दिवसांपासून पाणी नाही : पालकमंत्र्यांच्या शब्दाला खो

रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणी समस्येवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल. त्यात पाणी सोडल्या जाणाऱ्या नगराचे नाव आणि वेळ कळविण्यात येईल, असा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना बैठकीत दिला होता. प्रत्यक्षात बैठक संपल्यानंतर हा कार्यक्रमही गारद झाला. काही भागात सतत चार दिवस नळ येत आहेत अन् काही भागात ४० दिवस पाणीच नाही, अशी बेभरवशाची स्थिती आहे.यवतमाळ शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असणाऱ्या प्रकल्पातला पाणीसाठा संपला आहे. फ्लोटिंग पंपच्या माध्यमातून पाण्याचा उपसा सुरू आहे. संकलित पाणी टाक्यामध्ये भरून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. कुठल्या भागात कधी पाणी सोडायचे, याचे वेळापत्रक प्राधिकरणाकडे आहे. हे वेळापत्रक नगरसेवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेतला होता. त्याची ‘अपडेट’ माहिती नगरसेवकांना दिली जाईल, अशी कबुली प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या समक्ष दिली होती.प्रत्यक्षात बैठक संपल्यानंतर त्या दृष्टीने ग्रूप तयार झाला नाही. यामुळे कधी कुठल्या प्रभागात कुठल्या वेळी नळ येणार याची माहिती नगरसेवकांना मिळत नाही. यामुळे सर्वसामान्यांपर्यंत ती माहिती पोहोचत नाही. यातून प्रत्येक भागात स्फोटक स्थिती निर्माण झाली. पाण्यासाठी मोर्चे निघत आहे. या भागातील नागरिकांना पाणी कधी मिळेल, याचे आश्वासनही देता येत नाही. यामुळे नगरसेवकांप्रती रोष वाढत आहे.नागरिकांचे तारखांवर लक्षपालकमंत्र्यांसह काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यानी वारंवार अमूक तारखेपर्यंत पोहोचण्याची ग्वाही दिली होती. या तारखांकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. मात्र त्यापैकी काही तारखा उलटून गेल्या तर काही तारखा आठवडाभरावर येऊन ठेपल्यातरी शहरात पाणी पोहोचले नसल्याने नागरिकांत संताप आहे.पाणी वाटप कोलमडलेशहरात पाणी वाटपाचे वेळापत्रकच उरले नाही. जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात २० ते ४० दिवसात पाणी मिळत नाही. प्रत्येक भागात किती तास नळ ठेवायचे, याचेही वेळापत्रक नाही. यामुळे कुठे दिवसभर पाणी सुरू राहते. तर काही ठिकाणी दोन तासात नळ जातात. काही भागामध्ये सतत चार ते पाच दिवस नळ राहतात. तर त्याच्याच बाजूच्या नगरात ३० ते ४० दिवसांपासून पाणी नसते. असे का होते, याचे उत्तर प्राधिकरणाने अद्यापही स्पष्ट केले नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेत प्रचंड रोष आहे.