शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

परतीच्या पावसाने राज्यात साडेतीन हजार कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 7:37 PM

राज्यभरात परतीच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचा कहर सुरूच आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ५५ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे५५ लाख हेक्टरला फटकापंचनाम्यासाठी २१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज

रूपेश उत्त्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात परतीच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचा कहर सुरूच आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ५५ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. हे नुकसान साडेतीन हजार कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आयुक्तांनी वर्तविला आहे. पंचनामे करण्यासाठी २१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनी प्रतिनिधीकडे आले आहे. नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ७२ तासात विमाधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सतत कोसळणाºया पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जथ्थे तालुका कृषी कार्यालयात धडकत आहे. या शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.२१ लाख शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी आतापर्यंत अर्ज सादर केले आहेत. यामध्ये बागायतदार शेतकऱ्यांसोबतच, कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी यासह इतर पिकांच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल आला आहे.सर्वाधिक नुकसान द्राक्ष बागांचेकुठल्या पिकाचे किती नुकसान झाले, याची माहिती स्पष्ट झाल्यानंतर नुकसानीचा अंतिम अहवाल पुढे येणार आहे. ५४ लाख ८० हजार हेक्टरवर झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजात द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.राज्यात आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे. फळबागा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.- हरी बाबतीवाल, उपसंचालक, राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्ष, पुणे

टॅग्स :agricultureशेती