शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; एमआयडीसी आहे, पण उद्योगांचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 21:26 IST

स्थानिक पातळीवर पाण्याची समस्या भीषण असून दिग्रसमध्ये दहा दिवसाआड नळ येतात. कचरा आणि नाल्यांची समस्या कायमच आहे, अशी व्यथा दिग्रस येथील पूजा टोकसिया यांनी बस प्रवासादरम्यान व्यक्त केली. त्याचवेळी पुसद तालुक्यातील वरूड येथील दीपक इनामे म्हणाले, आमच्या गावात खासदार निधी पोहोचलाच नाही.

ठळक मुद्दे३ विधानसभा मार्ग । १०७ कि.मी. प्रवास । एसटीच्या डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

रस्ते, पाण्याची समस्या दुर्लक्षितप्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : स्थानिक पातळीवर पाण्याची समस्या भीषण असून दिग्रसमध्ये दहा दिवसाआड नळ येतात. कचरा आणि नाल्यांची समस्या कायमच आहे, अशी व्यथा दिग्रस येथील पूजा टोकसिया यांनी बस प्रवासादरम्यान व्यक्त केली. त्याचवेळी पुसद तालुक्यातील वरूड येथील दीपक इनामे म्हणाले, आमच्या गावात खासदार निधी पोहोचलाच नाही. मानोरा येथील भुवनेश्वरी मेहरे आणि दिलीप मेहरे यांनीही रस्ते आणि पाण्याची समस्या मांडली. सरकारने खताचे भाव वाढविले. मात्र कापसाला भाव दिला नाही. एमआयडीसी बंद असल्याने बेरोजगारी वाढल्याचे मोहा (ता.पुसद) येथील जयसिंग राठोड म्हणाले.विकासकामांवर भर आवश्यकमंगरुळपीर ते वाशिम39 कि.मी.लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लोकसभा निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढतच असून, ठिकठिकाणी मतदारांत विविध चर्चा झडत आहेत. अगदी रोजच्या प्रवासाची लालपरीही यातून सुटलेली नाही. मंगरुळपीर ते वाशिम या ४० किलोमीटर अंतराच्या प्रवासादरम्यान मतदार असलेल्या प्रवाशांत निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगली. विकासकामांवर अधिकाधिक भर देऊन ती वेगाने पूर्ण करावी, असे मत प्रवासी मतदारांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणुकीच्या चर्चा ठिकठिकाणी झडत आहेत. भावी उमेदवार कसा असावा, कोणी काय केले, कोणाची प्रतिमा कशी, कोण्या उमेदवाराचे पारडे जड, राजकीय पक्षांच्या खेळी आदि विषय ठिकठिकाणी चर्चिले जात असतानाच मतदारांच्या समस्याही चर्चिल्या जात आहेत. अगदी बसप्रवासातही निवडणुकीवर चर्चा झडत असल्याने वाशिम-मंगरुळपीर या ४० किलोमीटर अंतराच्या प्रवासात मतदारांच्या चर्चेचा कानोसा घेतला असता सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत अनेकांनी विविध मते उपस्थित केली.नैसर्गिक आपत्तींचा विचार महत्त्वाचा !कारंजा ते मानोरा38 कि.मी.लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजा-मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसह सामान्य जनताही गेल्या चार ते पाच वर्षांपासून विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत असून, शासन धोरणात नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासह त्यातून सावरण्यासाठी आवश्यक उपाय योजनांचा विचार महत्त्वाचा असल्याचे मत कारंजा-मानोरा या ३८ किलोमीटर अंतराच्या प्रवासादरम्यान मतदारांतून प्रकट झाल्याचे दिसले.निवडणुकीच्या पृष्ठभुमीवर मतदारांच्या ठिकठिकाणी होत असलेल्या चर्चांचा कल आणि भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात कारंजा-मानोरा या मार्गावरील बसप्रवासात नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान यावर अनेकांनी मत व्यक्त केले.