शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Lok Sabha Election 2019; एमआयडीसी आहे, पण उद्योगांचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 21:26 IST

स्थानिक पातळीवर पाण्याची समस्या भीषण असून दिग्रसमध्ये दहा दिवसाआड नळ येतात. कचरा आणि नाल्यांची समस्या कायमच आहे, अशी व्यथा दिग्रस येथील पूजा टोकसिया यांनी बस प्रवासादरम्यान व्यक्त केली. त्याचवेळी पुसद तालुक्यातील वरूड येथील दीपक इनामे म्हणाले, आमच्या गावात खासदार निधी पोहोचलाच नाही.

ठळक मुद्दे३ विधानसभा मार्ग । १०७ कि.मी. प्रवास । एसटीच्या डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

रस्ते, पाण्याची समस्या दुर्लक्षितप्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : स्थानिक पातळीवर पाण्याची समस्या भीषण असून दिग्रसमध्ये दहा दिवसाआड नळ येतात. कचरा आणि नाल्यांची समस्या कायमच आहे, अशी व्यथा दिग्रस येथील पूजा टोकसिया यांनी बस प्रवासादरम्यान व्यक्त केली. त्याचवेळी पुसद तालुक्यातील वरूड येथील दीपक इनामे म्हणाले, आमच्या गावात खासदार निधी पोहोचलाच नाही. मानोरा येथील भुवनेश्वरी मेहरे आणि दिलीप मेहरे यांनीही रस्ते आणि पाण्याची समस्या मांडली. सरकारने खताचे भाव वाढविले. मात्र कापसाला भाव दिला नाही. एमआयडीसी बंद असल्याने बेरोजगारी वाढल्याचे मोहा (ता.पुसद) येथील जयसिंग राठोड म्हणाले.विकासकामांवर भर आवश्यकमंगरुळपीर ते वाशिम39 कि.मी.लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लोकसभा निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढतच असून, ठिकठिकाणी मतदारांत विविध चर्चा झडत आहेत. अगदी रोजच्या प्रवासाची लालपरीही यातून सुटलेली नाही. मंगरुळपीर ते वाशिम या ४० किलोमीटर अंतराच्या प्रवासादरम्यान मतदार असलेल्या प्रवाशांत निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगली. विकासकामांवर अधिकाधिक भर देऊन ती वेगाने पूर्ण करावी, असे मत प्रवासी मतदारांनी व्यक्त केले.लोकसभा निवडणुकीच्या चर्चा ठिकठिकाणी झडत आहेत. भावी उमेदवार कसा असावा, कोणी काय केले, कोणाची प्रतिमा कशी, कोण्या उमेदवाराचे पारडे जड, राजकीय पक्षांच्या खेळी आदि विषय ठिकठिकाणी चर्चिले जात असतानाच मतदारांच्या समस्याही चर्चिल्या जात आहेत. अगदी बसप्रवासातही निवडणुकीवर चर्चा झडत असल्याने वाशिम-मंगरुळपीर या ४० किलोमीटर अंतराच्या प्रवासात मतदारांच्या चर्चेचा कानोसा घेतला असता सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत अनेकांनी विविध मते उपस्थित केली.नैसर्गिक आपत्तींचा विचार महत्त्वाचा !कारंजा ते मानोरा38 कि.मी.लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजा-मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसह सामान्य जनताही गेल्या चार ते पाच वर्षांपासून विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत असून, शासन धोरणात नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासह त्यातून सावरण्यासाठी आवश्यक उपाय योजनांचा विचार महत्त्वाचा असल्याचे मत कारंजा-मानोरा या ३८ किलोमीटर अंतराच्या प्रवासादरम्यान मतदारांतून प्रकट झाल्याचे दिसले.निवडणुकीच्या पृष्ठभुमीवर मतदारांच्या ठिकठिकाणी होत असलेल्या चर्चांचा कल आणि भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात कारंजा-मानोरा या मार्गावरील बसप्रवासात नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान यावर अनेकांनी मत व्यक्त केले.