शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

नेरमधील २२ गावांत पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 9:24 PM

पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचे विविध प्रकल्प राबविल्यानंतरही तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. तब्बल २२ गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी होरपळ होत आहे. सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळ योजनांच्या कामांमधील दोषामुळे पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देसात ठिकाणी टँकर : प्रशासनाच्या कृती आराखड्यात दहा लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठीचे विविध प्रकल्प राबविल्यानंतरही तालुक्याच्या अनेक गावातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. तब्बल २२ गावांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी होरपळ होत आहे. सात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नळ योजनांच्या कामांमधील दोषामुळे पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याचे सांगितले जाते.तालुका प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दहा लाख ४० हजारांचा कृती आराखडा मंजूर केला आहे. यातून टँकरने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण आदी उपायांना प्राधान्य दिले जाणार आहे. तालुक्याच्या काही गावात एप्रिलपासूनच पाण्यासाठी मारामार सुरू आहे. मे महिन्यात याची तीव्रता आणखी वाढली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपाच्या पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. २२ गावे पाणीटंचाईग्रस्त आहे. सात गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.खरडगाव, सातेफळ, आजंती, चिखली(कान्होबा), दहीफळ, जवळगाव, पेंढारा, मालखेड(खु), बोरगाव, घारेफळ, घुई, वाळकी, सावंगा, चिकणी(डोमगा), चिचगाव, झोंबाडी, पेंढारा, मालखेड(बु), सावरगाव(काळे), सोनखास, सोनवाढोणा, उत्तरवाढोणा आदी गावांमध्ये पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. टंचाईग्रस्त गावातील प्रश्न निकाली काढण्याच्यादृष्टीने प्रयत्न होत असल्याचे गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी सांगितले. नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.योजनांची कामे तकलादूतालुक्याच्या ग्रामीण भागात झालेली पाणीपुरवठा योजनांची कामे तकलादू आहेत. पाईपलाईन योग्यरित्या टाकली गेली नाही. निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे. जागोजागी फुटलेले पाईप दूषित पाणीपुरवठ्यासाठी कारणीभूत ठरत आहे. या व इतर कारणांमुळे पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.