शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

तेराव्या यादीवरच अडली कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:37 PM

कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यापूर्वी ग्रीन लिस्ट लावली जाते. ही यादी प्रसिद्ध करण्याची गती अतिशय मंद आहे. यामुळे आतापर्यंत केवळ १३ याद्या लागल्या. अजूनही या यादीमध्ये एक लाख शेतकºयांची नावे आलेली नाहीत.

ठळक मुद्देएक लाख शेतकरी प्रतीक्षेत : ‘आयटी’ विभागाचा संथ कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्यापूर्वी ग्रीन लिस्ट लावली जाते. ही यादी प्रसिद्ध करण्याची गती अतिशय मंद आहे. यामुळे आतापर्यंत केवळ १३ याद्या लागल्या. अजूनही या यादीमध्ये एक लाख शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत. यामुळे कर्ज न मिळालेल्या शेतकºयांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली. ही प्रक्रिया राबविताना आॅनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आॅनलाईन प्रक्रियेत नाव नोंदविताना अनेक अडचणी आल्या. सादर झालेल्या नावांमध्ये असंख्य त्रृटी असल्याची बाब मध्यंतरी पुढे आली. यावर दुरुस्ती करण्याचे काम मुंबईच्या आयटी विभागाकडे सोपविण्यात आले होते. या कालावधीत आयटी विभागाला आग लागली. तेव्हापासून ग्रीन लिस्ट प्रसिद्ध होण्याची गती मंदावली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयटी विभागाच्या प्रमुखांना त्या ठिकाणावरून हटविले. यानंतरही कामकाजाची गती वाढलेली नाही.यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया बँक स्तरावर अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ ग्रीन लिस्ट प्रसिद्ध झाल्या. यामध्ये एक लाख ९६ हजार ७७३ शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले. १२७६ कोटी त्यांच्या खात्यात वळते करण्यात आले. मात्र अद्यापही एक लाख शेतकऱ्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली नाहीत. यामध्ये नावांमध्ये त्रृटी असणे, आयएफएससी कोड चुकणे, खाते क्रमांक आणि ओटीएसचे प्रकरण याबाबींचा समावेश आहे. कर्जमाफीतील कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांनी थांबविली आहे. आता नव्याने ग्रीन लिस्ट लागण्याची प्रतीक्षा केली जात आहे.प्रत्यक्षात पेरणीचा हंगाम संपला. यामुळे नवीन ग्रीन लिस्ट लागली नाही, असे बोलले जाते. आता पुढील वर्षीच नावे येतील का, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. आधीच खासगी सावकारांकडून पेरणीसाठी तजवीज करणारे शेतकरी यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. दुष्काळाने त्यामध्ये भर घातली आहे.योजना दीड लाखाची, माफी ६९ हजारांचीच कशी?जिल्ह्यात बँकांनी कर्जमाफी योजना राबविताना काही चुकाही केल्या. याचा फटका शेतकºयांना बसला. दीड लाखापर्यंत कर्जमाफी असतानाही निम्मेच पैसे माफ करण्यात आले. आता अशा शेतकºयांना नव्याने कर्जही मिळाले नाही. हे शेतकरी बँकांच्या वारंवार येरझारा मारत आहेत. त्यांना प्रतीक्षा करा, असे सांगितले जात आहे. लाडखेड सेंट्रल बँकेतील विजय गुल्हाने या शेतकऱ्याने एक लाख १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांचे ६९ हजार रुपयांचेच कर्ज माफ झाले. यामुळे त्यांना नव्याने कर्जही मिळाले नाही. हा शेतकरी बँकेच्या येरझारा मारत आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील इतरही राष्ट्रीयीकृत बँकांत घडला आहे. यावर अद्यापही पर्याय निघालेला नाही. यामुळे अर्धवट कर्जमाफी झाल्याचा आरोप जिल्ह्यातील वंचित शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज