शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

"कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, OBC आरक्षणाला धोका"; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 14:14 IST

या आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यवतमाळ येथे आरक्षण बचाव यात्रेत उपस्थित होते.

Prakash Ambedkar ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. या आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यवतमाळ येथे आरक्षण बचाव यात्रेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, असं वक्तव्य केलं. 

मध्यप्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; भिंत कोसळून ८ मुलांचा मृत्यू, शिवलिंग बनवत होते

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. विधिमंडळात १९० कुणबी मराठा आमदार आहेत. यात फक्त ११ ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला १०० टक्के धोका आहे, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं. 

"कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मराठ्यांसोबत आहे, असं सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत नाही. म्हणून मी तुम्हाला सावध रहा असं सांगत आहे. ओबीसी आरक्षणाला धोका आहे.  येणाऱ्या निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

मी त्यांनी कधीच उत्तर दिले नाही:  मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील म्हणाले,  मी त्यांना कधी उत्तर दिलं नाही आणि देणारही नाही. मी गोर गरिबाच कल्याण होईल असं च पाऊल उचलले आहे, सगळ्या जाती धर्माला न्याय देणार, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

३ आमदारांच्या शिष्टमंडळाची जरांगे यांच्याशी तासभर चर्चा

१३ ऑगस्टपर्यंत शासनाने मागण्या मान्य कराव्यात. आम्ही राजकारणात जाणार नाहीत; परंतु मागण्यांवर योग्य विचार न झाल्यास समाजाच्या म्हणण्यानुसार आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

जरांगे यांचा ७ ऑगस्टपासून दौरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी बार्शीचे राजेंद्र राऊत, बदनापूरचे नारायण कुचे, तुळजापूरचे राणाजगजितसिंह पाटील या तीन आमदारांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली. या चर्चेनंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा काय असते हे निवडणुकीत कळेल. १३ ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. त्यामुळे त्यांनी वेळेत मागण्या मान्य कराव्यात. त्यातही आमची बैठक २९ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे २९ तारखेपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणे आमचे काम आहे. त्यानंतर मात्र समाज सांगेल तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील