शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

सावित्री-जिजाऊंचे घरोघरी उजळणार आकाशदिवे; आजपासून दहा दिवस विचारांची दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:10 IST

गावोगावी पोहोचताहेत महानायिकांच्या चित्रांचे दिवे; रांगोळींनी सजणार अंगण

अविनाश साबापुरे

यवतमाळ : महाराष्ट्राला ज्ञानाचा प्रकाश दाखविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहून ते साकार करणाऱ्या जिजाऊ माँसाहेब या दोन महानायिकांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रात दहा दिवस ज्ञानदिव्यांची दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी तरुणांनी चित्रमय आकाशदिवे साकारले असून या दिव्यांसाठी गावोगावी नोंदणी करण्यात आली आहे. घरोघरी हे आकाशकंदिल उजळणार असल्याने ३ ते १२ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात विचारांची दिवाळी अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्रातील काही तरुणांनी एकत्र येत ‘संविधान प्रचारक’ अशी चमू तयार केली आहे. या चमूमार्फत मागील वर्षीपासून महानायिकांच्या आकाशकंदिलाचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षी केवळ २०० आकाशकंदिल त्यांना पोहोचविता आले. परंतु, यंदा त्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी करून मोठ्या प्रमाणात हे कंदिल गावोगावी पोहोचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक तयार केले आहेत. त्या माध्यमातून आतापर्यंत काही हजारांपेक्षा अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. ३ जानेवारी, सावित्रीबाई फुले जयंती ते १२ जानेवारी जिजाऊ माॅसाहेब जयंतीपर्यंत हे दिवे घरोघरी लावून, रांगोळी काढून ‘सावित्र जिजाऊ’ उत्सव साजरा करण्याचे आवाहन या चमूने केले आहे.

- आकाशकंदिलांचे वैशिष्ट्य

संपूर्णपणे कागदी असलेल्या या आकाशकंदिलांवर दोन बाजूंनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ माॅसाहेबांची प्रतिमा आहे. तर उर्वरित दोन बाजूंवर फातिमा शेख, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, झलकारी बाई, इंदिरा गांधी या महानायिकांच्या प्रतिमा आहेत.

रोज सांगणार एका महानायिकेची गोष्ट

३ ते १२ जानेवारी या सप्ताहात सोशल मीडियाच्या माध्यमातून दरदिवशी गोष्टरूपात महानायिकांच्या कार्यजीवनाची कथा घराघरांत पोहोचविली जाणार आहे. सावित्रीबाई, जिजाऊ, फातिमा, अहिल्या, रमाई, ताराबाई, इंदिरा, झलकारी, मदर तेरेसा, अशा महानायिकांचे जीवनचरित्र कथाकथनाच्या उपक्रमातून पुढे आणणार असल्याचे संविधान प्रचारक चमूकडून सांगण्यात आले.

हा उत्सव कुटुंब स्तरापासून ते संस्थात्मक व सामाजिक स्तरावर साजरा होणार आहे. आपल्या महानायिकांचे विचार व कार्य घरोघरी पोहोचवणे हा यामागील उद्देश आहे. या उत्सवात कंदील, दिवे लावून, गोडधोड करून उत्साहाने महानायिकांचा उत्सव साजरा व्हावा. ही विचारांची दिवाळी आहे.

- देवीदास शंभरकर, उपक्रमाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक

टॅग्स :SocialसामाजिकSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेJijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तव