चाकू हल्ल्याचा वचपा; वणीत टोळक्याचा तरुणावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST2022-05-06T05:00:00+5:302022-05-06T05:00:24+5:30
हरिष उर्फ टिक्या संजय रायपुरे (१९) असे जखमी युवकाचे नाव असून तो दामले फैलातील रहिवासी आहे. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तो काही मित्रांसोबत येथील शेवाळकर परिसरातील एका कँटिनवर चहा पित असताना काही तरुण दुचाकीवर तेथे आले. त्या तरुणांनी हरिषसोबत वाद घातला. एवढेच नव्हे तर हातातील काठी, दगडांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, हल्ल्यानंतर तरुणांचे टोळके तेथून पसार झाले.

चाकू हल्ल्याचा वचपा; वणीत टोळक्याचा तरुणावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : चार महिन्यांपूर्वी झालेल्या चाकू हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तरुणांच्या एका टोळक्याने बुधवारी रात्री येथील शेवाळकर परिसरात एका तरुणावर काठ्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले. प्रकृती गंभीर बनल्याने त्याला तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. हरिष उर्फ टिक्या संजय रायपुरे (१९) असे जखमी युवकाचे नाव असून तो दामले फैलातील रहिवासी आहे. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तो काही मित्रांसोबत येथील शेवाळकर परिसरातील एका कँटिनवर चहा पित असताना काही तरुण दुचाकीवर तेथे आले. त्या तरुणांनी हरिषसोबत वाद घातला. एवढेच नव्हे तर हातातील काठी, दगडांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, हल्ल्यानंतर तरुणांचे टोळके तेथून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच, दामलेनगरमधील काही तरुण हरिषला घटनास्थळावरून उचलून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने गुरुवारी पहाटे ३ वाजता त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. हरिषच्या आईने याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चार तरुणांविरुद्ध भादंवि ३२४, ३४, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत.
जखमी तरुण चाकूहल्ल्यातील आरोपी
हल्ल्यात जखमी झालेला तरुण हा चार महिन्यांपूर्वी येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालयासमोर झालेल्या चाकू हल्ल्यातील आरोपी आहे. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर आला होता आणि बुधवारी रात्री त्याच्यावर हल्ला करण्यात आला. सूड भावनेतून हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे.