शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

यवतमाळातील शिवालयात मिळते केदारनाथ दर्शनाचे सुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:20 IST

भारतीय संस्कृतीमध्ये चार धाम दर्शनाला महत्व आहे. केदारनाथ हे सर्वाधिक प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. तेथे दर्शनाला हजारो भाविकांचे जथ्थे अवघड प्रवास करून जातात. याच मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचे काम हेमाद्री राजाने केले. केदारेश्वर मंदिराची निर्मिती झाली.

ठळक मुद्देमहाशिवरात्री विशेष : केदारेश्वर व कमलेश्वर मंदिराचा इतिहास

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतीय संस्कृतीमध्ये चार धाम दर्शनाला महत्व आहे. केदारनाथ हे सर्वाधिक प्राचिन तिर्थक्षेत्र आहे. तेथे दर्शनाला हजारो भाविकांचे जथ्थे अवघड प्रवास करून जातात. याच मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचे काम हेमाद्री राजाने केले. केदारेश्वर मंदिराची निर्मिती झाली. हजारो वर्षापूर्वीचा हा इतिहास आजही मंदिराच्या रूपात उभा आहे. प्राचिन शिल्पकेलचा वारसा सांगणारी अशी दोन मंदिरे यवतमाळ शहरात आहेत. यामध्ये आझाद मैदानालगतचे केदारेश्वर मंदिर आणि लोहारातील कमलेश्वर मंदिर यांचा समावेश आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला यवतमाळच्या भाविकांना केदारनाथ दर्शनाचे सुख आपल्या गावातच मिळणार आहे.काळ्या दगडांपासून बांधल्या गेलेली ही मंदिरे आजही दिमाखदारपणे उभी आहे. याला एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे. मंदिराची उभारणी करताना खास तंत्राचा वापर करण्यात आला. आतील भागात खांबांवर चिरेदार नक्षीकाम आहे. परिसरात विस्तीर्ण जलकुंड आहे. त्यामध्ये भुयारही आहे. या जलकुुंडाला मुबलक पाणी आहे. मंदिराच्या परिसरात शितला माता, नाग मंदिर, काल भैरव, मारूती, शनिमंदिर, अंबिका माता आणि काशिनाथ महाराजाचे मंदिर आहे.दोन घास भुकेल्यांनाडोंगरे महाराजांनी यवतमाळात कथा प्रवचन केले. यावेळी त्यांना मिळालेली देणगी बँक खात्यात जमा केली. त्याच्या व्याजावर धान्य घेऊन दररोज भिक्षेकऱ्यांना या ठिकाणी भोजन दिले जाते. अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष भोजनदान करण्यात येते. दररोज १५० व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. श्रावण, शिवरात्री, काशिकर महाराज पुण्यतिथी, गरुपौर्णिमा, हरिहर भेट, संक्रांत दीपमाला हे उपक्रम राबविण्यात येतात. देवस्थानाचे २१ विश्वस्त आहेत. अध्यक्ष ओमप्रकाश सिंघानिया आहेत. गंगाकिसन भूत आणि निरज बाजोरिया यांच्या मार्गदर्शनात कामकाज होत आहे. पुजारी राजीव गिरी यांच्या सात पिढ्या या ठिकाणी राबत आहेत.मंदिराच्या मालकीची १०० एकर जमीनदेवस्थानाच्या जागेवर दुकान उभारण्यात आले आहेत. इतकेच नव्हेतर १०० एकर शेतजमिनीची मालकीही मंदिराला मिळाली आहे. भोसा, पिंपळगाव आणि तळणी कुऱ्हा या भागात मंदिराची जमीन आहे.भाविकांच्या सोईकडे लक्ष देणार काय?सध्याच्या २१ विश्वस्तांपैकी दोन सदस्य पूर्ण क्षमतेने काम पाहतात. मात्र इतरांचे दुर्लक्ष झाले. यामुळे मंदिराच्या विकासकामांना ब्रेक लागल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले. या ठिकाणी प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. यामुळे भाविकांची गैरसोय होते. या उणीवांची दुरूस्ती व्हावी, असे मत भाविकांनी ‘लोकमत’कडे नोंदविले.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीkaleshwar Templeकाळेश्वर मंदिर