शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जळकाच्या कलावतीला राहुल गांधींच्या भेटीची आस; १२ वर्षांनंतर 'भारत जोडो'निमित्त पुन्हा योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 11:26 IST

१२ वर्षांपूर्वी राहुल गांधी पोहोचले होते थेट कलावतीच्या घरी

देवेंद्र पोल्हे

मारेगाव (यवतमाळ) : सन २००८ मध्ये राहुल गांधी विदर्भ दौऱ्यावर आले असता, त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कलावती बांदूरकर यांच्या चंद्रमौळी झोपडीला भेट देऊन आत्महत्येमागील परिस्थिती जाणून घेतली होती. आता भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कलावतीला त्यांच्या भेटीची आस लागली असून, मंगळवारी त्या वाशिम येथे १२ वर्षांनंतर राहुल गांधींंना भेटणार आहेत.

१२ वर्षांपूर्वी मारेगाव तालुक्यातील जळका येथे राहुल गांधी यांनी अचानक जाऊन कलावती बांदूरकर यांची भेट घेऊन सांत्वन केले होते तसेच त्यांच्या घरी चहाही घेतला होता. दिल्ली येथे परत गेल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेच्या सभागृहात कलावतीची व्यथाही मांडली होती. त्यामुळे कलावती बांदूरकर देशभरात प्रकाशझोतात आल्या होत्या. या घटनेमुळे त्यांना मोठी आर्थिक मदत मिळून त्यांचे जीवन बदलून गेले होते.

कलावती यांचे पती परशुराम बांदूरकर यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सन २००५ मध्ये शेतात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या मागे पत्नी कलावती, सात मुली व दोन मुले असा आप्तपरिवार होता. अशातच सन २००८ मध्ये राहुल गांधी यांनी कलावती यांच्या घरी अचानक भेट दिली. या भेटीनंतर कलावतीची एकूण परिस्थिती लक्षात सुलभ इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेचे डॉ. बिनदेश्वर पाठक यांनी कलावतीच्या घरी येऊन तिला ३६ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यामुळे कलावतीचे जीवन बदलून गेले होते. आता राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याने ज्यांच्यामुळे आपल्याला जगण्याचा नवा मार्ग मिळाला, त्या राहुल गांधींची भेट घेण्याची इच्छा वृद्धापकाळाने थकलेल्या कलावतीने व्यक्त केली होती.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश धानोरकर यांनी कलावतीच्या भावना लक्षात घेऊन राहुल गांधी यांच्यासोबत कलावतींची भेट घालून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर कलावतीला घेऊन सोमवारी दुपारी वाशिमकडे रवाना झाल्या. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता वाशिम येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या कॉर्नर सभेत ही भेट घडवून आणली जाणार आहे.

राहुल गांधी पंतप्रधान व्हावे

आता देशाला राहुल गांधींसारख्या नेत्याची गरज आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या देशात सर्वधर्मीय आनंदाने या देशात नांदू शकतील म्हणून राहुल गांधी एकदा देशाचे पंतप्रधान बनावे, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.

संकटांची मालिका तरीही कलावतीचा लढा

राहुल गांधींच्या भेटीने आर्थिक स्थैर्य लाभलेल्या कलावती बांदूरकर यांच्यावर मात्र संकटांची मालिका सुरूच आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा एक बी.ई. असलेला मुलगा अपघातात मृत्युमुखी पडला, तर वेगवेगळ्या कारणांनी दोन मुलींचाही मृत्यू झाला. मात्र तरीही त्या मोठ्या हिमतीने कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा