शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बंडखोरी भाजपमध्ये, डोकेदुखी शिवसेनेला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 07:36 IST

भाजपची बंडखोरी। तार्इंपुढे आव्हान, कुणबी मतांचे विभाजन, बंजारा समाज एकवटतोय

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना यांच्यात थेट सामना आहे. शिवसेनेला मात्र भाजपच्या बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहे. याच वेळी या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये आपल्या समाजाची मते विभागली जाणार आहे. या मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात आहे. शिवसेनेच्या भावनाताई गवळी पाचव्यांदा रिंगणात आहेत. तर माणिकराव ठाकरे १५ वर्षानंतर पुढच्या दाराने निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस त्यांना नवा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करीत आहे. मात्र माणिकरावांनी जिल्ह्याच्या राजकारणात गटबाजीला खतपाणी घातले, पक्ष वाढविला नाही, जिल्ह्याला काहीच दिले नाही असा आरोपही होत आहे.

सलग चार टर्म झाल्यामुळे भावना गवळी यांच्या विरोधात वातावरण आहे. त्यांच्या नावाला सुरुवातीपासूनच विरोध झाला. भाजपच नव्हे तर सेनेतील नेत्यांनीही हा विरोध रेटला. खुद्द मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली. आजही युतीतील प्रमुख नेते भावनातार्इंच्या विरोधात आहेत. त्यामुळे तार्इंना त्यांची मनधरणी करावी लागत आहे. ही नाराज नेते मंडळी भाजपचे बंडखोर पी.बी. आडे यांना ताकद देत आहे. बंजारा समाजाच्या मतांवर या बंडखोराची मदार आहे. मात्र या अपक्षाची बंडखोरी शिवसेनेसाठी अधिक नुकसानकारक ठरणारी आहे. काँग्रेस व शिवसेनेने एकाच समाजाचे दोन उमेदवार दिल्याने मतांचे विभाजन निश्चित आहे. आतापर्यंत तार्इंसोबत दिसणारा कुणबी समाज या वेळी पर्यायाचा विचार करतो आहे. दीर्घ अनुभवी राजकारणी व चार टर्मच्या खासदार असा दिग्गजांचा सामना येथे रंगतो आहे. माणिकरावांपुढेही पक्षांतर्गत गटबाजी थोपविण्याचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादीतीलही एक गट माणिकरावांच्या विरोधात आहे. काँग्रेसची मदार परंपरागत मतदारांवर आहे. तर शिवसेनेला हिंदुत्व व मोदींना मानणाऱ्या मतदारांची मोठी मदत होणार आहे. या मतदारसंघात भाजपच्या बंडखोराला समाज बांधवांची मोठी ताकद मिळाल्यास काँग्रेसचा सामना या बंडखोरासोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वंचित आघाडीचा उमेदवार बंजारा समाजाची मते खेचू शकतो. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांना वार्षिक ७२ हजार रुपये देण्याची केलेली घोषणा नागरिकांना मनापासून आवडली आहे. त्याच वेळी मोदी व भाजपा सरकारची केवळ आश्वासने आता जनतेने चांगलीच ओळखली आहे. त्यामुळे मतदार यावेळी भाजपाला नाकारुन काँग्रेसला पसंती देईल.- माणिकराव ठाकरे, काँग्रेसमी २० वर्षे खासदार असली तरी माझ्याविरोधात कोणताही फॅक्टर नाही. केंद्राचा विकास निधी मोठ्या प्रमाणात आणण्यावर माझा भर राहिला आहे. रेल्वे प्रकल्पांवर माझा सर्वाधिक जोर राहिला. माझा हा विकासच मला या निवडणुकीत पाचव्यांदा निवडून आणण्यास महत्वपूर्ण ठरणार आहे.- भावना गवळी, शिवसेना

टॅग्स :yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकManikrao Thackreyमाणिकराव ठाकरे