शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वणीत सोयाबीन पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:23 AM

सध्या सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस यासाठी पोषक ठरला आहे.

कृषी विभाग अनभिज्ञ : शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची भीतीलोकमत न्यूज नेटवर्कवणी : सध्या सोयाबीन पीक बहुतांश भागात वाढीच्या अवस्थेत असून दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस यासाठी पोषक ठरला आहे. मात्र सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचे आक्रमण वाढले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.वणी तालुक्यात कपाशीसह सोयाबीन हे पीक प्रमुख पीक आहे. जुन महिन्यात लागवड झालेले पीक यावर्षी अनियमीत पावसामुळे व अळीच्या प्रादूर्भावामुळे प्रभावित झाले आहे. काही भागात जुनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेली पेरणी साधली. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत, तर काही ठिकाणी फुलोऱ्यावर येत आहे. अशा महत्त्वाच्या काळात सोयाबीनवर अळीचा प्रदूर्भाव वाढू लागला आहे. ढगाळ वातावरण राहत असल्याने या अळीला पोषक वातावरण मिळत आहे. ही उंट अळी हिरव्या रंगाची असून ती पानाचा हिरवा भाग फस्त करते. अळ्यांचा प्रादूर्भाव वाढत असल्याने अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या झाडावरील पानांची चाळणी झालेली दिसून येते. पानांची चाळणी झालेल्या झाडांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन पिकांची वाढ खुंटली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी स्वअनुभवावर किटकनाशकांचा वापर करीत आहे. मात्र कृषी विभागाकडून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही.दरवर्षी कृषी विभागामार्फत कोणती किटकनाशके फवारायची, याबाबत जनजागृती केली जायची. मात्र यावर्षी या अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला असतानाही कृषी विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तालुक्यातील गावागावात कृषी सहाय्यक भेटी देत असतात. मात्र त्यांनाही ही बाब लक्षात न येणे, हे न सजण्यासारखे कोडे आहे. काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकांशी संपर्क साधला, तर संपर्क होत नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शन व कोणते किटकनाशक फवारावे, याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.