शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२७९ गावांत उघड्यावर करावे लागते अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 18:03 IST

Yavatmal : स्मशानशेडच्या बांधकामासाठी जागाही मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना जिल्ह्यातील २७९ गावांत स्मशानभूमी शेड नाही. अंत्यसंस्कारासाठी जागाही मिळत नाही. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार कुठे करावा, असा प्रश्न नातेवाइकांसमोर उभा राहतो. स्मशानभूमीअभावी २७९ गावातील लोकांना मरणाची भीती वाटते. धार्मिक रितिरीवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार नसेल होत तर मोक्ष कसा मिळणार, हादेखील एक प्रश्नच आहे.

जिल्ह्यात १ हजार ८३१ महसुली गावे आहेत. एकूण ग्रामपंचायतींची संख्या १ हजार २०० आहे. ७०७ स्वतंत्र ग्रामपंचायती असून, ४९३ गट ग्रामपंचायती आहेत. यात २७९ गावांत स्मशानभूमी शेड नाही. घाटंजी, महागाव, मारेगाव, उमरखेड, वणी आणि झरीजामणी या तालुक्यांतील गावात स्मशानभूमी शेडचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात हातात छत्री पकडून अंतिम संस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर येते. जनसुविधा योजनेच्या निधीतून स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यात येते. काही गावांत जागेची अडचण आहे. तर, वनविभागाच्या हद्दीत असलेली जागा मिळत नाही. यामुळे स्मशानभूमी शेड बांधकामाला अडथळा येत असल्याचे सांगितले जाते. अडचण सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोणत्या तालुक्यात किती गावांत नाही स्मशानभूमी? तालुका                               स्मशानभूमी नसलेली गावे आर्णी                                              १६बाभूळगाव                                      ०९दारव्हा                                            १४दिग्रस                                              १०घाटंजी                                             २९कळंब                                             ०७केळापूर                                           १२महागाव                                           २६मारेगाव                                           १९नेर                                                  १२पुसद                                               १४राळेगाव                                          १३उमरखेड                                         १९वणी                                                ३२यवतमाळ                                       ०९झरी                                                ३८

२७९ उपलब्ध नाही गावांत स्मशानभूमीच■ जिल्ह्यातील २७९ गावात स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नातेवाइकांना उन्हाळा व पावसाळ्ळ्यात त्रासाचा सामना करावा लागतो. झरी तालुक्यातील तब्बल ३८ गावांत स्मशानभूमीचा अभाव आहे.■ सोबतच घाटंजी, महागाव, मारेगाव, उमरखेड, वणी आदी तालुक्यातही स्मशानभूमी शेडचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी जोर धरत आहे.

मरणानंतरही भोग संपेनामृत्यू हे अंतिम सत्य आहे. जन्माला आलेल्या माणसाला मृत्यू हे ठरलेलाच आहे. जीवन जगताना माणसाला संघर्ष करावा लागतो, मात्र, स्मशानभूमी नसलेल्या गावात मरणानंतरही भोग संपत नाही.

पावसाळ्यात आणखी हालस्मशानभूमी नसलेल्या गावात अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर सुरू चिखलातून अंतिमयात्रा काढावी लागते. पाऊस असल्यास हातात छत्री पकडून अंत्यसंस्कार करावे लागते. पावसामुळे अनेकदा मृतदेह जळून खाक होत नाही. अशाप्रकारचे हाल पावसाळ्यात सहन करावे लागतात.

जनसुविधेतून होणार ८६ कामेजिल्हा परिषदेला २०२३-२४ या वर्षासाठी जनसुविधा योजनेचा निधी मिळाला आहे. या निधीतून ८६ स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यात येणार आहे. यातील बहुतांश कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतरही अनेक गावांत स्मशानभूमी शेडचा प्रश्न कायमच राहणार आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ