शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

२७९ गावांत उघड्यावर करावे लागते अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 18:03 IST

Yavatmal : स्मशानशेडच्या बांधकामासाठी जागाही मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना जिल्ह्यातील २७९ गावांत स्मशानभूमी शेड नाही. अंत्यसंस्कारासाठी जागाही मिळत नाही. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार कुठे करावा, असा प्रश्न नातेवाइकांसमोर उभा राहतो. स्मशानभूमीअभावी २७९ गावातील लोकांना मरणाची भीती वाटते. धार्मिक रितिरीवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार नसेल होत तर मोक्ष कसा मिळणार, हादेखील एक प्रश्नच आहे.

जिल्ह्यात १ हजार ८३१ महसुली गावे आहेत. एकूण ग्रामपंचायतींची संख्या १ हजार २०० आहे. ७०७ स्वतंत्र ग्रामपंचायती असून, ४९३ गट ग्रामपंचायती आहेत. यात २७९ गावांत स्मशानभूमी शेड नाही. घाटंजी, महागाव, मारेगाव, उमरखेड, वणी आणि झरीजामणी या तालुक्यांतील गावात स्मशानभूमी शेडचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात हातात छत्री पकडून अंतिम संस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर येते. जनसुविधा योजनेच्या निधीतून स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यात येते. काही गावांत जागेची अडचण आहे. तर, वनविभागाच्या हद्दीत असलेली जागा मिळत नाही. यामुळे स्मशानभूमी शेड बांधकामाला अडथळा येत असल्याचे सांगितले जाते. अडचण सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोणत्या तालुक्यात किती गावांत नाही स्मशानभूमी? तालुका                               स्मशानभूमी नसलेली गावे आर्णी                                              १६बाभूळगाव                                      ०९दारव्हा                                            १४दिग्रस                                              १०घाटंजी                                             २९कळंब                                             ०७केळापूर                                           १२महागाव                                           २६मारेगाव                                           १९नेर                                                  १२पुसद                                               १४राळेगाव                                          १३उमरखेड                                         १९वणी                                                ३२यवतमाळ                                       ०९झरी                                                ३८

२७९ उपलब्ध नाही गावांत स्मशानभूमीच■ जिल्ह्यातील २७९ गावात स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नातेवाइकांना उन्हाळा व पावसाळ्ळ्यात त्रासाचा सामना करावा लागतो. झरी तालुक्यातील तब्बल ३८ गावांत स्मशानभूमीचा अभाव आहे.■ सोबतच घाटंजी, महागाव, मारेगाव, उमरखेड, वणी आदी तालुक्यातही स्मशानभूमी शेडचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही समस्या निकाली काढण्याची मागणी जोर धरत आहे.

मरणानंतरही भोग संपेनामृत्यू हे अंतिम सत्य आहे. जन्माला आलेल्या माणसाला मृत्यू हे ठरलेलाच आहे. जीवन जगताना माणसाला संघर्ष करावा लागतो, मात्र, स्मशानभूमी नसलेल्या गावात मरणानंतरही भोग संपत नाही.

पावसाळ्यात आणखी हालस्मशानभूमी नसलेल्या गावात अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर सुरू चिखलातून अंतिमयात्रा काढावी लागते. पाऊस असल्यास हातात छत्री पकडून अंत्यसंस्कार करावे लागते. पावसामुळे अनेकदा मृतदेह जळून खाक होत नाही. अशाप्रकारचे हाल पावसाळ्यात सहन करावे लागतात.

जनसुविधेतून होणार ८६ कामेजिल्हा परिषदेला २०२३-२४ या वर्षासाठी जनसुविधा योजनेचा निधी मिळाला आहे. या निधीतून ८६ स्मशानभूमी शेडचे बांधकाम करण्यात येणार आहे. यातील बहुतांश कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतरही अनेक गावांत स्मशानभूमी शेडचा प्रश्न कायमच राहणार आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ