शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दिक्कते तो बहुत है, बताऊ तो क्या ?

By admin | Updated: February 10, 2017 01:50 IST

साहब, तुमहीच देखो जिधर उधर किचड है, नाली मे सुअर बैठै है. गंदगी से परेशान है, स्कूल के बाजू में ही नाली बहती है.

शहरात खेड्याचे जीणे : तेलगू वसाहत, नूर कॉलनी, नागठाणे ले-आऊटचे नागरिक हैराण पुसद : साहब, तुमहीच देखो जिधर उधर किचड है, नाली मे सुअर बैठै है. गंदगी से परेशान है, स्कूल के बाजू में ही नाली बहती है. हमारे एरिया में दिक्कते तो बहुत है, बताऊ तो क्या बताऊ ? सब लोग सुनते है लेकिन उपाय करते नही, असे उद्विग्न शब्द आहे पुसद शहरातील तेलगू वसाहत, नूर कॉलनी आणि नागठाने ले-आऊटमधील नागरिकांचे. महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद शहरातील या तीन वसाहतीत समस्यांचा डोंगर आहे. ग्रामीण भागापेक्षाही भयावह अवस्था आहे. म्हणालयाच शहर आहे, नागरिक मात्र समस्या घेऊनच दिवस काढत आहे. पुसद-यवतमाळ मार्गावर पूस नदीच्या तीरावर ही वसाहत आहे. तेलगू वसाहतीच्या प्रवेश द्वारावरच घाणीचे साम्राज्य दिसून आले. या भागातील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा अनेक समस्या पुढे आल्या. तेलगू वसाहतीतील जागा मालकीची नाही. ही मंडळी भोगवटादार आहे. २०० घरांच्या या वस्तीत सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. परंतु समस्या सुटता सुटत नाही. आतापर्यंत या भागाचे नेतृत्व भाजपाने शिवसेनेच्या नगरसेवकांनी केले. त्यामुळे गत १५ वर्षात या भागातील समस्याच सुटल्या नाहीत, असे येथील नागरिक सांगतात. आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. त्यामुळे या भागाच्या विकासाची अपेक्षा नागरिकांना आहे. या परिसराची मुख्य समस्या आहे ती तुंबलेल्या नाल्यांची. या भागातील पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थाच नाही. लगतच्या वसाहतीतील नाल्या उंच असल्याने पाणी निघायला जागा नाही. त्यामुळे तेलगू वसाहत, नूर कॉलनीत नाल्या तुंबल्या आहे. त्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भागात अंतर्गत रस्तेच दिसत नाही. नाल्या नसल्याने खुल्या जागेत पाणी साचले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील रहिवासी महंमद हनिफ म. इस्माईल म्हणाले, नाली व डुकरांच्या बंदोबस्तासाठी वारंवार तक्रारी केल्या. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. रिक्षा चालक सय्यद गफ्फार म्हणाले, नाल्या, रस्ते गत २० वर्षांपासून नाही. जुनी पाईपलाईन असल्याने पाणीही घाणेरडे येते. अब्दूल कादीर शेख नूर म्हणाले, नागठाने ले-आऊटमधील नालीची तक्रार गत चार वर्षांपासून करीत आहे. परंतु कुणीही पुढे येत नाही. ममता दिगांबर मेंढरे, अर्चना नरेंद्र मुनेश्वर, आबेराबी शेख मोहंमद, वंदना मारोती रेणके, कांचन अशोक डोंगरे, मो.युनुस अब्दूल रऊफ, शगुप्ताबी यांनी तर आपल्या मोहल्यातील समस्यांचा पाढाच वाचला. अगदी चिंचोळा असलेल्या रस्त्यामुळे जाणे-येणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात दोन-दोन फूट पाणी साचते. मुलांना शाळेत जाता येत नाही. लोकांच्या घरावरून वायर टाकून लाईन घ्यावी लागते. कुणी आजारी पडल्यास त्याला उचलूनच मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते. अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा या महिलांनी वाचला. गत १५ वर्षांपासून समस्यांकडे कुणी लक्ष दिले नाही. मात्र आता या भागाच्या नगरसेविका दीपाली भगवान धुळे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या दीपाली महिला व बालकल्याण सभापती झाल्या आहेत. या भागातील सदस्या सोडविण्यासाठी त्यांनी नियोजन केले असून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. घंटागाडी, रस्त्यांची साफसफाई करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. (कार्यालय चमू)