शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

दिक्कते तो बहुत है, बताऊ तो क्या ?

By admin | Updated: February 10, 2017 01:50 IST

साहब, तुमहीच देखो जिधर उधर किचड है, नाली मे सुअर बैठै है. गंदगी से परेशान है, स्कूल के बाजू में ही नाली बहती है.

शहरात खेड्याचे जीणे : तेलगू वसाहत, नूर कॉलनी, नागठाणे ले-आऊटचे नागरिक हैराण पुसद : साहब, तुमहीच देखो जिधर उधर किचड है, नाली मे सुअर बैठै है. गंदगी से परेशान है, स्कूल के बाजू में ही नाली बहती है. हमारे एरिया में दिक्कते तो बहुत है, बताऊ तो क्या बताऊ ? सब लोग सुनते है लेकिन उपाय करते नही, असे उद्विग्न शब्द आहे पुसद शहरातील तेलगू वसाहत, नूर कॉलनी आणि नागठाने ले-आऊटमधील नागरिकांचे. महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद शहरातील या तीन वसाहतीत समस्यांचा डोंगर आहे. ग्रामीण भागापेक्षाही भयावह अवस्था आहे. म्हणालयाच शहर आहे, नागरिक मात्र समस्या घेऊनच दिवस काढत आहे. पुसद-यवतमाळ मार्गावर पूस नदीच्या तीरावर ही वसाहत आहे. तेलगू वसाहतीच्या प्रवेश द्वारावरच घाणीचे साम्राज्य दिसून आले. या भागातील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा अनेक समस्या पुढे आल्या. तेलगू वसाहतीतील जागा मालकीची नाही. ही मंडळी भोगवटादार आहे. २०० घरांच्या या वस्तीत सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. परंतु समस्या सुटता सुटत नाही. आतापर्यंत या भागाचे नेतृत्व भाजपाने शिवसेनेच्या नगरसेवकांनी केले. त्यामुळे गत १५ वर्षात या भागातील समस्याच सुटल्या नाहीत, असे येथील नागरिक सांगतात. आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. त्यामुळे या भागाच्या विकासाची अपेक्षा नागरिकांना आहे. या परिसराची मुख्य समस्या आहे ती तुंबलेल्या नाल्यांची. या भागातील पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थाच नाही. लगतच्या वसाहतीतील नाल्या उंच असल्याने पाणी निघायला जागा नाही. त्यामुळे तेलगू वसाहत, नूर कॉलनीत नाल्या तुंबल्या आहे. त्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भागात अंतर्गत रस्तेच दिसत नाही. नाल्या नसल्याने खुल्या जागेत पाणी साचले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील रहिवासी महंमद हनिफ म. इस्माईल म्हणाले, नाली व डुकरांच्या बंदोबस्तासाठी वारंवार तक्रारी केल्या. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. रिक्षा चालक सय्यद गफ्फार म्हणाले, नाल्या, रस्ते गत २० वर्षांपासून नाही. जुनी पाईपलाईन असल्याने पाणीही घाणेरडे येते. अब्दूल कादीर शेख नूर म्हणाले, नागठाने ले-आऊटमधील नालीची तक्रार गत चार वर्षांपासून करीत आहे. परंतु कुणीही पुढे येत नाही. ममता दिगांबर मेंढरे, अर्चना नरेंद्र मुनेश्वर, आबेराबी शेख मोहंमद, वंदना मारोती रेणके, कांचन अशोक डोंगरे, मो.युनुस अब्दूल रऊफ, शगुप्ताबी यांनी तर आपल्या मोहल्यातील समस्यांचा पाढाच वाचला. अगदी चिंचोळा असलेल्या रस्त्यामुळे जाणे-येणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात दोन-दोन फूट पाणी साचते. मुलांना शाळेत जाता येत नाही. लोकांच्या घरावरून वायर टाकून लाईन घ्यावी लागते. कुणी आजारी पडल्यास त्याला उचलूनच मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते. अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा या महिलांनी वाचला. गत १५ वर्षांपासून समस्यांकडे कुणी लक्ष दिले नाही. मात्र आता या भागाच्या नगरसेविका दीपाली भगवान धुळे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या दीपाली महिला व बालकल्याण सभापती झाल्या आहेत. या भागातील सदस्या सोडविण्यासाठी त्यांनी नियोजन केले असून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. घंटागाडी, रस्त्यांची साफसफाई करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. (कार्यालय चमू)