शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

यवतमाळपासून हाकेच्या अंतरावर असलेले इचोरी तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:29 PM

Yawatmal News water यवतमाळ जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले इचोरी गाव आजही प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहे. दीड हजार लोकसंख्येच्या या गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते.

ठळक मुद्दे गावात नळ याेजनाच नाहीहातपंपावरून भरावे लागते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले इचोरी गाव आजही प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहे. दीड हजार लोकसंख्येच्या या गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते. पाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी म्हणून नागरिकांनी आमदार, खासदार, जिल्हा प्रशासन यांच्याकडे शेकडो चकरा मारल्या. प्रस्ताव मंजूर झाला. सरकार बदलले आणि पाण्याची योजना थांबली. आजही या गावात नळ योजना नाही. हातपंप आणि एक सार्वजनिक विहीर त्यावरच पिण्याचे पाणी अवलंबून आहे. जानेवारीपासून पाण्याची पातळी कमी होते आणि गावात टँकर सुरू करावा लागतो. यावर्षीही अशीच परिस्थिती कायम राहिली आहे. यामुळे नागरिकांमध्ये निराशेचा सूर आहे.

राजकीय इच्छाशक्ती नसल्याने याेजनेस विलंब

गावासाठी मागच्या सरकारमध्ये पाईपलाईन मंजूर झाली होती.  आता या योजनेसाठी पैसाच नाही. यामुळे गावाचे नळ योजनेचे स्वप्न धुसर झाले आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींकडे हा विषय   मांडण्यात आला. मात्र आजपर्यंत त्यावर कुठलाही तोडगा निघाला   नाही.

आमच्या गावाला पाण्याचे सुख मिळालेच नाही. पावसाळ्यात किमान हातपंपावर पाणी भरता येते. मात्र जानेवारीपासून पाण्यासाठी पायपीट होते. रोजमजुरी करताना पाणी आणण्यासाठी जास्त वेळ काम करावे लागते. यानंतरही पुरेसे पाणी प्रत्येकाच्या घरी पोहोचत नाही. लहाण्यापासून मोठ्यापर्यंत सारेजण पाणीच आणत असतात. - रंजना ठोंबरे, गृहिणी

खनिज विकास निधी, राष्ट्रीय पेयजल योजना या माध्यमातून ग्रामपंचायतीने नळ योजनेसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. मात्र सरकार बदलले आणि मंजूर झालेली योजनाही थांबली. त्यावेळी ५४ लाख रुपयांचे बजेट होते. आता हे बजेट ७७ लाखांवर पोहोचले आहे. मात्र कुठल्याही हालचाली नाही.- नीळकंठ बोरकर, सरपंच

टॅग्स :water shortageपाणीकपात