शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

अवनीच्या शिकारीसाठी महाराज बागेतील दुसऱ्या वाघिणीचे मूत्रच ठरले उपयोगी! बछड्यांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 12:31 IST

१३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली.

- नरेश मानकरपांढरकवडा (यवतमाळ)  - १३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली. नागपूरच्या महाराज बागेतून दुस-या वाघिणीचे मूत्र आणून जंगलात शिंपडले. कशालाच दाद न देणारी अवनी निसर्गनियमानुसार त्या वासावर आली आणि शार्पशुटरनी तिचा वेध घेतला.नरभक्षक झालेल्या अवनीला जेरबंद करण्याची मोहिम युद्धस्तरावर सुरू होती. मध्यप्रदेशातून हत्ती आणले, प्रसिद्ध शार्पशुटर बोलविण्यात आले. हवाई शोध घेण्यासाठी पॅराग्लाईडर आणण्यात आले. इटालीयन कुत्रेसुद्धा आणण्यात आले होते. शेवटी वाघिणीचे मूत्रच उपयोगी ठरले. मुत्राच्या वासामुळे कधीकधी ती झुडूपाबाहेर येत होती. कॅमेरामध्येही ती ट्रॅप झाली. तिच्या पाऊलखुणाही आढळून आल्या होत्या. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास वाघीण बोराटी जंगल परिसरात दुस-या वाघिणीच्या मूत्राचा शोध घेत वाघडोटा पुलाजवळ आली आणि शार्पशुटर असगर अली खान याने नेम धरून गोळी झाडली व ती धारातीर्थी पडली. पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक के. अभर्णा यांना भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती देण्यात आली. पहाटे ४.३० वाजेपर्यंत तब्बल पाच तास पंचनामा करून मृतदेह नागपूर येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.वाघिणीला बेशुद्ध करण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. परंतु ती चवताळून पथकावर चाल करून आली. त्यामुळे तिला ठार केल्याशिवाय पर्याय नव्हता, असे पांढरकवडा विभागाचे उपवनसंरक्षक के.एस.अभर्णा यांनी सांगितले.बेशुद्धीचा प्रयत्न झालाच नाहीवाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला की नाही, की तिच्यावर सरळ गोळ्याच घालून ठार मारण्यात आले, याबाबत संभ्रम आहे.वाघिणीच्या मृत शरिरात बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेला डार्ट आढळून आला. परंतु तो मृत झाल्यावर तिच्या शरिरात खुपसण्यात आल्याचा दावा वन्यजीव प्रेमींनी केला आहे.तब्बल दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर ठार मारण्यात आलेल्या नरभक्षक वाघिणीचे ११ महिन्यांचे दोन बछडे अद्यापही शोधपथकाच्या दृष्टीस पडले नाही. त्यांना कसे जेरबंद करायचे हा गहन प्रश्न आता वनविभागासमोर निर्माण झाला आहे.आई दिसली नाही, तर हे बछडे अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त असून त्यातून पुन्हा मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणwildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्रTigerवाघ