शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

अवनीच्या शिकारीसाठी महाराज बागेतील दुसऱ्या वाघिणीचे मूत्रच ठरले उपयोगी! बछड्यांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 12:31 IST

१३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली.

- नरेश मानकरपांढरकवडा (यवतमाळ)  - १३ निष्पापांचे बळी घेणारी अवनी वाघिण तब्बल दीड महिन्यांपासून वन विभागाच्या पथकाला चकवा देत होती. प्रशिक्षीत हत्ती, श्वान पथक, पॅरा ग्लायडर यांनाही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर अनुभवी अधिका-यांनी क्लुप्ती योजली. नागपूरच्या महाराज बागेतून दुस-या वाघिणीचे मूत्र आणून जंगलात शिंपडले. कशालाच दाद न देणारी अवनी निसर्गनियमानुसार त्या वासावर आली आणि शार्पशुटरनी तिचा वेध घेतला.नरभक्षक झालेल्या अवनीला जेरबंद करण्याची मोहिम युद्धस्तरावर सुरू होती. मध्यप्रदेशातून हत्ती आणले, प्रसिद्ध शार्पशुटर बोलविण्यात आले. हवाई शोध घेण्यासाठी पॅराग्लाईडर आणण्यात आले. इटालीयन कुत्रेसुद्धा आणण्यात आले होते. शेवटी वाघिणीचे मूत्रच उपयोगी ठरले. मुत्राच्या वासामुळे कधीकधी ती झुडूपाबाहेर येत होती. कॅमेरामध्येही ती ट्रॅप झाली. तिच्या पाऊलखुणाही आढळून आल्या होत्या. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास वाघीण बोराटी जंगल परिसरात दुस-या वाघिणीच्या मूत्राचा शोध घेत वाघडोटा पुलाजवळ आली आणि शार्पशुटर असगर अली खान याने नेम धरून गोळी झाडली व ती धारातीर्थी पडली. पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक के. अभर्णा यांना भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती देण्यात आली. पहाटे ४.३० वाजेपर्यंत तब्बल पाच तास पंचनामा करून मृतदेह नागपूर येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला.वाघिणीला बेशुद्ध करण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला. परंतु ती चवताळून पथकावर चाल करून आली. त्यामुळे तिला ठार केल्याशिवाय पर्याय नव्हता, असे पांढरकवडा विभागाचे उपवनसंरक्षक के.एस.अभर्णा यांनी सांगितले.बेशुद्धीचा प्रयत्न झालाच नाहीवाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला की नाही, की तिच्यावर सरळ गोळ्याच घालून ठार मारण्यात आले, याबाबत संभ्रम आहे.वाघिणीच्या मृत शरिरात बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेला डार्ट आढळून आला. परंतु तो मृत झाल्यावर तिच्या शरिरात खुपसण्यात आल्याचा दावा वन्यजीव प्रेमींनी केला आहे.तब्बल दीड महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर ठार मारण्यात आलेल्या नरभक्षक वाघिणीचे ११ महिन्यांचे दोन बछडे अद्यापही शोधपथकाच्या दृष्टीस पडले नाही. त्यांना कसे जेरबंद करायचे हा गहन प्रश्न आता वनविभागासमोर निर्माण झाला आहे.आई दिसली नाही, तर हे बछडे अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त असून त्यातून पुन्हा मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणwildlifeवन्यजीवMaharashtraमहाराष्ट्रTigerवाघ