शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

यवतमाळ शहरात शंभरावर वाहनांची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 5:00 AM

दुचाकी चाेरीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचा साेईस्करपणे वापर करून घेतला जाताे. यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा चाेरट्याचे  आवडते ठिकाण आहे. येथे अनेक दुचाकी एकाच वेळी उभ्या असतात. गाडी मालकावर पाळत ठेवून चाेरटे दुचाकी लंपास करत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार देण्यास पाेलीस ठाण्यात पाेहाेचलेल्या व्यक्तीलाच दुचाकी इतरत्र शाेधण्याचा सल्ला दिला जाताे.

ठळक मुद्देमहिनाभरापासून चाेरट्यांचा धुमाकूळ : पाेलीस उरले केवळ तक्रारी नाेंदविण्यापुरते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  शहरसह जिल्ह्यात दुचाकी चाेरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात शंभरावर वाहने चाेरीला गेली आहेत. यवतमाळात दर दिवशी पाच ते सहा वाहने चाेरीला जात आहेत. पाेलीस केवळ तक्रारी नाेंदविण्यापुरतीच भूमिका वठवत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार थेट दाखल करून घेतली जात नाही, त्यामुळे दर दिवशीचे प्रमाण रेकाॅर्डवर कमी दिसत आहे. चाेरटे सैराट झाल्याने सामान्य नागरिक हैराण आहेत.  दुचाकी चाेरीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचा साेईस्करपणे वापर करून घेतला जाताे. यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा चाेरट्याचे  आवडते ठिकाण आहे. येथे अनेक दुचाकी एकाच वेळी उभ्या असतात. गाडी मालकावर पाळत ठेवून चाेरटे दुचाकी लंपास करत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार देण्यास पाेलीस ठाण्यात पाेहाेचलेल्या व्यक्तीलाच दुचाकी इतरत्र शाेधण्याचा सल्ला दिला जाताे. दुचाकी सापडल्यास ती तक्रार नाेंदविल्यावर सहज परत करता येत नाही, असे सांगून परत पाठविले जाते. दुचाकी गेल्याचे दु:ख घेऊन त्या व्यक्तीलाच स्वत:च्या गाडीचा शाेध घ्यावा लागताे. शाेधाशाेध करून ती सापडत नाही. मात्र, पाेलीस ठाण्यातील हा अनुभव आल्यानंतर बरेच जण पुन्हा तक्रार देण्यासाठी जात नाही, त्यामुळे अनेक गुन्हे रेकाॅर्डवर येत नाहीत. शहरासह ग्रामीण भागातही दुचाकी चाेरटे सक्रिय आहे. महगाव, उमरखेड, पुसद, आर्णी या तालुक्यातील गावांमध्ये दुचाकी चाेरीचे गुन्हे घडत आहे. अनलाॅकच्या प्रक्रियेत गुन्ह्याचा आलेख वाढणार, ही शक्यता अनेक जाणकारांनी वर्तविली हाेती. आता याची प्रचिती येत आहे. चाेरीच्या दुचाकीचा वापर हा विविध गुन्ह्यांमध्ये केला जाताे, अशा घटनाही घडत आहेत. 

चाेरट्यांना माेकळे रान

- यवतमाळ शहरातील शहर पाेलीस ठाणे, अवधूतवाडी पाेलीस ठाणे, ग्रामीण व लाेहरा पाेलीस ठाण्यातही चाेरीचे गुन्हे दाखल हाेत आहे. दुचाकी चाेरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी काेणतीच ठाेस उपाययाेजना पाेलिसांकडून प्रभावीपणे राबविली जात नाही. यामुळेच चाेरट्यांचे फावत आहे.  अनेक प्रमुख चाैकात असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद आहे. या कारणाने अनेक घटना उघडकीस येत नाही. किमान सीसीटीव्ही सुरू असल्यास चाेरट्यांच्या टाेळीचा झडा लागण्याला मदत हाेईल, असे जाणकार पाेलीस कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस