शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यावर निसर्गासोबतच प्रशासनाची अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच्या या जीवघेण्या प्रयत्नांना मानवी यंत्रणा सुरूंग लावत असल्याच्या आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जी कारणे सांगत आहे, ती पटण्यासारखी आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची सगळीकडून कुचंबना, शेती उद्योग अडचणीत, आत्महत्या वाढण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शेतकरीनिसर्गाच्या लहरीपणाचा सामना करून शेती उद्योगाचा शिवधनुष्य पेलण्याचा आटोकात प्रयत्न करीत असताना आता प्रशासकीय यंत्रणेच्या लहरीपणाने शेती उद्योग डबघाईस येण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होण्याची भिती वर्तविल्या जात आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच्या या जीवघेण्या प्रयत्नांना मानवी यंत्रणा सुरूंग लावत असल्याच्या आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जी कारणे सांगत आहे, ती पटण्यासारखी आहे. तालुक्यातील जवळपास दोन हजार शेतकरी राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरले. परंतु यातील ३५० शेतकऱ्यांना योजनेस पात्र असूनही लाभ मिळाला नाही, तर अनेक शेतकरी थकीत कर्जदार असूनही त्यांची नावे कर्जमाफी यादीतून सुटली आहे तर ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, अशा शेतकºयांना बँका नव्याने कर्ज देताना अडवणुकीची भूमिका घेतानाचे चित्र आहे.बँकांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास कमजोर होत आहे. पिकांच्या वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी शेतकºयांना युरियाची गरज आहे. पण गेल्या चार महिन्यापासून युरियाचा काळाबाजार सुरू आहे. २६८ रूपयाची बॅग आज ४०० रूपयाला शेतकऱ्याला खरेदी करावी लागत आहे. अजूनही खताची टंचाई आहे. कृषीमंत्री दादा भुसे जिल्ह्यात आल्यानंतर मुबलक युरियाची घोषणा केली. पण ही घोषणाही वांझोटी निघाली. फवारणी औषधामध्येही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. खताच्या नावावर शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे.एकाच औषधाची किंमत दुकान बदलताच बदलत आहे. त्यामुळे एमआरपी कायदा कुठे गेला, असा प्रश्न निर्माण होत आहे.विशेष म्हणजे या कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना चढ्या भावाने बियाणांची व्रिकी केली जात असली तरी या कृषी केंद्राची संबंधित विभागाकडून साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी गप्पच राहत असल्याचे दिसून येते.सहा महिन्यांत २३ आत्महत्यालॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या सहा महिन्यात तालुक्यात तब्बल २३ नागरिकांनी आत्महत्या केल्या आहे. या सर्व आत्महत्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून केल्या नसल्या तरी या सर्व आत्महत्या शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्यांची सर्वत्र होणारी कुचंबना यातून वाढलेली व्यसनाधिनता. घरात होणारा वादंग, यातून कुटुंबात सतत वाद चालत असल्याने या आत्महत्या होत आहे. या सर्व आत्महत्या आर्थिक अडचणीतून झाल्या आहे, एवढे मात्र निश्चित.शेतकरी आत्महत्येत तालुका अव्वलआदिवासीबहुल म्हणून ओळख असलेला मारेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. २००५ मध्ये राहुल गांधी यांनी तालुक्यातील जळका येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त बांदुरकर कुटुंबियांची भेट घेऊन विधवा कलावती बांदुरकर यांचे दु:ख लोकसभेत मांडून शेतकरी आत्महत्येचा प्रश्न राष्ट्रीयस्तरावर पोहोचविला होता. मात्र चार वर्षात तालुक्यात ५७ आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्या म्हनून या सर्व आत्महत्या गनल्या गेल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीNatureनिसर्ग