शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शेतकऱ्यावर निसर्गासोबतच प्रशासनाची अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच्या या जीवघेण्या प्रयत्नांना मानवी यंत्रणा सुरूंग लावत असल्याच्या आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जी कारणे सांगत आहे, ती पटण्यासारखी आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची सगळीकडून कुचंबना, शेती उद्योग अडचणीत, आत्महत्या वाढण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शेतकरीनिसर्गाच्या लहरीपणाचा सामना करून शेती उद्योगाचा शिवधनुष्य पेलण्याचा आटोकात प्रयत्न करीत असताना आता प्रशासकीय यंत्रणेच्या लहरीपणाने शेती उद्योग डबघाईस येण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होण्याची भिती वर्तविल्या जात आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच्या या जीवघेण्या प्रयत्नांना मानवी यंत्रणा सुरूंग लावत असल्याच्या आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जी कारणे सांगत आहे, ती पटण्यासारखी आहे. तालुक्यातील जवळपास दोन हजार शेतकरी राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरले. परंतु यातील ३५० शेतकऱ्यांना योजनेस पात्र असूनही लाभ मिळाला नाही, तर अनेक शेतकरी थकीत कर्जदार असूनही त्यांची नावे कर्जमाफी यादीतून सुटली आहे तर ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, अशा शेतकºयांना बँका नव्याने कर्ज देताना अडवणुकीची भूमिका घेतानाचे चित्र आहे.बँकांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास कमजोर होत आहे. पिकांच्या वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी शेतकºयांना युरियाची गरज आहे. पण गेल्या चार महिन्यापासून युरियाचा काळाबाजार सुरू आहे. २६८ रूपयाची बॅग आज ४०० रूपयाला शेतकऱ्याला खरेदी करावी लागत आहे. अजूनही खताची टंचाई आहे. कृषीमंत्री दादा भुसे जिल्ह्यात आल्यानंतर मुबलक युरियाची घोषणा केली. पण ही घोषणाही वांझोटी निघाली. फवारणी औषधामध्येही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. खताच्या नावावर शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे.एकाच औषधाची किंमत दुकान बदलताच बदलत आहे. त्यामुळे एमआरपी कायदा कुठे गेला, असा प्रश्न निर्माण होत आहे.विशेष म्हणजे या कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना चढ्या भावाने बियाणांची व्रिकी केली जात असली तरी या कृषी केंद्राची संबंधित विभागाकडून साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी गप्पच राहत असल्याचे दिसून येते.सहा महिन्यांत २३ आत्महत्यालॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या सहा महिन्यात तालुक्यात तब्बल २३ नागरिकांनी आत्महत्या केल्या आहे. या सर्व आत्महत्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून केल्या नसल्या तरी या सर्व आत्महत्या शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्यांची सर्वत्र होणारी कुचंबना यातून वाढलेली व्यसनाधिनता. घरात होणारा वादंग, यातून कुटुंबात सतत वाद चालत असल्याने या आत्महत्या होत आहे. या सर्व आत्महत्या आर्थिक अडचणीतून झाल्या आहे, एवढे मात्र निश्चित.शेतकरी आत्महत्येत तालुका अव्वलआदिवासीबहुल म्हणून ओळख असलेला मारेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. २००५ मध्ये राहुल गांधी यांनी तालुक्यातील जळका येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त बांदुरकर कुटुंबियांची भेट घेऊन विधवा कलावती बांदुरकर यांचे दु:ख लोकसभेत मांडून शेतकरी आत्महत्येचा प्रश्न राष्ट्रीयस्तरावर पोहोचविला होता. मात्र चार वर्षात तालुक्यात ५७ आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्या म्हनून या सर्व आत्महत्या गनल्या गेल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीNatureनिसर्ग