शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यावर निसर्गासोबतच प्रशासनाची अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच्या या जीवघेण्या प्रयत्नांना मानवी यंत्रणा सुरूंग लावत असल्याच्या आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जी कारणे सांगत आहे, ती पटण्यासारखी आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची सगळीकडून कुचंबना, शेती उद्योग अडचणीत, आत्महत्या वाढण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शेतकरीनिसर्गाच्या लहरीपणाचा सामना करून शेती उद्योगाचा शिवधनुष्य पेलण्याचा आटोकात प्रयत्न करीत असताना आता प्रशासकीय यंत्रणेच्या लहरीपणाने शेती उद्योग डबघाईस येण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होण्याची भिती वर्तविल्या जात आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच्या या जीवघेण्या प्रयत्नांना मानवी यंत्रणा सुरूंग लावत असल्याच्या आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जी कारणे सांगत आहे, ती पटण्यासारखी आहे. तालुक्यातील जवळपास दोन हजार शेतकरी राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरले. परंतु यातील ३५० शेतकऱ्यांना योजनेस पात्र असूनही लाभ मिळाला नाही, तर अनेक शेतकरी थकीत कर्जदार असूनही त्यांची नावे कर्जमाफी यादीतून सुटली आहे तर ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, अशा शेतकºयांना बँका नव्याने कर्ज देताना अडवणुकीची भूमिका घेतानाचे चित्र आहे.बँकांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास कमजोर होत आहे. पिकांच्या वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी शेतकºयांना युरियाची गरज आहे. पण गेल्या चार महिन्यापासून युरियाचा काळाबाजार सुरू आहे. २६८ रूपयाची बॅग आज ४०० रूपयाला शेतकऱ्याला खरेदी करावी लागत आहे. अजूनही खताची टंचाई आहे. कृषीमंत्री दादा भुसे जिल्ह्यात आल्यानंतर मुबलक युरियाची घोषणा केली. पण ही घोषणाही वांझोटी निघाली. फवारणी औषधामध्येही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. खताच्या नावावर शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे.एकाच औषधाची किंमत दुकान बदलताच बदलत आहे. त्यामुळे एमआरपी कायदा कुठे गेला, असा प्रश्न निर्माण होत आहे.विशेष म्हणजे या कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना चढ्या भावाने बियाणांची व्रिकी केली जात असली तरी या कृषी केंद्राची संबंधित विभागाकडून साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी गप्पच राहत असल्याचे दिसून येते.सहा महिन्यांत २३ आत्महत्यालॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या सहा महिन्यात तालुक्यात तब्बल २३ नागरिकांनी आत्महत्या केल्या आहे. या सर्व आत्महत्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून केल्या नसल्या तरी या सर्व आत्महत्या शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्यांची सर्वत्र होणारी कुचंबना यातून वाढलेली व्यसनाधिनता. घरात होणारा वादंग, यातून कुटुंबात सतत वाद चालत असल्याने या आत्महत्या होत आहे. या सर्व आत्महत्या आर्थिक अडचणीतून झाल्या आहे, एवढे मात्र निश्चित.शेतकरी आत्महत्येत तालुका अव्वलआदिवासीबहुल म्हणून ओळख असलेला मारेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. २००५ मध्ये राहुल गांधी यांनी तालुक्यातील जळका येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त बांदुरकर कुटुंबियांची भेट घेऊन विधवा कलावती बांदुरकर यांचे दु:ख लोकसभेत मांडून शेतकरी आत्महत्येचा प्रश्न राष्ट्रीयस्तरावर पोहोचविला होता. मात्र चार वर्षात तालुक्यात ५७ आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्या म्हनून या सर्व आत्महत्या गनल्या गेल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीNatureनिसर्ग