शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

शेतकऱ्यावर निसर्गासोबतच प्रशासनाची अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच्या या जीवघेण्या प्रयत्नांना मानवी यंत्रणा सुरूंग लावत असल्याच्या आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जी कारणे सांगत आहे, ती पटण्यासारखी आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची सगळीकडून कुचंबना, शेती उद्योग अडचणीत, आत्महत्या वाढण्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शेतकरीनिसर्गाच्या लहरीपणाचा सामना करून शेती उद्योगाचा शिवधनुष्य पेलण्याचा आटोकात प्रयत्न करीत असताना आता प्रशासकीय यंत्रणेच्या लहरीपणाने शेती उद्योग डबघाईस येण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होण्याची भिती वर्तविल्या जात आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा ही आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला न डगमगता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती आधुनिकतेकडे नेत उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतानाचे सकारात्मक चित्र तालुक्यात दिसत आहे. मात्र शेतकºयांच्या या जीवघेण्या प्रयत्नांना मानवी यंत्रणा सुरूंग लावत असल्याच्या आरोप आता शेतकऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी शेतकरी जी कारणे सांगत आहे, ती पटण्यासारखी आहे. तालुक्यातील जवळपास दोन हजार शेतकरी राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरले. परंतु यातील ३५० शेतकऱ्यांना योजनेस पात्र असूनही लाभ मिळाला नाही, तर अनेक शेतकरी थकीत कर्जदार असूनही त्यांची नावे कर्जमाफी यादीतून सुटली आहे तर ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, अशा शेतकºयांना बँका नव्याने कर्ज देताना अडवणुकीची भूमिका घेतानाचे चित्र आहे.बँकांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास कमजोर होत आहे. पिकांच्या वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी शेतकºयांना युरियाची गरज आहे. पण गेल्या चार महिन्यापासून युरियाचा काळाबाजार सुरू आहे. २६८ रूपयाची बॅग आज ४०० रूपयाला शेतकऱ्याला खरेदी करावी लागत आहे. अजूनही खताची टंचाई आहे. कृषीमंत्री दादा भुसे जिल्ह्यात आल्यानंतर मुबलक युरियाची घोषणा केली. पण ही घोषणाही वांझोटी निघाली. फवारणी औषधामध्येही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. खताच्या नावावर शेतकऱ्यांना लुबाडले जात आहे.एकाच औषधाची किंमत दुकान बदलताच बदलत आहे. त्यामुळे एमआरपी कायदा कुठे गेला, असा प्रश्न निर्माण होत आहे.विशेष म्हणजे या कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना चढ्या भावाने बियाणांची व्रिकी केली जात असली तरी या कृषी केंद्राची संबंधित विभागाकडून साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी गप्पच राहत असल्याचे दिसून येते.सहा महिन्यांत २३ आत्महत्यालॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या सहा महिन्यात तालुक्यात तब्बल २३ नागरिकांनी आत्महत्या केल्या आहे. या सर्व आत्महत्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून केल्या नसल्या तरी या सर्व आत्महत्या शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्यांची सर्वत्र होणारी कुचंबना यातून वाढलेली व्यसनाधिनता. घरात होणारा वादंग, यातून कुटुंबात सतत वाद चालत असल्याने या आत्महत्या होत आहे. या सर्व आत्महत्या आर्थिक अडचणीतून झाल्या आहे, एवढे मात्र निश्चित.शेतकरी आत्महत्येत तालुका अव्वलआदिवासीबहुल म्हणून ओळख असलेला मारेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. २००५ मध्ये राहुल गांधी यांनी तालुक्यातील जळका येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त बांदुरकर कुटुंबियांची भेट घेऊन विधवा कलावती बांदुरकर यांचे दु:ख लोकसभेत मांडून शेतकरी आत्महत्येचा प्रश्न राष्ट्रीयस्तरावर पोहोचविला होता. मात्र चार वर्षात तालुक्यात ५७ आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्या म्हनून या सर्व आत्महत्या गनल्या गेल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीNatureनिसर्ग