शहरं
Join us  
Trending Stories
1
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
2
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
3
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर
4
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
5
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
6
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
7
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
8
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
9
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
10
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
11
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
12
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
13
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
14
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
15
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
16
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
17
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
18
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
19
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
20
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?

कर्जमाफीच्या यादीत पिंपरी बुटीचे शेतकरी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:08 IST

तालुक्यातील पिंपरी बुटी येथील किती शेतकरी कर्जमाफीच्या यादीत आहेत, असा सवाल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे मुक्कामी गाव : आढावा बैठकीत विचारलेल्या प्रश्नाने प्रशासनाची तारांबळ

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तालुक्यातील पिंपरी बुटी येथील किती शेतकरी कर्जमाफीच्या यादीत आहेत, असा सवाल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत केला. तेव्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. १८ आॅक्टोबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळात वितरित करण्यात आलेल्या कर्जमाफी प्रमाणपत्रात पिंपरी बुटीच काय, यवतमाळ तालुक्यातील एकाही शेतकºयाचा समावेश नसल्याचे पुढे आले. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी याच गावात एका शेतकºयाच्या घरी मुक्काम केला होता, हे विशेष !मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ मार्च २०१५ रोजी यवतमाळ तालुक्यातील पिंपरी बुटी येथील विष्णू रंगराव ढुमणे या शेतकºयाच्या घरी मुक्काम केला होता. शेतकºयासोबत भोजन करून शेतकºयाचे जीवनमान जवळून अनुभवले होते. त्याच पिंपरी बुटीतील किती शेतकºयांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहेत, याची उत्सुकता मुख्यमंत्र्यांना असावी. त्यामुळेच त्यांनी कीटकनाशक फवारणीबाधित शेतकºयांच्या प्रश्नांवर आयोजित आढावा बैठकीत आवर्जून पिंपरी बुटीची माहिती घेतली. आपण भेट दिलेल्या गावातील एखाद्या शेतकºयाला प्रशासनाने निश्चितच प्रमाणपत्र दिले असेल, असे त्यांना वाटले. परंतु या बैठकीत त्यांनी जेव्हा पिंपरी बुटीतील कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा प्रशासनाकडे उत्तरच नव्हते.२९ शेतकºयांना १८ आॅक्टोबर रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र एका सोहळ्यात वितरित करण्यात आले. या २९ शेतकºयांमध्ये पिंपरी बुटी येथील एकही शेतकरी नाही. विशेष म्हणजे, या यादीत यवतमाळ तालुक्यातील शेतकºयांचाही समावेश नाही. उलट १५ तालुक्यातील प्रत्येकी दोन गावातील शेतकºयांचा समावेश आहे. २९ शेतकºयांना २४ लाख ९२ हजार १६८ रुपयांची कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यवतमाळ तालुक्यातील शेतकºयांचा समावेश का टाळला, याचे उत्तर कुणाकडेही नव्हते.पिंपरीत २१६ पात्र शेतकरीशासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या यादीत पिंपरी बुटी येथील २१६ शेतकरी पात्र ठरले आहे. तर १७ शेतकरी अपात्र आणि चालू वर्षाचे २२ शेतकरी अपात्र आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केलेल्या गावातील २१६ पात्र शेतकºयांपैकी एकाही शेतकºयाला सन्मानपूर्वक कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांनीच यावर जाब विचारल्याने प्रशासन मात्र चांगलेच गोंधळले होते.