शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या यादीत पिंपरी बुटीचे शेतकरी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:08 IST

तालुक्यातील पिंपरी बुटी येथील किती शेतकरी कर्जमाफीच्या यादीत आहेत, असा सवाल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे मुक्कामी गाव : आढावा बैठकीत विचारलेल्या प्रश्नाने प्रशासनाची तारांबळ

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तालुक्यातील पिंपरी बुटी येथील किती शेतकरी कर्जमाफीच्या यादीत आहेत, असा सवाल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत केला. तेव्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. १८ आॅक्टोबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळात वितरित करण्यात आलेल्या कर्जमाफी प्रमाणपत्रात पिंपरी बुटीच काय, यवतमाळ तालुक्यातील एकाही शेतकºयाचा समावेश नसल्याचे पुढे आले. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी याच गावात एका शेतकºयाच्या घरी मुक्काम केला होता, हे विशेष !मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ मार्च २०१५ रोजी यवतमाळ तालुक्यातील पिंपरी बुटी येथील विष्णू रंगराव ढुमणे या शेतकºयाच्या घरी मुक्काम केला होता. शेतकºयासोबत भोजन करून शेतकºयाचे जीवनमान जवळून अनुभवले होते. त्याच पिंपरी बुटीतील किती शेतकºयांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहेत, याची उत्सुकता मुख्यमंत्र्यांना असावी. त्यामुळेच त्यांनी कीटकनाशक फवारणीबाधित शेतकºयांच्या प्रश्नांवर आयोजित आढावा बैठकीत आवर्जून पिंपरी बुटीची माहिती घेतली. आपण भेट दिलेल्या गावातील एखाद्या शेतकºयाला प्रशासनाने निश्चितच प्रमाणपत्र दिले असेल, असे त्यांना वाटले. परंतु या बैठकीत त्यांनी जेव्हा पिंपरी बुटीतील कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा प्रशासनाकडे उत्तरच नव्हते.२९ शेतकºयांना १८ आॅक्टोबर रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्र एका सोहळ्यात वितरित करण्यात आले. या २९ शेतकºयांमध्ये पिंपरी बुटी येथील एकही शेतकरी नाही. विशेष म्हणजे, या यादीत यवतमाळ तालुक्यातील शेतकºयांचाही समावेश नाही. उलट १५ तालुक्यातील प्रत्येकी दोन गावातील शेतकºयांचा समावेश आहे. २९ शेतकºयांना २४ लाख ९२ हजार १६८ रुपयांची कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यवतमाळ तालुक्यातील शेतकºयांचा समावेश का टाळला, याचे उत्तर कुणाकडेही नव्हते.पिंपरीत २१६ पात्र शेतकरीशासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या यादीत पिंपरी बुटी येथील २१६ शेतकरी पात्र ठरले आहे. तर १७ शेतकरी अपात्र आणि चालू वर्षाचे २२ शेतकरी अपात्र आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केलेल्या गावातील २१६ पात्र शेतकºयांपैकी एकाही शेतकºयाला सन्मानपूर्वक कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांनीच यावर जाब विचारल्याने प्रशासन मात्र चांगलेच गोंधळले होते.