शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

तलाठी पद भरतीत पेसा दाखल्यांचा अडथळा, आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारले

By अविनाश साबापुरे | Updated: July 13, 2023 13:43 IST

राखीव ६०० जागांचा उपयोग तरी काय?

यवतमाळ : दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात तलाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र यात आदिवासींसाठी राखीव असलेल्या पेसा क्षेत्रातील ६०० जागांवर आदिवासी विद्यार्थ्यांनाच अर्ज करणे कठीण झाले आहे. येथे अर्ज भरताना पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखला जोडणे बंधनकारक असले तरी असे दाखले देण्यास ग्रामसेवकांनी नकार दिला आहे. त्यामुळे शेकडो आदिवासी उमेदवारांचे अर्ज अडलेले आहेत. 

राज्यात चार हजार ६४४ पदे भरण्यासाठी महसूल विभागामार्फत जिल्हा स्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये पेसा क्षेत्रातील जागांसाठी केवळ पेसा क्षेत्रातील रहिवासी उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. त्यामुळे असा रहिवासी दाखला संबंधित आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून घेऊन तो अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. परंतु, प्रकल्प कार्यालय त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडून आवश्यक ती कागदपत्रे व संबंधित गावचा रहिवासी असल्याचा दाखला मागत आहे. या बाबीला ग्रामसेवकांनी नकार दिला आहे.

विशेष म्हणजे पूर्णत: आदिवासीबहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातीलही अनेक गावांतील उमेदवारांना हा दाखला मिळालेला नाही. त्यात सिरोंचा तालुक्यातील २७, मुलचेरा तालुक्यातील १५३ आणि अहेरी तालुक्यातील तब्बल २०६ उमेदवारांचे अर्ज नाकारले गेले. त्यामुळे आदिवासी उमेदवारांना शैक्षणिक अहर्ता असूनही प्रकल्प कार्यालयाचा ‘पेसा रहिवासी’ दाखला नसल्याने अर्ज भरणे अशक्य झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीत अशी अट नव्हती. पदभरतीचा अर्ज भरण्यासाठी १७ जुलै ही शेवटची तारीख असून तत्पूर्वी पेसा क्षेत्रातील उमेदवारांना रहिवासी दाखल्याची अट रद्द करावी व मुदत ३० जुलैपर्यंत वाढवावी, अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅइज फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. मधुकर उईके यांनी केली. 

अडवणुकीचे कारण काय?

शासनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार पेसा (अनुसूचित) क्षेत्रातील पद स्थानिक रहिवासी असलेल्या एसटी प्रवर्गातील उमेदवारातून भरले जाणार आहे. स्थानिक आदिवासी उमेदवार म्हणजे, जो स्वत: किंवा त्याचे कुटुंबीय २६ जानेवारी १९५० पासून संबंधित पेसा गावात सलगपणे राहात आहे, असा उमदेवार. पेसा गावांची यादी भारत सरकारच्या १९८५ मधील राजपत्रात प्रकाशित झाली आहे. परंतु, त्या यादीत अनेक आदिवासीबहुल गावांचा समावेश नसल्याची बाब आता पुढे येत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनानेही वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करून अनेक गावांचा समावेश पेसा क्षेत्रात केला आहे. या बदलांबाबत अनेक ग्रामपंचायती व ग्रामसेवक अनभिज्ञ आहेत. असे दाखले देण्याचा ग्रामसेवकांना अधिकारच नसल्याची बाब त्यांच्या युनियनने स्पष्ट केली आहे. परंतु, प्रकल्प कार्यालय त्यांच्याच दाखल्यासाठी अडून बसले आहे.

कोणत्याही आदिवासी व्यक्तीला त्याच्या मूळ गावातील १९५० पूर्वीच्या महसुली पुराव्यांच्या आधारे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे भरतीसाठी पेसा रहिवासी दाखला मागण्याची गरज नाही. यातील संभ्रम संपविण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनीच आपल्या जिल्ह्यातील पेसा गावांची यादी जाहीर करावी. 

- प्रा. मधुकर उईके, अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅइज फेडरेशन

टॅग्स :jobनोकरीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना