शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोरोना बळींचा उच्चांक; 37 जण नेले, 810 पछाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 5:00 AM

सोमवारी झालेल्या एकूण ३७ मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ७५, ८०, ६५, ६०, ५७, ५५, ४५, ४५, ६५, ९७, ६० वर्षीय पुरुष आणि ६५, ४८, ७३, ६५, ३६, ६५, ७३, ४७  वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील  ५८, ५५ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला आदींचा समावेश आहे.

ठळक मुद्देअंत्यविधींची दाटी : सर्वाधिक २३ मृत्यू यवतमाळचे, ५७२० ॲक्टिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे मन हेलावून, हादरवून सोडणाऱ्या कोरोनाने दररोज अंत्यविधी पाहण्याचे दुर्दैवी दिवस आणले आहेत. रोज जीव घेणाऱ्या कोरोनाने सोमवारी मृत्यूसंख्येचा उच्चांक करीत तब्बल ३७ जणांचा बळी घेतला.  त्यातील २२ मृतक हे एकट्या यवतमाळातील आहेत. तर दिवसभरात जिल्ह्यातील आणखी ८१० जणांना बाधित करून या विषाणूने आपल्या जबड्यात ओढले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूचा आकडा ९२३ झाला असून सध्या ५७२० ॲक्टिव्ह रुग्णांची कोरोनाशी झुंज सुरू आहे.सोमवारी झालेल्या एकूण ३७ मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ७५, ८०, ६५, ६०, ५७, ५५, ४५, ४५, ६५, ९७, ६० वर्षीय पुरुष आणि ६५, ४८, ७३, ६५, ३६, ६५, ७३, ४७  वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील  ५८, ५५ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला आदींचा समावेश आहे. पुसद येथील ५५ वर्षीय महिला, पुसद तालुक्यातील ३६ वर्षीय पुरुष व ५५ वर्षीय महिला, वणी तालुक्यातील ५७ वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील ४० वर्षीय पुरुष व ४२, ५९ वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ५० वर्षीय महिला, आर्णी तालुक्यातील ५७ वर्षीय महिला, केळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, कळंब येथील ४९ वर्षीय महिला आणि घाटंजी तालुक्यातील ७५ वर्षीय महिला आदींचा मृतकांमध्ये समावेश आहे. तर खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ५१ वर्षीय महिला, उमरखेड येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.  सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या ८१० जणांमध्ये ४७५ पुरुष आणि ३३५ महिला आहेत. यात यवतमाळ येथील ३०० रुग्ण, पांढरकवडा १५२, उमरखेड ७५, दिग्रस ६९, पुसद ३३, वणी ३१, कळंब २९, नेर २८, बाभूळगाव २१, घाटंजी १२, मारेगाव ११, राळेगाव ११, महागाव १०, दारव्हा १०, आर्णी ९, झरीजामणी १ आणि इतर शहरातील ८ रुग्ण आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त माहितीनुसार, सोमवारी ४६१९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१० पॉझिटिव्ह आले. तर ३८०९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५७२० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी २७७० जण रुग्णालयात भरती आहेत. तर २९५० जण गृह विलगीकरणात रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१ हजार ४५७ झाली आहे. गेल्या २४ तासात ८९२ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ३४ हजार ८१४ आहे. तर जिल्ह्यात एकूण ९२३ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.८७ असून मृत्युदर २.२३ आहे.आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ३८९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी ३०९५ अप्राप्त आहेत. तसेच ३ लाख ४ हजार ८३७ नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले. 

यवतमाळच्या मोक्षधामात धगधगल्या २१ चिता

 कोरोना बळी वाढत असल्याने बहुतांश मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी प्रशासनावरच येवून पडत आहे. सोमवारी यवतमाळच्या पांढरकवडा रोड स्थित मोक्षधामात तब्बल २१ पार्थिवांना भडाग्नी देण्यात आला. स्मशानातील जागा आणि मृतदेहांची संख्या पाहून अंत्यविधीचे तीन टप्प्यात नियोजन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात १२ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार झाले. तर दुसऱ्या टप्प्यात ८ तर तिसऱ्या टप्प्यात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात धगधगणाऱ्या चिता पाहून मोक्षधामाचे वातावरणही गहिवरले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या