शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर दमदार पाऊस शेतकरी राजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. मात्र कृषी विभागाने शंभर मिमी पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे म्हटले आहे. ४ जूनपासून ११ जूनपर्यंत पावसाचा जिल्ह्यात खंड असणार आहे.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व लागवडीला वेग : उन्हाच्या दाहकतेतून सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी हजेरी लावली. यानंतर सतत दोन दिवस पाऊस कोसळला. आतापर्यंत १६ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. हा पाऊस शेतकऱ्यांना सुखावणारा आहे.विदर्भात पावसाला १० ते २० जूनच्या सुमारास प्रारंभ होतो. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस ३१ मे रोजी पोहोचला. मान्सूनच्या पावसाला सध्या विलंब असला तरी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. निसर्ग वादळाचा परिणाम बुधवारी जिल्ह्यात जाणवला. वादळ-वाºयाने जिल्ह्यातील वीज पुरवठा अनेक भागात खंडित झाला. वीज वितरण कंपनीचे खांब वाकून ताराही तुटल्या. यात वीज कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले. काही भागात वृक्ष उन्मळून पडले. पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. मात्र कृषी विभागाने शंभर मिमी पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे म्हटले आहे. ४ जूनपासून ११ जूनपर्यंत पावसाचा जिल्ह्यात खंड असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असेही स्पष्ट केले आहे.पेरणीपूर्व कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. काडी कचरा वेचणे, वखरण करणे ही कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहे. पेरणीसाठी रान तयार करून बी-बियाण्यांची व्यवस्था करण्यासाठी सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. कर्जमुक्तीस पात्र ठरल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना अद्यापही बँकांनी कर्ज माफ झाले अशी सूचनाच प्रसिद्ध केली नाही. यामुळे नव्याने कर्ज उपलब्ध होण्याची प्रक्रिया थांबली आहे. यातून शेतकऱ्यांपुढे बी-बियाणे, खत आणि इतर कामांसाठी आर्थिक अडचण भासत आहे.सरासरी १५ मिमी पावसाची नोंदजिल्ह्यात १ ते ३ जूनपर्यंत १५.७ मिमी पावसाची नोंद झाली. गत २४ तासात जिल्ह्यात ९.५५ मिमी पाऊस नोंदविला गेला. सर्वाधिक पावसाची नोंद केळापूर तालुक्यात करण्यात आली. या ठिकाणी ३२.७९ मिमी पाऊस कोसळला. यवतमाळात ७.५५ मिमी, बाभूळगाव १६.५ मिमी, कळंब १७.२१ मिमी, दारव्हा ८.८९ मिमी, दिग्रस २७ मिमी, आर्णी २०.५४ मिमी, नेर १५.४२ मिमी, पुसद १९.०३ मिमी, उमरखेड ११.६१ मिमी, महागाव २५.११ मिमी, वणी २.५९ मिमी, मारेगाव २.४० मिमी, झरी जामणी ३.७० मिमी, घाटंजी २१.५० मिमी, राळेगाव २८.४६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात गत तीन दिवसात ३४ मिमी पाऊस कोसळला. सर्वाधिक ५१ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात नोंदविला गेला. तर सर्वात कमी पावसाची नोंद मारेगाव तालुक्यात आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती