शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जिल्हाभर दमदार पाऊस शेतकरी राजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. मात्र कृषी विभागाने शंभर मिमी पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे म्हटले आहे. ४ जूनपासून ११ जूनपर्यंत पावसाचा जिल्ह्यात खंड असणार आहे.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व लागवडीला वेग : उन्हाच्या दाहकतेतून सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी हजेरी लावली. यानंतर सतत दोन दिवस पाऊस कोसळला. आतापर्यंत १६ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. हा पाऊस शेतकऱ्यांना सुखावणारा आहे.विदर्भात पावसाला १० ते २० जूनच्या सुमारास प्रारंभ होतो. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस ३१ मे रोजी पोहोचला. मान्सूनच्या पावसाला सध्या विलंब असला तरी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. निसर्ग वादळाचा परिणाम बुधवारी जिल्ह्यात जाणवला. वादळ-वाºयाने जिल्ह्यातील वीज पुरवठा अनेक भागात खंडित झाला. वीज वितरण कंपनीचे खांब वाकून ताराही तुटल्या. यात वीज कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले. काही भागात वृक्ष उन्मळून पडले. पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. मात्र कृषी विभागाने शंभर मिमी पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी असे म्हटले आहे. ४ जूनपासून ११ जूनपर्यंत पावसाचा जिल्ह्यात खंड असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असेही स्पष्ट केले आहे.पेरणीपूर्व कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. काडी कचरा वेचणे, वखरण करणे ही कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहे. पेरणीसाठी रान तयार करून बी-बियाण्यांची व्यवस्था करण्यासाठी सुरुवात केली आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. कर्जमुक्तीस पात्र ठरल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना अद्यापही बँकांनी कर्ज माफ झाले अशी सूचनाच प्रसिद्ध केली नाही. यामुळे नव्याने कर्ज उपलब्ध होण्याची प्रक्रिया थांबली आहे. यातून शेतकऱ्यांपुढे बी-बियाणे, खत आणि इतर कामांसाठी आर्थिक अडचण भासत आहे.सरासरी १५ मिमी पावसाची नोंदजिल्ह्यात १ ते ३ जूनपर्यंत १५.७ मिमी पावसाची नोंद झाली. गत २४ तासात जिल्ह्यात ९.५५ मिमी पाऊस नोंदविला गेला. सर्वाधिक पावसाची नोंद केळापूर तालुक्यात करण्यात आली. या ठिकाणी ३२.७९ मिमी पाऊस कोसळला. यवतमाळात ७.५५ मिमी, बाभूळगाव १६.५ मिमी, कळंब १७.२१ मिमी, दारव्हा ८.८९ मिमी, दिग्रस २७ मिमी, आर्णी २०.५४ मिमी, नेर १५.४२ मिमी, पुसद १९.०३ मिमी, उमरखेड ११.६१ मिमी, महागाव २५.११ मिमी, वणी २.५९ मिमी, मारेगाव २.४० मिमी, झरी जामणी ३.७० मिमी, घाटंजी २१.५० मिमी, राळेगाव २८.४६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात गत तीन दिवसात ३४ मिमी पाऊस कोसळला. सर्वाधिक ५१ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात नोंदविला गेला. तर सर्वात कमी पावसाची नोंद मारेगाव तालुक्यात आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती