शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पावसाचा कहर; कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला असून,उमरखेड तालुक्यात ५९  मिमी तर महागाव तालुक्यात ५९.७ मिमी पाऊस झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आर्णी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. बुधवारी पुन्हा जिल्ह्यात आर्णी तालुक्यात सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस झाला असून, उमरखेड, महागावसह वणी तालुक्यालाही पावसाने झोडपल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याची स्थिती आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला असून,उमरखेड तालुक्यात ५९  मिमी तर महागाव तालुक्यात ५९.७ मिमी पाऊस झाला आहे. यवतमाळ ३८.७, बाभूळगाव १२.७, कळंब ७.८, दारव्हा ३७.२, दिग्रस ३५.४, नेर ३८.२, पुसद ४०.६, वणी ४९.६, मारेगाव २१.१, झरी जामणी २८.१, केळापूर २५.६, घाटंजी ३८ तर राळेगाव तालुक्यात १२.६ मिमी पाऊस झाला आहे.  जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८०५ मिमी एवढे आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५४.४ टक्के पाऊस झाला आहे.  

अडाण प्रकल्पातूनही पाणी सोडणार

- यवतमाळ : अधूरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता धरणाचे आणखी चार दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात येऊन प्रकल्पाच्या सहा दरवाजातून १५० क्युमेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपारी १ च्या सुमारास आणखी चार दरवाजे २५ सेमीने उघडण्यात येऊन प्रकल्पातून ४०० क्युमेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी सतर्कता राहण्याचे आवाहन केले आहे. - सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाची पाणी पातळी ३७८.२७ मीटर असून या प्रकल्पात ४५.४१ टक्के जलाशय साठा झाला आहे. मंजूर जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे जुलै २०२२ अखेर जलाशय पातळी ३७९.८५ मीटर ६३ टक्केपर्यंत भरावयाचा आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पुढील २४ तासात प्रकल्पातील येव्यानुसार पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्याची शक्यता असल्याचे अडाण पाटबंधारे कालवे उपविभाग दारव्हातर्फे कळविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर