शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा कहर; कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला असून,उमरखेड तालुक्यात ५९  मिमी तर महागाव तालुक्यात ५९.७ मिमी पाऊस झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आर्णी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. बुधवारी पुन्हा जिल्ह्यात आर्णी तालुक्यात सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस झाला असून, उमरखेड, महागावसह वणी तालुक्यालाही पावसाने झोडपल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याची स्थिती आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला असून,उमरखेड तालुक्यात ५९  मिमी तर महागाव तालुक्यात ५९.७ मिमी पाऊस झाला आहे. यवतमाळ ३८.७, बाभूळगाव १२.७, कळंब ७.८, दारव्हा ३७.२, दिग्रस ३५.४, नेर ३८.२, पुसद ४०.६, वणी ४९.६, मारेगाव २१.१, झरी जामणी २८.१, केळापूर २५.६, घाटंजी ३८ तर राळेगाव तालुक्यात १२.६ मिमी पाऊस झाला आहे.  जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८०५ मिमी एवढे आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५४.४ टक्के पाऊस झाला आहे.  

अडाण प्रकल्पातूनही पाणी सोडणार

- यवतमाळ : अधूरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता धरणाचे आणखी चार दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात येऊन प्रकल्पाच्या सहा दरवाजातून १५० क्युमेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपारी १ च्या सुमारास आणखी चार दरवाजे २५ सेमीने उघडण्यात येऊन प्रकल्पातून ४०० क्युमेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी सतर्कता राहण्याचे आवाहन केले आहे. - सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाची पाणी पातळी ३७८.२७ मीटर असून या प्रकल्पात ४५.४१ टक्के जलाशय साठा झाला आहे. मंजूर जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे जुलै २०२२ अखेर जलाशय पातळी ३७९.८५ मीटर ६३ टक्केपर्यंत भरावयाचा आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पुढील २४ तासात प्रकल्पातील येव्यानुसार पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्याची शक्यता असल्याचे अडाण पाटबंधारे कालवे उपविभाग दारव्हातर्फे कळविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर