शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा कहर; कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला असून,उमरखेड तालुक्यात ५९  मिमी तर महागाव तालुक्यात ५९.७ मिमी पाऊस झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आर्णी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. बुधवारी पुन्हा जिल्ह्यात आर्णी तालुक्यात सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस झाला असून, उमरखेड, महागावसह वणी तालुक्यालाही पावसाने झोडपल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याची स्थिती आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला असून,उमरखेड तालुक्यात ५९  मिमी तर महागाव तालुक्यात ५९.७ मिमी पाऊस झाला आहे. यवतमाळ ३८.७, बाभूळगाव १२.७, कळंब ७.८, दारव्हा ३७.२, दिग्रस ३५.४, नेर ३८.२, पुसद ४०.६, वणी ४९.६, मारेगाव २१.१, झरी जामणी २८.१, केळापूर २५.६, घाटंजी ३८ तर राळेगाव तालुक्यात १२.६ मिमी पाऊस झाला आहे.  जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८०५ मिमी एवढे आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५४.४ टक्के पाऊस झाला आहे.  

अडाण प्रकल्पातूनही पाणी सोडणार

- यवतमाळ : अधूरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता धरणाचे आणखी चार दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात येऊन प्रकल्पाच्या सहा दरवाजातून १५० क्युमेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपारी १ च्या सुमारास आणखी चार दरवाजे २५ सेमीने उघडण्यात येऊन प्रकल्पातून ४०० क्युमेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी सतर्कता राहण्याचे आवाहन केले आहे. - सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाची पाणी पातळी ३७८.२७ मीटर असून या प्रकल्पात ४५.४१ टक्के जलाशय साठा झाला आहे. मंजूर जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे जुलै २०२२ अखेर जलाशय पातळी ३७९.८५ मीटर ६३ टक्केपर्यंत भरावयाचा आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पुढील २४ तासात प्रकल्पातील येव्यानुसार पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्याची शक्यता असल्याचे अडाण पाटबंधारे कालवे उपविभाग दारव्हातर्फे कळविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर