शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

पालकमंत्री, भाजप निशाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:13 PM

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दारव्हा मार्गे यवतमाळात दाखल झाली. सायंकाळी या यात्रेला संबोधित करताना जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, यवतमाळची गुन्हेगारी आणि त्याला सत्ताधारी भाजपकडून मिळणारे पाठबळ हेच विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या निशाण्यावर असल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा यवतमाळात मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दारव्हा मार्गे यवतमाळात दाखल झाली. सायंकाळी या यात्रेला संबोधित करताना जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, यवतमाळची गुन्हेगारी आणि त्याला सत्ताधारी भाजपकडून मिळणारे पाठबळ हेच विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या निशाण्यावर असल्याचे निदर्शनास आले.यवतमाळात दाखल झालेल्या शिवस्वराज्य यात्रेचा मुक्काम बायपासवरील एका लॉनमध्ये आहे. याच ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, वक्ते अमोल मिटकरी यांनी यात्रेला संबोधित केले. या चारही नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक विषयांनाच हात घातला. त्यातही यवतमाळची वाढती गुन्हेगारी हा विषय अग्रक्रमावर होता. यापूर्वी विधीमंडळात यवतमाळची गुन्हेगारी व त्याला मिळणारा सत्ताधाऱ्यांचा राजकीय ‘बुस्ट’ चांगलाच गाजला होता. तोच धागा पकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यवतमाळातील गुन्हेगारीची पोलखोल केली. यवतमाळचा उल्लेख त्यांनी राज्यातील दुसरी क्राईम कॅपिटल अशा शब्दात केला. यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडून गुन्हेगारांना उघडपणे मिळणारे पाठबळ हे कारणीभूत असल्याचे सांगितले. एकूणच भाजपचे मंत्री, स्वत: भाजप पक्ष राष्ट्रवादीच्या निशाण्यावर असल्याचे चित्र होते. त्या तुलनेत शिवसेनेला तेवढे टार्गेट केले गेले नसल्याचे दिसून आले.यवतमाळातील शेतकऱ्यांची स्थिती, कापूस उत्पादक जिल्हा असूनही बंद पडलेले प्रक्रिया उद्योग, केवळ नावालाच असलेल्या एमआयडीसी, तेथील उद्योगांची प्रतीक्षा, त्यामुळे निर्माण झालेली प्रचंड बेरोजगारी, संपूर्ण कर्जमाफीची केवळ आश्वासने, यवतमाळ शहरातील रस्त्यांची दोन-तीन मंत्री असूनही झालेली खस्ता हालत, पाच वर्षात काहीच न वाढलेले सिंचनाचे क्षेत्र, त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्यांचे सुरू असलेले सत्र अशा विविध मुद्यांवर या नेत्यांनी सत्ताधाºयांवर जोरदार टीका केली. ही शिवस्वराज्य यात्रा बुधवारी आर्णी मार्गे पुसदकडे प्रस्थान करणार आहे. या यात्रेत माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी मंत्री सुभाष ठाकरे, अनिल देशमुख, माजी आमदार संदीप बाजोरिया, आमदार प्रकाश गजभिये, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, हरीश कुडे, नानाभाऊ गाडबैले, अ‍ॅड. क्रांती राऊत, आशिष मानकर, निमीष मानकर, तारीक लोखंडवाला, राजेंद्र पाटील, पांडुरंग खांदवे आदी उपस्थित होते.यवतमाळकरांनो, सांगा बेंबळाचे पाणी मिळाले काय?राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यवतमाळातील उखडलेले रस्ते, अमृत योजना, नाट्यगृह, बेंबळा प्रकल्पावरून शहरासाठी आणले जाणारे पाणी, कापूस प्रक्रिया उद्योग, टेक्सटाईल झोन अशा विविध समस्यांना आपल्या भाषणातून हात घातला. बेंबळाचे पाणी यवतमाळला १० मे २०१८ येणार होते, मग ते आले का असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. युती सरकारकडून जनतेला केवळ आश्वासने दिली जात आहे. प्रत्यक्षात त्याची पूर्तता होताना कुठेच दिसत नाही. सरकारने विकासाची कामे केली असती तर ती जनतेला जागोजागी बघता आली असती. जिल्ह्यात भाजपचे मंत्री, पाच आमदार असताना कुणालाच यवतमाळच्या वैभवात भर घालणारे नाट्यगृह पूर्ण करता आले नाही. गेल्या पाच वर्षात या मंत्री-आमदारांनी जिल्ह्याचा नेमका कोणता विकास केला हे आधी सांगावे, असे आव्हान डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावारNCPराष्ट्रवादी काँग्रेस