शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

युतीपेक्षा आघाडीचेच सरकार बरे होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:30 IST

केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराने समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. विविध आघाड्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शेतकरी, शेतमजुरांवर तर भाजपा-सेना युती सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी, शेतमजुरांचा सूर : सर्वच घटक वैतागले, कर्जमाफीचा गुंताही सुटेना, उलट स्थिती बिघडली

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराने समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. विविध आघाड्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शेतकरी, शेतमजुरांवर तर भाजपा-सेना युती सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आर्णी तालुक्यात विविध क्षेत्रातील नागरिकांमधून हा सरसकट सूर ऐकायला मिळतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची नेते मंडळीही ही बाब मान्य करीत आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी तालुक्यातील दाभडी या गावी २० मार्च २०१४ ला देशभरातील शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून संवाद साधला होता. त्यावरून आता साडेचार वर्ष लोटली आहेत. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही तर उलट ती बिघडली. त्यावेळी मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नसल्याचे शेतकरी वर्ग सांगत आहे.मोदींच्या २० कलमीचे काय झाले ? - अ‍ॅड. शिवाजीराव मोघेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे म्हणाले, दाभडी येथे संपूर्ण देशातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी जनतेला २० आश्वासने दिली होती. मात्र त्यातील एकाचीही पूर्तता झाली नाही. या आश्वासनांच्यावेळी हंसराज अहीर, देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित असल्याने ते याचे साक्षीदार ठरले. मात्र त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याबाबत ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. समस्या निकाली काढण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीत शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. नोटबंदी, जीएसटीमुळे सामान्य जनतेला मोठा फटका बसला. आर्णी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कोणतीही ठोस विकास कामे झाली नाही. एकही नवीन उद्योग आला नाही. उलट तत्कालीन आघाडी सरकारने जिल्ह्यात पैनगंगा प्रकल्पासाठी ७७६ हेक्टर जमीन संपादित केली होती. प्रकल्पावर तब्बल ३५० कोटी रुपये खर्च केले होते. मात्र युती सरकारने या प्रकल्पाचे कामच बंद पाडले. म्हणूनच गेल्या साडेचार वर्षात वैतागलेली तमाम जनता युती पेक्षा आघाडीचेच सरकार बरे होते, असे जाहीररीत्या सांगत असून ही बाब शंभर टक्के खरीही असल्याचे अ‍ॅड. मोघे यांनी सांगितले.युती सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरले - आमदार ख्वाजा बेगराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांनीही सरकारवर टिकेची झोड उठविली. ते म्हणाले, सरकारने कोणतीही आश्वासने पाळली नाही. शेतकºयांच्या समस्या निकाली काढण्यात सरकारला अपयश आले. सोयाबीन, कपाशीला योग्य दर नाही. विविध समाजाच्या आरक्षणाचे गुºहाळ सुरूच आहे. सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढीव शुल्कावर अंकुश लावण्यातही सरकारला यश आले नाही. केवळ ‘अच्छे दिन आयेंगे’चे तुणतुणे वाजवीत दाभडी व लोणी गावाला दत्तक गाव घोषित केले. प्रत्यक्षात या गावांचाही विकास झाला नाही. त्यामुळेच पूर्वीचेच आघाडी सरकार चांगले होते, असा जनतेतील सूर असून तो खरा असल्याचे आमदार ख्वाजा बेग यांनी सांगितले.म्हणे, भाजपा-सेना विरोधी पक्षातच शोभतेशेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, बेरोजगार अशा सर्वांवरच काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकारच बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आघाडीनेच केंद्र व राज्यातील सरकार चालवावे, भाजपा-सेनेला ते जमले नाही, ते विरोधी पक्ष म्हणूनच योग्य भूमिका वठवू शकतात, अशा प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत. मागील सरकार आपत्तीच्या वेळी शेतकरी, शेतमजुरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. त्या सरकारचा खरोखरच आधार वाटत होता, असेही अनेकांनी सांगितले.

टॅग्स :Shivajirao Mogheशिवाजीराव मोघे