शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

युतीपेक्षा आघाडीचेच सरकार बरे होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:30 IST

केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराने समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. विविध आघाड्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शेतकरी, शेतमजुरांवर तर भाजपा-सेना युती सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी, शेतमजुरांचा सूर : सर्वच घटक वैतागले, कर्जमाफीचा गुंताही सुटेना, उलट स्थिती बिघडली

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराने समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. विविध आघाड्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शेतकरी, शेतमजुरांवर तर भाजपा-सेना युती सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आर्णी तालुक्यात विविध क्षेत्रातील नागरिकांमधून हा सरसकट सूर ऐकायला मिळतो आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची नेते मंडळीही ही बाब मान्य करीत आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी तालुक्यातील दाभडी या गावी २० मार्च २०१४ ला देशभरातील शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातून संवाद साधला होता. त्यावरून आता साडेचार वर्ष लोटली आहेत. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही तर उलट ती बिघडली. त्यावेळी मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नसल्याचे शेतकरी वर्ग सांगत आहे.मोदींच्या २० कलमीचे काय झाले ? - अ‍ॅड. शिवाजीराव मोघेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे म्हणाले, दाभडी येथे संपूर्ण देशातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी जनतेला २० आश्वासने दिली होती. मात्र त्यातील एकाचीही पूर्तता झाली नाही. या आश्वासनांच्यावेळी हंसराज अहीर, देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित असल्याने ते याचे साक्षीदार ठरले. मात्र त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याबाबत ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. समस्या निकाली काढण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीत शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. नोटबंदी, जीएसटीमुळे सामान्य जनतेला मोठा फटका बसला. आर्णी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात कोणतीही ठोस विकास कामे झाली नाही. एकही नवीन उद्योग आला नाही. उलट तत्कालीन आघाडी सरकारने जिल्ह्यात पैनगंगा प्रकल्पासाठी ७७६ हेक्टर जमीन संपादित केली होती. प्रकल्पावर तब्बल ३५० कोटी रुपये खर्च केले होते. मात्र युती सरकारने या प्रकल्पाचे कामच बंद पाडले. म्हणूनच गेल्या साडेचार वर्षात वैतागलेली तमाम जनता युती पेक्षा आघाडीचेच सरकार बरे होते, असे जाहीररीत्या सांगत असून ही बाब शंभर टक्के खरीही असल्याचे अ‍ॅड. मोघे यांनी सांगितले.युती सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरले - आमदार ख्वाजा बेगराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांनीही सरकारवर टिकेची झोड उठविली. ते म्हणाले, सरकारने कोणतीही आश्वासने पाळली नाही. शेतकºयांच्या समस्या निकाली काढण्यात सरकारला अपयश आले. सोयाबीन, कपाशीला योग्य दर नाही. विविध समाजाच्या आरक्षणाचे गुºहाळ सुरूच आहे. सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरले आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढीव शुल्कावर अंकुश लावण्यातही सरकारला यश आले नाही. केवळ ‘अच्छे दिन आयेंगे’चे तुणतुणे वाजवीत दाभडी व लोणी गावाला दत्तक गाव घोषित केले. प्रत्यक्षात या गावांचाही विकास झाला नाही. त्यामुळेच पूर्वीचेच आघाडी सरकार चांगले होते, असा जनतेतील सूर असून तो खरा असल्याचे आमदार ख्वाजा बेग यांनी सांगितले.म्हणे, भाजपा-सेना विरोधी पक्षातच शोभतेशेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, बेरोजगार अशा सर्वांवरच काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकारच बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आघाडीनेच केंद्र व राज्यातील सरकार चालवावे, भाजपा-सेनेला ते जमले नाही, ते विरोधी पक्ष म्हणूनच योग्य भूमिका वठवू शकतात, अशा प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत. मागील सरकार आपत्तीच्या वेळी शेतकरी, शेतमजुरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. त्या सरकारचा खरोखरच आधार वाटत होता, असेही अनेकांनी सांगितले.

टॅग्स :Shivajirao Mogheशिवाजीराव मोघे