शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

कामावर जायचे की पाणी भरायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:47 IST

हातपंपाचा परिसर म्हणून वंजारी फैलातील वसाहतीचा काही भाग ओळखला जातो. या हातपंपांना सध्या पाण्याचा थेंबही नाही. मात्र तुमच्या भागात हातपंप आहे.

ठळक मुद्देहातपंपाचा परिसर म्हणून टँकर येईना, सार्वजनिक टाकी मातीने भरली

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हातपंपाचा परिसर म्हणून वंजारी फैलातील वसाहतीचा काही भाग ओळखला जातो. या हातपंपांना सध्या पाण्याचा थेंबही नाही. मात्र तुमच्या भागात हातपंप आहे. मग तुम्हाला टँकरची आवश्यकता काय आहे? असे म्हणून या भागात टँकरच पाठविला जात नाही. आता आम्ही दिवसभर काम करायचे की पाण्यासाठी गावभर फिरायचे? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.आयुष्याची ६५ वर्षे झाली. पण असा दुष्काळ आम्ही पाहिला नाही. याच्या आधीही टंचाई आली. पण जीनातली विहीर, नाल्याकाठची विहीर यातून पाणी भरले. नळ आले अन् सारं चित्र बदलले. आता विहिरीत गाळ साचला आहे, असे मालती मार्इंदे म्हणाल्या.या भागात सर्वसामान्य, रोजमजुरी करणारे लोक राहतात. आठ ते १० दिवसापूर्वी टँकर आला. आता येतच नाही. रस्त्यावर टाक्या लावायला सांगितले. काहींना पाणी भेटले. काहींना नाही, असे सुषमा माडकुटे, नंदा राऊत, सुशिला ठाकरे, छाया डुमरे, सुनंदा शेंडे म्हणाल्या.नळाचे पाणी २१ दिवसांपूर्वी आले. त्या पाण्यात प्रचंड गाळ होता. पाणी पिवळं होतं. पाण्याला वास होता. आता पिण्याचे पाणी म्हणून जपून ठेवले. त्या पाण्यावर सारखी तुरटी फिरवली. जीवन ड्रॉप टाकला. भांड्यात खाली गाळच आहे. तसेच पाणी प्याव लागते. या पाण्यात भागत नाही. म्हणून साईनगर, पिंपळगाव, आदर्शनगर, पतंगे ले-आऊट या सारख्या भागातून पाणी आणावे लागते. अख्खी वस्ती रात्रभर पाण्यासाठी जागते. रोजमजुरी सोडून पाण्यासाठी थांबावे लागते. असे जया बगमारे, शिताबाई ठेंगरे, माया ठेंगरे, पुष्पा ठेंगरे, म्हणाल्या.काही भागात २४ तास नळ असते. आम्हाला पाणी नाही. या भागात पाणी वाटपासाठी टाकी बांधण्यात आली. दुष्काळात या टाकीत पाणी टाकले जात होते. तेथूनच पाणी नेल्या जायचे. आता या टाक्यात माती भरून आहे. यामुळे इतक्या मोठ्या टाक्याचा कुठलाच उपयोग होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यासाठी अतिरिक्त टँकर देण्यात यावे, शुध्द पाणी द्यावे असे मत नितीन माटे यांनी व्यक्त केले.गल्लीत टँकर जात नाही म्हणून आम्हाला रस्त्याच्या दोनही भागाकडच्या महिला पाणी भरण्यासाठी एन्ट्री देत नाही. आम्हाला पाणीच भेटले नाही, असे भागिरथाबाई मेश्राम, गिरजा शेळके, सरस्वती मेश्राम, सुशिला ठेंगरे म्हणाल्या.आमच्या भागात सरकारी स्टँडपोज होता. दुष्काळामुळे तो उपटून टाकला आता पाणी भरायला स्टँडपोजही नाही. हातपंप बंद पडला. दुरूस्ती झाली नाही, असे जोसना ठेंगरे, रेखा ठेंगरे, मिना नागमोते, वेणू मरगडे, मंगला ठाकरे, पुष्पा शेंडे म्हणाल्या. या भागात भांडणे करणाऱ्या लोकांनाच जास्त पाणी मिळते, असा आरोपही यावेळी काही महिलांनी केला.१०० रूपयात तीन ड्रमया भागात पाण्यासाठी दुसºया भागाकडे धाव घ्यावी लागते. काही खासगी बोअरधारक १०० रूपयाला तीन ड्रम पाणी विकतात. एका ड्रमला पाणी आणण्याचे ३० रूपये भाडे वेगळे द्यावे लागते.हापशी गाळाने भरलीकालीमाता मंदिराजवळील हापसीने या भागात आजपर्यंत पाणी प्रश्न सोडविला. ही हापसी आतून गाळल्या गेली आहे. त्याला क्रशिंग केले तर चांगले पाणी लागते.नाल्याच्या विहिरीत गाळनाल्याकाठच्या विहिरीत प्रचंड पाणी आहे. पण त्यात गाळ मोठ्या प्रमाणात आहे. हा गाळ उपसला तर या भागात पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्याची खबरदारी घेण्याची गरज आहे.उलट्या आणि हगवणयाच भागातील काही ठिकाणी टँकरच्या पाणी पुरवठ्यातून जलजन्य आजार उद्भवल्याची माहिती नंदा चव्हाण, लिना सोनी, शोभा बिडवे, आशा जायभाये यांनी दिली. पाण्यामुळे अंगावर खाज येत आहे. लहान मुलांना हगणवण, उलट्या होत असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Waterपाणी