शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

राळेगाव शहरात नळाची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा संताप सोमवारी नागरिकांनी नळयोजनेची अंत्ययात्रा काढून व्यक्त केला. काही आंदोलकांनी ...

ठळक मुद्देकृत्रिम पाणीटंचाईवर आंदोलन : आंदोलकांनी केले मुंडण, एसडीओकडे दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा संताप सोमवारी नागरिकांनी नळयोजनेची अंत्ययात्रा काढून व्यक्त केला. काही आंदोलकांनी मुंडण केले. महिला, पुरुषांनी अंत्ययात्रेत सहभाग नोंदवत तिरडीला खांदाही दिला.शहराचा पाणीप्रश्न मागील अनेक महिन्यांपासून गंभीर झाला आहे. नगरपंचायतीला तोंडी, लेखी सूचना करूनही दुर्लक्ष करण्यात आले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे यासाठी त्यांनाही साकडे घालण्यात आले. तरीही हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने कुणाकडून प्रयत्न झाले नाही. हातपंप, विहीरींनी तळ गाठला आहे. कळमनेर येथून पाणी ओढण्यासाठी पाईप लाइनकरीता पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रत्येक दोन-चार दिवसात ही पाईप लाइन फुटते. दोन आठवड्यानंतर केव्हा तरी आलेल्या नळाचे पाणी केवळ अर्धा ते पाऊण तास येते.सोमवारी राळेगाव शहर पाणी टंचाईग्रस्त महिला समितीच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा नेण्यात आला. मुंडण करून पाणी पुरवठा योजनेची अंत्ययात्रा काढण्यात आली. वाºहा बायपास ते पाण्याच्या टाकीपर्यंतची पाइप लाईन सिमेंट रोडखाली दबली आहे. ही लाईन दुरुस्त करावी, निकृष्ट पाईप लाइनची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. सार्वजनिक विहीरी स्वच्छ करून वॉर्डा-वॉर्डात पाणी पुरवावे आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. घागरी फोडून नगरपंचायतच्या दुर्लक्षित कारभाराचा निषेध नोंदविण्यात आला. अपक्ष नगरसेवक शशिकांत धुमाळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यापूर्वीही त्यांनी हा प्रश्न शासन दरबारी मांडला आहे.पाणी प्रश्नाला नगरपंचायत जबाबदारराळेगाव शहरातील पाणीप्रश्न नगरपंचायतीची अकार्यक्षमता, नियोजनशृून्यता यामुळे निर्माण झाली असल्याचे आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. सदर प्रश्न गंभीर होत असल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जीवन प्राधिकरण, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांची तातडीची बैठक घेवून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बेंबळा प्रकल्पातील आरक्षित पाण्याची उचल, एक्स्प्रेस फिडरची नियमित वीज, पाण्याच्या उपशासाठी अतिरिक्त मोटारपंप, शहरातील पाणी वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावर तत्काळ कारवाईचे निर्देश उपविभागीय अधिकाºयांना दिले आहे, असे आमदार डॉ. प्रा.अशोक उईके म्हणाले.