शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

‘मजीप्रा’वर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:09 PM

गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला.

ठळक मुद्देवाहनाची हवा सोडली : तुकडोजीनगरात पाणी नाही, पालिकेवरही धडक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला. तर दुसरीकडे बांगरनगरातील महिलांनी नगरपरिषदेवर धडक देत पाणीपुरवठा विभागाच्या कक्षात ठिय्या दिला.शहरातील पाणी प्रश्नाने बिकट रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. पाण्याची व्यथा मांडण्यासाठी आलेल्या या महिलांना कार्यकारी अभियंताच भेटले नाही. यामुळे मोर्चेकरी महिलांची तीव्र नाराजी झाली. त्यांनी प्राधिकरणाच्या कामकाजावर संताप नोंदविला.तुकडोजीनगरामध्ये गत महिनाभरापासून नळ नाही. या भागात १० ते १२ दिवसानंतरच टँकर फिरकतो. यात अर्धा ड्रम पाणी मिळते. या पाण्यात कसे होणार, असा प्रश्न या भागातील महिलांनी उपस्थित करीत प्राधिकरणाचे पाणी देण्याची मागणी केली. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना केल्यानंतरही नळ सोडले जात नााही. काही भागात चार ते पाच दिवसापासून नळ सुरू आहे. मात्र तुकडोजीनगराला पाणी मिळत नाही, अशी खंत या महिलांनी अभियंत्यापुढे व्यक्त केली. जीवन प्राधिकरणाचे नियोजन चुकले. प्रशासनाने कामकाजात दिरंगाई केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पाणी न मिळाल्यास बुधवारपासून उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला. यावेळी महिलांनी आंदोलनाचा एक भाग म्हणून जीवन प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडली. यावेळी छाया सपाट, अर्चना गिरोळकर, संगीता चातूरकर, संध्या भोयर, कांता अंबागरे, लिला राऊत, सुधा भोयर, मंदा तपके, आशा सोनकुसरे, छबू पखाले उपस्थित होत्या. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून उपाययोजना तोकड्या पडत असल्याने नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. या संतापाला वाट मोकळी करण्यासाठी दररोज मोर्चे धडकत आहेत.विशिष्ट घरांनाच पाणीपुरवठाप्रत्येक वॉर्डात पाणीवाटपासाठी टँकर देण्यात आले आहे. मात्र नगरसेवक विशिष्ट घरांनाच पाण्याचे वाटप करतात, असा आरोप तुकडोजीनगरातील महिलांनी केला आहे. बांगरनगरामध्येही २५ दिवसांपासून नळ नाही. १० ते १५ दिवसानंतर या ठिकाणी टँकर फिरकतो. यामुळे महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहे, असा आरोप बांगरनगरातील महिलांनी केला आहे. यावेळी सुनिता बोरकर, वंदना आगमे, रूपाली उपरकार, सोनाली मेश्राम, प्रज्ञा बिडवे, महानंदा इंगळे, मिरा खांदवे, शांता वांडरे, दीपमाला राठोड उपस्थित होत्या.