शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

सेना, काँग्रेसचा उमेदवार निश्चित, गवळी-राठोड यांचे मनोमीलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:24 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

- राजेश निस्तानेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना एकसंघ होती, शिवाय मोदी लाटेचाही फायदा झाला. परंतु यावेळी खासदार भावना गवळी व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यात वितुष्ट आल्याने शिवसेना दुभंगली. ‘मातोश्री’ने पुढाकार घेऊन या दोन्ही नेत्यांमध्ये नुकताच ‘समझोता’ घडवून आणला. मात्र तो किती यशस्वी होतो हे वेळच सांगेल.काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जाते. ते तब्बल २० वर्षांनंतर समोरच्या दाराने निवडणूक लढणार आहेत. प्रदेश संसदीय मंडळाने ठाकरेंचे एकमेव नाव दिल्लीत पाठविले. मात्र त्यानंतरही गतवेळच्या पराभूत उमेदवारासह चौघे अजूनही तिकिटासाठी जोर लावून आहेत. त्यांच्या सातत्याने मुंबई-दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. काँग्रेस व शिवसेनेकडून निश्चित झालेला मराठा उमेदवार, काँग्रेसमधील गटबाजी, शिवसेनेतही पडलेले गट, सामाजिक समीकरणे बघता बंजारा समाजाचा तिसरा पर्याय येथे प्रभावी ठरू शकतो.काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षात गटबाजी असली तरी सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार असल्याने लोकसभेत या गटबाजीचे तेवढे परिणाम दिसणार नाहीत, असे मानले जाते. संजय राठोड यांची समजूत काढून ‘मातोश्री’ने या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व आणि भावनातार्इंच्या विजयाची जबाबदारी राठोड यांच्याच खांद्यावर सोपविली आहे. तार्इंनीही ‘झाले गेले विसरून जा’ असे म्हणून नमते घेतले आहे. तरीही सेनेचा पराभव झाल्यास त्याचे बहुतांश खापर राठोड यांच्यावर फुटण्याची शक्यता आहे. मनोमिलन झाले मग सेना नवा चेहरा देणार याचा प्रचार पुन्हा कशासाठी, हा प्रश्न आहे. ते पाहता मनोमिलन केवळ देखावा तर नाही अशी शंका व्यक्त होत आहे.अशीच काहीशी स्थिती काँग्रेसमध्ये आहे. माणिकराव ठाकरेंचे नाव उमेदवारीसाठी गेल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ माजी मंत्र्यांचा गट नाराज आहे. मात्र समोर विधानसभा असल्याने माणिकरावांच्या विरोधात काम करून मराठा समाजाची नाराजी ओढवून घेणे हे माजी मंत्री व त्यांच्या पाठीराख्यांना परवडणारे नाही. या ज्येष्ठ माजी मंत्र्यांचे त्यांच्या समाजात खरोखरच किती ऐकले जाते, हे पाहणेही महत्वाचे ठरते. या लोकसभा मतदारसंघात सहापैकी चार भाजपाचे व एक सेनेचा आमदार असल्याने गवळींच्या विजयाची खरी जबाबदारी त्यांच्यावर आहे. गवळी पराभूत म्हणजे मोदींना नुकसान हे गणित डोळ्यापुढे ठेवण्याचे टार्गेट या आमदारांना भाजपाकडून दिले जाऊ शकते.सध्याची परिस्थितीवर्धा-यवतमाळ-नांदेड हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प संथगतीने सुरू आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर या नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतराचीही चिन्हे दिसत नाहीत.‘मातोश्री’वरून सेनेच्या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन करण्यात आले असले तरी ते खरोखरच झाले का ? याचा पुरावा लोकसभेच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे.काँग्रेसची मदार दलित, अल्पसंख्यक, ओबीसी मतदारांवर आहे. मात्र येथे वंचित बहुजन आघाडी, बसपाचा उमेदवार किती चालतो, यावर काँग्रेसचे विजयाचे गणित अवलंबून आहे.जिल्ह्यात बंजारा समाज, आदिवासी समाज निर्णायक आहे. ना. संजय राठोड यांनी पोहरादेवीत दाखविलेली शक्ती मनोमिलनानंतर सेनेकडे वळते का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस