शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सेना, काँग्रेसचा उमेदवार निश्चित, गवळी-राठोड यांचे मनोमीलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:24 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

- राजेश निस्तानेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना एकसंघ होती, शिवाय मोदी लाटेचाही फायदा झाला. परंतु यावेळी खासदार भावना गवळी व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यात वितुष्ट आल्याने शिवसेना दुभंगली. ‘मातोश्री’ने पुढाकार घेऊन या दोन्ही नेत्यांमध्ये नुकताच ‘समझोता’ घडवून आणला. मात्र तो किती यशस्वी होतो हे वेळच सांगेल.काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जाते. ते तब्बल २० वर्षांनंतर समोरच्या दाराने निवडणूक लढणार आहेत. प्रदेश संसदीय मंडळाने ठाकरेंचे एकमेव नाव दिल्लीत पाठविले. मात्र त्यानंतरही गतवेळच्या पराभूत उमेदवारासह चौघे अजूनही तिकिटासाठी जोर लावून आहेत. त्यांच्या सातत्याने मुंबई-दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. काँग्रेस व शिवसेनेकडून निश्चित झालेला मराठा उमेदवार, काँग्रेसमधील गटबाजी, शिवसेनेतही पडलेले गट, सामाजिक समीकरणे बघता बंजारा समाजाचा तिसरा पर्याय येथे प्रभावी ठरू शकतो.काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षात गटबाजी असली तरी सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार असल्याने लोकसभेत या गटबाजीचे तेवढे परिणाम दिसणार नाहीत, असे मानले जाते. संजय राठोड यांची समजूत काढून ‘मातोश्री’ने या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व आणि भावनातार्इंच्या विजयाची जबाबदारी राठोड यांच्याच खांद्यावर सोपविली आहे. तार्इंनीही ‘झाले गेले विसरून जा’ असे म्हणून नमते घेतले आहे. तरीही सेनेचा पराभव झाल्यास त्याचे बहुतांश खापर राठोड यांच्यावर फुटण्याची शक्यता आहे. मनोमिलन झाले मग सेना नवा चेहरा देणार याचा प्रचार पुन्हा कशासाठी, हा प्रश्न आहे. ते पाहता मनोमिलन केवळ देखावा तर नाही अशी शंका व्यक्त होत आहे.अशीच काहीशी स्थिती काँग्रेसमध्ये आहे. माणिकराव ठाकरेंचे नाव उमेदवारीसाठी गेल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ माजी मंत्र्यांचा गट नाराज आहे. मात्र समोर विधानसभा असल्याने माणिकरावांच्या विरोधात काम करून मराठा समाजाची नाराजी ओढवून घेणे हे माजी मंत्री व त्यांच्या पाठीराख्यांना परवडणारे नाही. या ज्येष्ठ माजी मंत्र्यांचे त्यांच्या समाजात खरोखरच किती ऐकले जाते, हे पाहणेही महत्वाचे ठरते. या लोकसभा मतदारसंघात सहापैकी चार भाजपाचे व एक सेनेचा आमदार असल्याने गवळींच्या विजयाची खरी जबाबदारी त्यांच्यावर आहे. गवळी पराभूत म्हणजे मोदींना नुकसान हे गणित डोळ्यापुढे ठेवण्याचे टार्गेट या आमदारांना भाजपाकडून दिले जाऊ शकते.सध्याची परिस्थितीवर्धा-यवतमाळ-नांदेड हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प संथगतीने सुरू आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर या नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतराचीही चिन्हे दिसत नाहीत.‘मातोश्री’वरून सेनेच्या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन करण्यात आले असले तरी ते खरोखरच झाले का ? याचा पुरावा लोकसभेच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे.काँग्रेसची मदार दलित, अल्पसंख्यक, ओबीसी मतदारांवर आहे. मात्र येथे वंचित बहुजन आघाडी, बसपाचा उमेदवार किती चालतो, यावर काँग्रेसचे विजयाचे गणित अवलंबून आहे.जिल्ह्यात बंजारा समाज, आदिवासी समाज निर्णायक आहे. ना. संजय राठोड यांनी पोहरादेवीत दाखविलेली शक्ती मनोमिलनानंतर सेनेकडे वळते का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस