शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

राज्यात शेतासाठी धुके,थंडीचे व्यवस्थापन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:33 PM

शेतीचा डॉक्टर : काही दिवसात थंडीसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे.

- डॉ. प्रमोद यादगिरवार (यवतमाळ)

राज्यात विविध ठिकाणी अलीकडे अनेक भागात पाऊस पडला, या पावसामुळे रात्रीपासून पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात धुके संचारत असते. अशा प्रकारच्या धुक्यामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. विशेषत: हिरव्या कपाशीवर, तुरीवर, फळझाडांवर जास्त परिणाम होतो. पाऊस पडून गेल्यावर काही दिवसात थंडीसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पिकांवर पोटॅशियमयुक्त खताची थोडीफार फवारणी केल्यास वातावरणातील लगेच बदलाच्या धक्क्यापासून बचाव होईल.

संध्याकाळी व पहाटेच्या वेळेस शेतात शेकोटी पेटवून धूर केल्यास धुके व थंडी यापासून होणाऱ्या नुकसानीला रोखता येईल. आभाळ आणि धुके असल्यास किडींची प्रजनन शक्ती व क्रियाशिलता वाढते. म्हणून तूर व हरभरा पिकात अळीच्या प्रादुर्भावाविषयी विशेष जागरूक राहणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी निंबोळी ५%  किंवा बाजारातील सीआयबी शिफारशीत अझॅडिरॅक्टीनची फवारणी केल्यास पिकावर किडीचे अंडी सोडणाऱ्या मादींना परावृत्त करता येईल, थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जमिनीवर पालापाचोळा, हिरव्या गवताचे आच्छादन टाकावे व हलके पाणी दिल्याससुद्धा फायदा होईल.

अळ््यांची तीव्रता जास्त आढळल्यास  म्हणजेच दोन अळ््या प्रतिमीटर इतकी असल्यास इमॅमेट्टीन बेंझोएट किंवा क्रोलट्रॉमीपॉल साडेतीन मिली प्रति दहा लिटर पाणी या किटकनाशकाची फवारणी करावी. शेतशिवारात पक्षीथांबे व कामगंध सापळे लावावेत. राज्यात या वातावरणामुळे हिरव्या अळींचा प्रादुर्भाव  हरभऱ्यावर जाणवत आहे. शेतकऱ्यांनी जागरूक राहून उपाययोजना करावी.

(लेखक हे यवतमाळ येथील मध्य विदर्भ विभागातील विभागीय कृषी संशोधन केंद्रामध्ये सहयोगी संचालक आहेत.) 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी