घोन्सा येथील आगीत तीन जनावरे होरपळून ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST2020-12-23T05:00:00+5:302020-12-23T05:00:07+5:30

घोन्सा येथील विमल कान्होबा कोटरंगे यांचे ओलिताचे शेत आहे. या शेतात जनावरांसाठी गोठा तयार करण्यात आला होता. नेहमीप्रमाणे या गोठ्यात जनावरे बांधून होती. तसेच कोंबड्याही खुराड्यात ठेवून होत्या. मात्र सोमवारी रात्री या शेताजवळ असलेल्या विद्युत रोहित्राजवळील तार शेतातील कुंपणावर पडला. त्यामुळे विजेचा प्रवाह कुंपणात शिरला. परिसरातील जवळपास सर्वच शेतातील कुंपणामध्ये हा प्रवाह कायम होता. अशातच रात्री १२ वाजताच्या सुमारास गोठ्यातील कुटाराने पेट घेतला.

The fire at Ghonsa killed three animals on the run | घोन्सा येथील आगीत तीन जनावरे होरपळून ठार

घोन्सा येथील आगीत तीन जनावरे होरपळून ठार

ठळक मुद्दे३० कोंबड्यांचा मृत्यू : संपूर्ण गोठा सापडला आगीच्या भक्ष्यस्थानी, चार लाखांचे नुकसान

  लोकमत न्यूज नेटवर्क 
वणी : तालुक्यातील घोन्सा येथे गावालगत असलेल्या शेतातील गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत ३० कोंबड्या जळून खाक झाल्या, तर तीन जनावरे गंभीर जखमी झाली. या आगीत जवळपास चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. 
घोन्सा येथील विमल कान्होबा कोटरंगे यांचे ओलिताचे शेत आहे. या शेतात जनावरांसाठी गोठा तयार करण्यात आला होता. नेहमीप्रमाणे या गोठ्यात जनावरे बांधून होती. तसेच कोंबड्याही खुराड्यात ठेवून होत्या. मात्र सोमवारी रात्री या शेताजवळ असलेल्या विद्युत रोहित्राजवळील तार शेतातील कुंपणावर पडला. त्यामुळे विजेचा प्रवाह कुंपणात शिरला. परिसरातील जवळपास सर्वच शेतातील कुंपणामध्ये हा प्रवाह कायम होता. अशातच रात्री १२ वाजताच्या सुमारास गोठ्यातील कुटाराने पेट घेतला. त्यानंतर संपूर्ण गोठ्याला या आगीने आपल्या कवेत घेतले. यावेळी गोठ्यात बांधून असलेला एक बैल, एक गाय व गोऱ्हा होरपळून जागीच ठार झाला, तर एक बैल व दोन गायी जीवाच्या आकांताने दावणी सोडून गोठ्याबाहेर निघाल्या. यातील बैल ९० टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर होती, तर गायीलासुद्धा दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. या आगीत ३० कोंबड्याही जळून खाक झाल्या. तसेच कुटार, खत, शेती साहित्य, स्प्रिंक्लर पाईप जागीच जळून खाक झाले. आगीत शेतकऱ्याचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले. याबाबत तलाठ्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सकाळी पंचनामा केला. ऐन हंगामात चार लाखांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कोटरंगे यांनी केली आहे.

Web Title: The fire at Ghonsa killed three animals on the run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग