शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

अखेर साखर कारखाना विकला

By admin | Updated: February 29, 2016 02:08 IST

शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची अखेर थकीत कर्जापोटी राज्य बँकेने विक्री केली.

४३ कोटी ९५ लाख किंमत : उस्मानाबाद जिल्ह्यातील नॅचरल शुगरचा ताबा महागाव : शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची अखेर थकीत कर्जापोटी राज्य बँकेने विक्री केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजनी येथील नॅचरल शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि. कंपनीने हा कारखाना ४३ कोटी ९५ लाख रुपये किमतीत विकत घेतला. पुसद-महागाव उपविभागातील शेतकरी कारखानदार व्हावा या उद्देशाने माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने गुंज येथे सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला होता. या कारखान्यामुळे शेकडो हातांंना काम मिळाले होते. परंतु अंतर्गत राजकारण आणि विविध कारणांनी हा साखर कारखाना डबघाईस आला. अखेर त्यावर अवसायक नेमण्यात आला. राज्य बँकेने आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्यावर ताबा मिळविला. त्यानंतर या कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. २६ फेब्रुवारी रोजी कारखाना विक्रीची निविदा मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीत उघडण्यात आली. कारखाना विक्रीची अपेक्षित किंमत राज्य बँकेने ४३ कोटी ६४ लाख रुपये ठेवली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजनी येथील नॅचरल शूगरने ४३ कोटी ९५ लाख रुपये रकमेची निविदा भरल्यामुळे हा कारखाना या कंपनीला विकला गेला. ४३ कोटी ९५ लाख रुपयांची मशनरी, कारखान्याची जमीन अन्य साहित्य विकले गेले आहे. विशेष म्हणजे या कंपनीने कर्मचारी पगार, अकृषक कराचा भरणा, पाणी कर अन्य देणे लावून घेतल्यामुळे खरेदीची किंमत ५३ कोटीपर्यंत गेली आहे. कारखाना खरेदीची एकच निविदा आल्यामुळे अपेक्षित किंमतीच्या आगावू रकमेचा भरणा केल्याने नॅचरल शूगरला हा कारखाना देण्यात आला. नॅचरल शूगरही मोठी कंपनी असून कंपनीजवळ पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना आहे. या कारखान्याचे अनेक उत्पादनेही आहेत. त्याच धर्तीवर सुधाकरराव नाईक साखर कारखाना चालविण्याचा कंपनीचा मानस आहे. मुबलक पाणी आणि गाडी बैलाचे संपूर्ण क्षेत्र असल्याने या कारखान्यात पुढल्या वर्षीच उत्पादन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी) सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानामहागावपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर सुधाकरराव नाईक साखर कारखाना आहे. हा साखर कारखाना गत पाच वर्षांपासून बंद आहे. मध्यंतरी या कारखान्यावर आणलेली जप्ती शेतकऱ्यांनी हाणून पाडली होती. परंतु त्यानंतर मुंबईत झालेल्या बैठकीत उपविभागातील नेत्यांनी हा कारखाना राज्य बँकेच्या ताब्यात दिला. त्यांनी आपल्या थकीत कर्जासाठी कारखाना विक्रीस काढला. त्यावेळी नेत्यांनी या कारखान्याची विक्री होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. परंतु अखेर हा कारखाना खासगी कंपनीला विकला गेला.