शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

अखेर साखर कारखाना विकला

By admin | Updated: February 29, 2016 02:08 IST

शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची अखेर थकीत कर्जापोटी राज्य बँकेने विक्री केली.

४३ कोटी ९५ लाख किंमत : उस्मानाबाद जिल्ह्यातील नॅचरल शुगरचा ताबा महागाव : शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची अखेर थकीत कर्जापोटी राज्य बँकेने विक्री केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजनी येथील नॅचरल शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि. कंपनीने हा कारखाना ४३ कोटी ९५ लाख रुपये किमतीत विकत घेतला. पुसद-महागाव उपविभागातील शेतकरी कारखानदार व्हावा या उद्देशाने माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने गुंज येथे सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला होता. या कारखान्यामुळे शेकडो हातांंना काम मिळाले होते. परंतु अंतर्गत राजकारण आणि विविध कारणांनी हा साखर कारखाना डबघाईस आला. अखेर त्यावर अवसायक नेमण्यात आला. राज्य बँकेने आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्यावर ताबा मिळविला. त्यानंतर या कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. २६ फेब्रुवारी रोजी कारखाना विक्रीची निविदा मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीत उघडण्यात आली. कारखाना विक्रीची अपेक्षित किंमत राज्य बँकेने ४३ कोटी ६४ लाख रुपये ठेवली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजनी येथील नॅचरल शूगरने ४३ कोटी ९५ लाख रुपये रकमेची निविदा भरल्यामुळे हा कारखाना या कंपनीला विकला गेला. ४३ कोटी ९५ लाख रुपयांची मशनरी, कारखान्याची जमीन अन्य साहित्य विकले गेले आहे. विशेष म्हणजे या कंपनीने कर्मचारी पगार, अकृषक कराचा भरणा, पाणी कर अन्य देणे लावून घेतल्यामुळे खरेदीची किंमत ५३ कोटीपर्यंत गेली आहे. कारखाना खरेदीची एकच निविदा आल्यामुळे अपेक्षित किंमतीच्या आगावू रकमेचा भरणा केल्याने नॅचरल शूगरला हा कारखाना देण्यात आला. नॅचरल शूगरही मोठी कंपनी असून कंपनीजवळ पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना आहे. या कारखान्याचे अनेक उत्पादनेही आहेत. त्याच धर्तीवर सुधाकरराव नाईक साखर कारखाना चालविण्याचा कंपनीचा मानस आहे. मुबलक पाणी आणि गाडी बैलाचे संपूर्ण क्षेत्र असल्याने या कारखान्यात पुढल्या वर्षीच उत्पादन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी) सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानामहागावपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर सुधाकरराव नाईक साखर कारखाना आहे. हा साखर कारखाना गत पाच वर्षांपासून बंद आहे. मध्यंतरी या कारखान्यावर आणलेली जप्ती शेतकऱ्यांनी हाणून पाडली होती. परंतु त्यानंतर मुंबईत झालेल्या बैठकीत उपविभागातील नेत्यांनी हा कारखाना राज्य बँकेच्या ताब्यात दिला. त्यांनी आपल्या थकीत कर्जासाठी कारखाना विक्रीस काढला. त्यावेळी नेत्यांनी या कारखान्याची विक्री होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. परंतु अखेर हा कारखाना खासगी कंपनीला विकला गेला.