शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:00:31+5:30
तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही प्रमुख पिके बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी या शेतमालाचे दर जून महिन्यात वाढतात. यावर्षी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर नियंत्रणाखाली आले आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर चार हजारांवर पोहोचतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात सोयाबीनचे दर ३४०० ते ३७०० पर्यंतच मर्यादित राहिले आहे.

शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस काढले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळा तोंडावर येवून पोहोचला आहे. तत्पूर्वी पेरणीची तजवीज करण्यासाठी राखून ठेवलेले धान्य शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढले आहे. यातून बाजारात एकच गर्दी उसळली आहे. यामुळे पावसाळ््याच्या तोंडावर हातात पडणारी दरवाढ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरवर्षी शेतकरी पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवतात. दर वाढण्याची शक्यता असणाऱ्या धान्याचा यामध्ये समावेश आहे. यावर्षी कोरोनामुळे संपूर्ण गणितच बिघडले आहे. कुठल्याही धान्याची दरवाढ झाली नाही, उलट शेतमालाच्या किंमतीत घसरण नोंदविण्यात आली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
तूर, हरभरा, गहू, सोयाबीन ही प्रमुख पिके बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दरवर्षी या शेतमालाचे दर जून महिन्यात वाढतात. यावर्षी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारपेठेत दर नियंत्रणाखाली आले आहे. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर चार हजारांवर पोहोचतील, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात सोयाबीनचे दर ३४०० ते ३७०० पर्यंतच मर्यादित राहिले आहे. हरभराच्या बाबतीतही असेच घडले आहे. हरभऱ्याचे दर ३४०० ते ३६०० पर्यंत स्थिर राहिले आहे. तुरीच्या दरानेही शेतकऱ्यांना दगा दिला. ४७०० ते ५२०० रुपये क्ंिवटल दराने तुरीची खरेदी होत आहे. गव्हाचे दर १६०० ते १७०० रुपये क्ंिवटलपर्यंत मर्यादित आहे. यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची अपेक्षा होती. मात्र दरवाढ मिळाली नाही, उलट वजन घटल्याने शेतकऱ्यांना कमी पैसे आणि कमी दर शेतमाल विकून हातात आला आहे. या पैशांवर शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन करावे लागणार आहे.
पावसाचा अंदाज आणि गर्दीचा ओघ
हवामान विभागाने ११ ते १५ जून या कालावधीत पावसाचा जोर राहणार असल्याचे म्हटले आहे. बाजार समितीच्या आवारात शेतमालाचा सुरक्षित लिलाव करता यावा यासाठी पुरेशे शेड उपलब्ध नाहीत. यामुळे बाजारात धान्य विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमाल संरक्षणाचीही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.