शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

शेतकरी-शास्त्रज्ञांतील संपर्क, संवादच हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:20 IST

महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांच्यात संवादच नसल्याची खंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. देअर इज टोटल डिसकनेक्ट बिटष्ट्वीन प्रायोरिटीज आॅफ फार्मर्स अँड युनिव्हर्सिटी, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देराज्यपालांची खंत : वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांच्यात संवादच नसल्याची खंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. देअर इज टोटल डिसकनेक्ट बिटष्ट्वीन प्रायोरिटीज आॅफ फार्मर्स अँड युनिव्हर्सिटी, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सुसज्ज इमारतीचे लोकार्पण बुधवारी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कुलपती या नात्याने त्यांनी कृषी विद्यापीठांच्या कामगिरीतील त्रृटींवर चपखलपणे बोट ठेवले. ते म्हणाले, शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम आणि कृषी विद्यापीठांच्या प्राधान्यक्रमात साम्य उरलेले नाही. शेतकºयांशी संवाद साधूनच विद्यापीठांनी आपल्या संशोधनाचे प्राधान्यक्रम ठरविले पाहिजे. विद्यापीठाने विशेष पथक निर्माण करून शेतकºयांशी संवाद साधावा. प्रत्यक्ष शेतकºयांकडून त्यांच्या गरजा जाणून घेतल्यावर त्या गरजा भागविणाऱ्या संशोधनालाच प्राधान्य देण्यात यावे. शेतीतील जोखीम, निसर्गाचे धोके कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हेच कृषी विद्यापीठांचे अंतिम ध्येय असले पाहिजे. उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक योग्यप्रकारे वापर कसा करावा, शेतजमिनीचे आरोग्य कसे टिकवावे, उत्पादनाची पद्धत अद्ययावत कशी करावी आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी बोलून दाखविली.यवतमाळात सुरू झालेले हे महाविद्यालय विदर्भातील पहिले आणि एकमेव कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आहे. येथे कृषी जैवतंत्रज्ञानाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी नक्कीच आपल्या शेतकºयांना परवडणारे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे निर्माण करतील. फवारणीदरम्यान विदर्भात अनेकांचे मृत्यू झाले. आपले विद्यार्थी यावरही नक्कीच उपाय शोधतील, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला.वातावरणातील बदलाचे शेतीवर, अन्न व्यवस्थेवर आणि ग्रामीण जनजीवनावर विपरित परिणाम होत आहेत. दुष्काळ, महापूर अशा स्वरुपात वातावरणातील बदलांचे दृश्य परिणाम दिसत आहेत. त्याचे शेतीवरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या विविध प्रयोगांचे मांडले प्रदर्शनयावेळी महाविद्यालयात कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यात शेतकऱ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना स्थान देण्यात आले होते. वरूडचे (ता. राळेगाव) सुभाषचंद्र ठाकरे आणि त्यांचा मुलगा सौरभ ठाकरे यांनी तयार केलेले स्वयंचलित फवारणी यंत्र लक्षवेधी ठरले. तर बोंडअळीने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले वाण पाहण्यासाठी गर्दी केली. यवतमाळच्या लक्ष्मीनगरातील संदीप लोंदे आणि कुणाल लोंदे यांनी मशरूम शेतीचा प्रयोग प्रदर्शनात ठेवला होता. कॅन्सरवर मात करणाऱ्या वालाची जातही येथे शेतकºयांना बघता आली. अनुदानावरील दालमिल, सबजी कटर यंत्र, सीताफळ आणि त्याचा गर वेगळा करणाºया मशीनसह पॉली हाऊसही प्रदर्शनात ठेवले होते.