शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

शेतकरी-शास्त्रज्ञांतील संपर्क, संवादच हरविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:20 IST

महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांच्यात संवादच नसल्याची खंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. देअर इज टोटल डिसकनेक्ट बिटष्ट्वीन प्रायोरिटीज आॅफ फार्मर्स अँड युनिव्हर्सिटी, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देराज्यपालांची खंत : वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांच्यात संवादच नसल्याची खंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. देअर इज टोटल डिसकनेक्ट बिटष्ट्वीन प्रायोरिटीज आॅफ फार्मर्स अँड युनिव्हर्सिटी, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सुसज्ज इमारतीचे लोकार्पण बुधवारी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कुलपती या नात्याने त्यांनी कृषी विद्यापीठांच्या कामगिरीतील त्रृटींवर चपखलपणे बोट ठेवले. ते म्हणाले, शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम आणि कृषी विद्यापीठांच्या प्राधान्यक्रमात साम्य उरलेले नाही. शेतकºयांशी संवाद साधूनच विद्यापीठांनी आपल्या संशोधनाचे प्राधान्यक्रम ठरविले पाहिजे. विद्यापीठाने विशेष पथक निर्माण करून शेतकºयांशी संवाद साधावा. प्रत्यक्ष शेतकºयांकडून त्यांच्या गरजा जाणून घेतल्यावर त्या गरजा भागविणाऱ्या संशोधनालाच प्राधान्य देण्यात यावे. शेतीतील जोखीम, निसर्गाचे धोके कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हेच कृषी विद्यापीठांचे अंतिम ध्येय असले पाहिजे. उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक योग्यप्रकारे वापर कसा करावा, शेतजमिनीचे आरोग्य कसे टिकवावे, उत्पादनाची पद्धत अद्ययावत कशी करावी आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी बोलून दाखविली.यवतमाळात सुरू झालेले हे महाविद्यालय विदर्भातील पहिले आणि एकमेव कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आहे. येथे कृषी जैवतंत्रज्ञानाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी नक्कीच आपल्या शेतकºयांना परवडणारे जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे निर्माण करतील. फवारणीदरम्यान विदर्भात अनेकांचे मृत्यू झाले. आपले विद्यार्थी यावरही नक्कीच उपाय शोधतील, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला.वातावरणातील बदलाचे शेतीवर, अन्न व्यवस्थेवर आणि ग्रामीण जनजीवनावर विपरित परिणाम होत आहेत. दुष्काळ, महापूर अशा स्वरुपात वातावरणातील बदलांचे दृश्य परिणाम दिसत आहेत. त्याचे शेतीवरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची गरज आहे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या विविध प्रयोगांचे मांडले प्रदर्शनयावेळी महाविद्यालयात कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यात शेतकऱ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना स्थान देण्यात आले होते. वरूडचे (ता. राळेगाव) सुभाषचंद्र ठाकरे आणि त्यांचा मुलगा सौरभ ठाकरे यांनी तयार केलेले स्वयंचलित फवारणी यंत्र लक्षवेधी ठरले. तर बोंडअळीने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले वाण पाहण्यासाठी गर्दी केली. यवतमाळच्या लक्ष्मीनगरातील संदीप लोंदे आणि कुणाल लोंदे यांनी मशरूम शेतीचा प्रयोग प्रदर्शनात ठेवला होता. कॅन्सरवर मात करणाऱ्या वालाची जातही येथे शेतकºयांना बघता आली. अनुदानावरील दालमिल, सबजी कटर यंत्र, सीताफळ आणि त्याचा गर वेगळा करणाºया मशीनसह पॉली हाऊसही प्रदर्शनात ठेवले होते.