शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांची भिस्त आता खरिपातील कपाशी अन् सोयाबीनवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 05:00 IST

तालुक्यात आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीच्या पिकाचे आहे. १७ हजार १९१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. केवळ २५७ हेक्टरवरच मुगाची लागवड करण्यात आली. २२५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. २५० हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी यावर्षी  तालुक्यात अर्ध्यावर आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कल कपाशी आणि सोयाबीनकडे दिसून येत आहे.

प्रकाश सातघरेलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यात खरिपाच्या ९५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यावेळी पाऊस उशिरा आल्यामुळे  शेतकऱ्यांनी मूग, ज्वारी, उडदाच्या पिकाकडे पाठ फिरविली आहे. आता त्यांची सर्व भिस्त कपाशी आणि सोयाबीनवर अवलंबून आहे.तालुक्यात आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीच्या पिकाचे आहे. १७ हजार १९१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. केवळ २५७ हेक्टरवरच मुगाची लागवड करण्यात आली. २२५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. २५० हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी यावर्षी  तालुक्यात अर्ध्यावर आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कल कपाशी आणि सोयाबीनकडे दिसून येत आहे. सोयाबीनपेक्षा तब्बल दोन हजार हेक्टर क्षेत्रात जादाची कपाशी लागवड करण्यात आली आहे. 

पावसामुळे मूग, उडीद, ज्वारीचे क्षेत्र घटलेमागीलवर्षी मूग, उडदाची लागवड जास्त करण्यात आली होती. यावर्षी ती  अर्ध्यापेक्षा कमी करण्यात  आली. ज्वारीची लागवड ५०० हेक्टरवर झाली होती. यंदा ती २२५ हेक्टरवर आली आहे. शेतकऱ्यांनी  कापूस आणि सोयाबीनला महत्त्व दिले आहे.

तालुक्यात ९५ टक्के पेरणी पूर्णसद्यस्थितीत जवळपास ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली. कपाशी, तूर व सोयाबीन पीक समाधानकारक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशी पिकाचा पेरा वाढलेला दिसतो. पावसाच्या उशिरा आगमनामुळे मूग, उडीद, ज्वारी पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. सोयाबीन पिकाबाबतीत ज्या शेतात पाणी साचत असेल, अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी सरी काढावी.- अर्जुन जाधव, मंडळ कृषी अधिकारी, दिग्रस

३७ हजार ५८८ हेक्टरवर पेरा- उशिरा पावसामुळे सुरुवातीला पेरण्या खोळंबल्या होत्या. तालुक्यात खरिपाच्या पेरणीसाठी तयार केलेले क्षेत्रापैकी आत्तापर्यंत ३७ हजार ५८८ हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहे. - यावेळी पावसाने दांडी मारल्याने अनेकांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. आता जोरदार पाऊस पडत असल्याने अनेकांच्या पिकांना मार बसला आहे. - शेतात पाणी जमा झाल्याने पिके पाण्यात सापडली आहे. एकंदरीत यावर्षी शेतकऱ्यांना शेती करताना मोठी कसरत करावी लागत आहे. आता अतिवृष्टीने तडाखा दिल्याने पिके पुन्हा संकटात सापडली आहे. 

शेतकऱ्यांची प्रतिक्रियामूग, उडीद आणि ज्वारी या पिकांना ठराविक काळात पाणी लागते. अनियमित पावसामुळे पिके बरोबर येत नाही. पिकांना जंगली जनावरांचा मोठा त्रास असतो. रानडुक्कर, रोही उभी ज्वारी नेस्तनाबूत करतात. दुसरीकडे मजुरांची कमतरता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे.  सोयाबीन आणि कापसाला भाव चांगले असल्यामुळे यावर्षी या पिकांकडे जादा कल आहे.- सुभाष राठोड, विठाळा

नगदी पीक म्हणून कापूस, सोयाबीन या पिकाला अधिक महत्त्व दिले जाते. उडीद, मूग आणि ज्वारीला या पिकाला मजूर लागते. ते वेळवर भेटत नाही. त्यामुळे हे पीक घेण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करते. हे पीक मेहनतीला पुरत नाही. भाव कमी राहतात. त्यामुळे कापूस, सोयाबीनला पसंती दिली आहे.- शंकर भालेराव, फेटरी

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती