शेतकऱ्यांची महागाव कृषी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:00:16+5:30
२०१९ मध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा उतरविला. अनेकांनी सोयाबीनचासुद्धा विमा उतरविला होता. गेल्यावर्षी दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे दावे दाखल केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकाचा विमा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळाला. मात्र कपाशीची विमा रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

शेतकऱ्यांची महागाव कृषी कार्यालयावर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील अनेक शेतकरी कोरोना संकटाशी लढा देत आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्यापही २०१९ मधील खरीप हंगामातील कपाशीची नुकसान भरपाईमिळाली नाही. शेकडो शेतकरी विम्यापासून वंचित आहे. त्यांनी गुरुवारी कृषी कार्यालयावर धडक दिली.
२०१९ मध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी पिकाचा विमा उतरविला. अनेकांनी सोयाबीनचासुद्धा विमा उतरविला होता. गेल्यावर्षी दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीकडे दावे दाखल केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकाचा विमा मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळाला. मात्र कपाशीची विमा रक्कम अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.
गेल्या वर्षी खरिपात २७ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. ३७ हजार शेतकºयांनी लागवड केली होती. शेतकऱ्यांनी सोयाबीनचा प्रतिहेक्टर ३६० तर कपाशीचा प्रतिहेक्टर १५०० रुपयांप्रमाणे विमा हप्ता भरला. शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा हप्ता जमा केला. मात्र अनेक शेतकऱ्यांना कपाशीचा विमा मिळालाच नाही. यामुळे उटी येथील प्रकाश वानखेडे, मुकुंद गावंडे, गजानन वानखेडे, बापुराव वानखेडे, नत्थू मोरे, शांता धनगर, दत्ता वानखेडे, अशोक गावंडे, विजय वानखेडे आदींनी गुरूवारी कृषी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी विमा लाभ देण्याची मागणी लावून धरली.
जिल्हा बँकेचा कोड बदलल्याने झाला विलंब
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोड बदलल्याने विमा मिळण्यास विलंब होत असल्याचे जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी सुरेश भरवाडे यांनी सांगितले. कंपनीकडून त्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. महागाव शाखेची ८११ शेतकऱ्यांची यादी सादर केली आहे. लवकरच त्यांच्या खात्यात विमा अनुदानाचे पैसे जमा होईल, असे भरवाडे यांनी सांगितले. विमा प्रतिनिधी गुणवंत राठोड यांनी आपला विमा कंपनीसोबतचा करार जुलैमध्ये संपुष्टात आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी विम्यासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे विचारपूस करावे, असे स्पष्ट केले.