शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

शेतकऱ्यांनो लगेच पेरणी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM

सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे कापसाची लवकर लागवड केली तर कापसाला बोंडसडीचाही धोका आहे. मान्सूनपूर्व लागवडीने गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे.

ठळक मुद्देकृषितज्ज्ञांचा सल्ला : पावसाला पडणार खंड

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहे. हा पाऊस मान्सूनचा नसल्याने मध्ये मोठा खंड आहे. अशा स्थितीत झालेली टोबणी उलटण्याचा धोका आहे. यामुळे तूर्त शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवाव्या, असा सल्लापेरणी करण्यासाठी किमान १०० मिमी पावसाची गरज असते. १०० मिमी पाऊस बरसल्यानंतर केलेली पेरणी पावसाचा विलंब झाला तरी सुरक्षित अंकुरते. मात्र जिल्ह्यात जेमतेम १६ मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने ११ जूनपर्यंत पावसाचा खंड सांगितला आहे. या काळात उन तापणार आहे. यामुळे अंकुरलेले बियाणे अपुऱ्या पावसाने करपण्याचा अधिक धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये. १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे कापसाची लवकर लागवड केली तर कापसाला बोंडसडीचाही धोका आहे. मान्सूनपूर्व लागवडीने गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे.सध्याचा पाऊस मान्सूनपूर्व आहे. चक्रीवादळाने त्यात भर घातली. हा पाऊस पेरणीचा समजून काहींनी पेरणीला सुरूवात केली. मुळात हा पाऊस मान्सूनचा नाही. त्याला १७ जूनपर्यंत विलंब आहे. तूर्त शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.- पंकज बर्डे, प्रभारी, कृषी विकास अधिकारी, यवतमाळमान्सूनपूर्व कपाशीची लागवड शेतकऱ्यांना संकटात टाकणारी ठरू शकते. पावसाचा खंड असल्याने पेरणी उलटू शकते. यामुळे तूर्त शेतकºयांनी पेरणी थांबवावी. जांभुळवाई करून १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी.- डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संचालक (संशोधन) केव्हीके, यवतमाळ.वेधशाळेने ११ जूनपर्यंत पावसात खंड सांगितला आहे. शेतशिवारात १६ मिमी पावसाची नोंद आहे. अशा स्थितीत पेरणी करणे धोक्याचे आहे. १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती