शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा नेते गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
2
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
3
"माझ्या नादाला लागाल तर..." ठाण्याच्या माजी महापौरांची आगरी समाजाविषयी कथित ऑडिओ क्लीप चर्चेत, षड्यंत्र असल्याचा आरोप
4
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
5
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
6
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
7
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
8
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
9
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
10
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
11
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
12
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
13
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
14
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
15
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
16
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
17
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
18
उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!
19
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
20
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावात शेतकऱ्यांचा कल खासगी खरेदीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

खासगी खरेदी शुक्रवारपर्यंत ८० हजार क्विंटल झाली. राळेगाव ७३ हजार, वाढोणाबाजार सहा हजार आणि खैरी येथे २६० क्विंटल कापूस खरेदी झाला. त्या तुलनेत सीसीआयला पहिल्या पाच दिवसात केवळ १२ हजार क्विंटल कापूस खरेदीत मिळाला आहे. राळेगावमध्ये तीन हजार, वाढोणा तीन हजार ८०० आणि खैरी पाच हजार क्विंटल कापूस खरेदी झाला. राळेगावात सात, वाढोणाबाजार तीन, खैरी येथे एक व्यापारी खरेदीत उतरले आहे.

ठळक मुद्देखासगी खरेदी ८० हजार क्विंटल : सीसीआयकडे केवळ १२ हजार क्विंटल

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राळेगाव, वाढोणाबाजार व खैरी येथील मार्केट यार्डवरील खासगी कापूस खरेदीत सद्यस्थितीत चार हजार ७०० ते पाच हजार रुपयांपर्यंतचे दर शेतकऱ्यांना मिळत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारितील सीसीआयची खरेदी तालुक्यात राळेगाव, वाढोणाबाजार व खैरी येथे सुरू झाली आहे.खासगी खरेदी शुक्रवारपर्यंत ८० हजार क्विंटल झाली. राळेगाव ७३ हजार, वाढोणाबाजार सहा हजार आणि खैरी येथे २६० क्विंटल कापूस खरेदी झाला. त्या तुलनेत सीसीआयला पहिल्या पाच दिवसात केवळ १२ हजार क्विंटल कापूस खरेदीत मिळाला आहे. राळेगावमध्ये तीन हजार, वाढोणा तीन हजार ८०० आणि खैरी पाच हजार क्विंटल कापूस खरेदी झाला. राळेगावात सात, वाढोणाबाजार तीन, खैरी येथे एक व्यापारी खरेदीत उतरले आहे.राळेगावला दररोज सरासरी पाच-सात हजार, वाढोणात एक हजार क्विंटल कापूस खासगीत खरेदी केला जात आहे. खासगीत खरेदीच्या तुलनेत सीसीआयची खरेदी केवळ १२-१३ टक्के एवढीच आहे. खासगीत कापूस विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटल मागे ५०० ते ८०० रुपये नुकसान होत आहे. त्यात नगदी पैसे, आत्ताच पाहिजे या आग्रहामुळे ते स्वत:चे फार मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेत असल्याचे मार्केटमध्ये फेरफटका मारला असता चर्चेअंती समजले.बाजार समिती व सीसीआयकडून अपेक्षासीसीआयला कापूस विकू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकरिता मार्केट यार्डवर बाजार समितीने वेगळे ठिकाण वाहन व बैलबंड्यांकरिता राखून ठेवण्याची गरज आहे. त्यातच समितीने शेतकऱ्यांचा कापसाचा ओलावा (मॉइश्चर) मोजून तो प्रमाणित प्रतीवर उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले. सीसीआयनेही १२ टक्के ओलाव्याची अट दरवेळी धरून न ठेवता शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता ठेवावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही अट थोडीफार शिथील करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी त्याकरिता आवाज उचलण्याची गरजही व्यक्त होत आहे. मार्केट यार्डात व्यापाºयांच्या गराड्यात सीसीआयला शोधणे कठीण जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड