शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नाल्याच्या पुरात शेतकरी वाहून गेला; मृतदेह घेऊन गावकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2022 14:06 IST

लाकडी येथील पुलाची उंची वाढविण्याचे आश्वासन

वडकी (यवतमाळ) : नाल्यावरील पूल ठेंगणा असल्यामुळेच वृद्ध शेतकऱ्याचा वाहून गेल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी मंगळवारी वडकी येथे तब्बल दोन तास रास्ता रोको केला. पूल बांधण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे वडकी-यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

राळेगाव तालुक्यातील लाडकी येथील अण्णाजी बाळकृष्ण गुडदे (६०) हे सोमवारी वडकी येथून गावी लाडकी येथे निघाले होते. नाला पार करीत असताना ते वाहून गेले. मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह दगडाला अडकून असलेला आढळला. मृतदेह बाहेर काढून नागरिक थेट वडकी-यवतमाळ मार्गावर पोहोचले. खडकी टोल नाक्याजवळ त्यांनी आंदोलन सुरू केले.

पूल बांधण्याचे ठोस आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अभियंता अनिल तोडे, किशोर नागरे, अली शेख हे आंदोलन स्थळी पोहोचले. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत पुलाचे बांधकाम केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी राळेगावचे तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे, नायब तहसीलदार दिलीप बदकी, ठाणेदार संजय चोबे, ठाणेदार विनायक जाधव, मंडळ अधिकारी पोटे, महादेव सानप, तलाठी गिरीष खडसे आदी उपस्थित होते.

पाण्याचा अंदाज आला नाही

वडकी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. नदी-नाल्यांना पूर गेले. लाडकी येथील नाल्यालाही पाणी चढले होते. याचा अंदाज न आल्याने अण्णाजी गुडदे यांनी वाट काढण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीDeathमृत्यूYavatmalयवतमाळ