परतीच्या पावसाने उमरखेड तालुक्यात अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:14+5:30
यावर्षी पाऊस लांबल्याने सोयाबीन काढणीची वेळही लांबली होती. आता सोयाबीन हाताशी आलेले असताना परतीचा पाऊस अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीनला कोंबे फुटली आहे. कपाशीची बोंडे सडली आहे. हरभराही करपून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने उमरखेड तालुक्यात अतोनात नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : जून, जुलैपेक्षाही गेल्या चार दिवसात तालुक्यात परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हाताशी आलेले सोयाबीनचे पीक निसर्गाने हिरावून घेतले. शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरश: संकटात सापडली. अखेर नवनिर्वाचित आमदार नामदेव ससाने यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात नुकसानीची पाहणी केली. भरपाईचा प्रश्न तातडीने मुख्यमंत्र्यांकडे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी पाऊस लांबल्याने सोयाबीन काढणीची वेळही लांबली होती. आता सोयाबीन हाताशी आलेले असताना परतीचा पाऊस अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीनला कोंबे फुटली आहे. कपाशीची बोंडे सडली आहे. हरभराही करपून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
विडूळ, चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, कारखेड आणि देवसरी आदी गावातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार नामदेव ससाने यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, महेश काळेश्वरकर चालगणी सरपंच विजय सातलवाड, देवसरी सरपंच गजानन देवसरकर, पोलीस पाटील प्रमोद कदम, संचालक त्र्यंबक थोटे, साखरा सरपंच परसराम वानखेडे, प्रदीप देवसरकर, सुदर्शन रावते, अशोक थोटे, तलाठी जी.जी. क्षीरसागर, सुदर्शन माने, कृषी सहायक जी.एन. बिरमवार, संजय देशमुख, गुलाब सूर्यवंशी उपस्थित होते. चालगणी शिवारातील प्रयागबाई शिंदे यांच्या शेताची पाहणी केली.
विडूळ येथील अत्यल्पभूधारक विधवा शेतकरी अर्चना यादव पहूरकर यांच्या घरी आमदारांनी भेट दिली. पावसामुळे त्यांचे सोयाबीन पूर्णत: पाण्याखाली आल्याने हे कुटुंब हतबल झाले आहे. या बहिणीला आमदार ससाने यांनी साडीचोळी देऊन शासनाकडून लवकरच अनुदान मिळवून देण्याचा शब्द दिला.
या भेटीत महसूल, कृषी व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी मात्र गैरहजर होते. सलग सुट्यांमुळे नुकसानीचे सर्वेक्षण लांबत असल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला. कर्मचारी सुटीवर असले तरी नुकसानीचा पाहणी अहवाल तातडीने केल्या जाईल. त्यासाठी संबंधित कर्मचाºयांना सूचना दिल्याचे तहसीलदार रुपेश खंडारे यांनी सांगितले.