शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्या; ४५ टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:17 IST

Yavatmal : मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा परिवर्तन शेतकरी संघटनेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : नाफेडच्या सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने हजारो शेतकरी चिंतेत सापडले आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यायचे सोडून आतापर्यंत सोयाबीन खरेदीला तीन वेळा मुदतवाढ दिल्याचे सांगून हात झटकले. त्यामुळे परिवर्तन शेतकरी संघटना आक्रमक झाली.

राज्यात नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू होती. ६ फेब्रुवारीला सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने ऑनलाइन नोंदणी केलेल्या ४५ टक्के शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत आहे. मुदतवाढ न दिल्यास मंत्रालयासमोर सोयाबीन फेकले जाईल, असा इशारा मनोहर राठोड यांनी दिला. 

सोयाबीन विकायचे कुठे?राज्याचे सोयाबीन उत्पादन हे ६० ते ६५ लाख मॅट्रिक टन आहे. सरकार १३ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे तर आतापर्यंत केवळ ७ ते ८ लाख मेट्रिक टनच खरेदी झाली आहे. शिल्लक सोयाबीन शेतकऱ्यांनी कुठे विकायचे, असा सवाल करण्यात आला आहे. बारदाण्याच्या नावाने व्यापाऱ्यांचे सोयाबीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला. 

पणनमंत्र्यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये रोषपणन मंत्री जयकुमार रावल मात्र इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात ७ लाख ६४ हजार ७३१ शेतकऱ्यांपैकी ३ लाख ६९ हजार ११४ शेतकऱ्यांकडून ७ लाख ८१ हजार ४४७ मॅट्रिक टन सोयाबीन खरेदी झाल्याचे आकडे सांगत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी असा सवाल केला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणे बाकी आहे. 

टॅग्स :farmingशेतीSoybeanसोयाबीनYavatmalयवतमाळ