शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

मुंबईतून आलेला मृतदेहही जेव्हा गावकऱ्यांनी नाकारला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:15 IST

आपला अंत्यविधी मूळ गावातच करा ही अंतिम इच्छा त्याने कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. ती पूर्ण करण्यासाठी त्याचा मृतदेह मंगळवारी ‘लॉकडाऊन’ भेदत हजार किलोमीटर ओलांडत गावापर्यंत आला... पण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून गावकरी म्हणाले याचा अंत्यसंस्कार आमच्या गावात होऊ देणार नाही!

ठळक मुद्दे हजार किलोमीटर प्रवास केल्यावर पुन्हा तीन गावे फिरला

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावचा पोरगा मुंबईत अधिकारी झाला, तेव्हा गावाला भरभरून आनंद झाला होता. पण आता त्याचा मृत्यू झाला अन् तो गावकऱ्यांना ‘परका’ वाटू लागला. कारण त्याचा मृत्यू झाला कोरोनाग्रस्त काळात अन् कारोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत. गावापासून दूर राहणाऱ्या या पोराच्या मनात गाव मात्र खोलवर रुजला होता. म्हणून आपला अंत्यविधी मूळ गावातच करा ही अंतिम इच्छा त्याने कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. ती पूर्ण करण्यासाठी त्याचा मृतदेह मंगळवारी ‘लॉकडाऊन’ भेदत हजार किलोमीटर ओलांडत गावापर्यंत आला... पण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून गावकरी म्हणाले याचा अंत्यसंस्कार आमच्या गावात होऊ देणार नाही! मग मृतदेह जवळच्याच काकाच्या गावात नेण्यात आला. तेथेही अंत्यसंस्काराला नकार मिळाला.. शेवटी कसाबसा यवतमाळात अंत्यविधी उरकून कुटुंबीय रडले... गेलेल्या माणसासाठी अन् संपलेल्या माणुसकीसाठी!कोरोनाच्या विषाणूपेक्षाही जास्त वेगाने भीतीचा विषाणू पसरत आहे. त्याचे हे कडवे सत्य उदाहरण घडले पांढरकवडा तालुक्यातील वागदा गावात. या गावातील तुळशीराम उकंडा राठोड हा तरुण काही वर्षांपूर्वी मुंबईला नोकरीसाठी गेला. नगररचनाकार (टाऊन प्लॅनर) या अधिकारी पदावर त्यांची कारकीर्द बहरली होती. पण अचानक सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. आपल्या पार्थिवावर मूळगावातच अंत्यसंस्कार व्हावे, ही त्यांची अंतिम इच्छा होती. म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह मुंबईतून वागद्यात आणण्याची तयारी केली. परंतु कोरोनाच्या या काळात त्यांचा मृतदेह घेऊन गावापर्यंत येणे हेही महाकठीण काम होते. शेवटी आवश्यक त्या परवानग्या काढून रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह पांढरकवडा तालुक्यातील वागदा येथे नेण्याचे ठरले.

गावकऱ्यांची सावधगिरीची भूमिकासर्वत्र सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने लॉकडाऊन असल्यामुळे गावागावात काळजी घेतली जात आहे. मृतदेह घेऊन येत असलेल्या राठोड कुटुंबीयांनी ‘आम्ही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वागदा येथे घेऊन येत असल्याची’ माहिती वागदा येथील नातेवाईकांना दिली. त्यानंतर गावात चर्चा झाली. चर्चेअंती गावातील लोकांनी ‘आम्ही येथे अंत्यसंस्कार करू देणार नाही’, अशी भूमिका घेतली. गावात वाद नको म्हणून राठोड कुटुंबीयांनी घाटंजी तालुक्यातील जरंग या आपल्या काकाच्या गावात अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. जरंग येथील नातेवाईकांना याबाबत विचारणा करण्यात आली. परंतु तेथील गावकऱ्यांनीही आपल्या गावात अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर तुळशीराम राठोड यांचा मृतदेह मुंबईवरून सकाळी यवतमाळला आणण्यात आला. दर्डानगरात फ्लॅट असलेल्या इमारतीजवळ काही काळ ही रूग्णवाहिका उभी राहिली. त्यानंतर यवतमाळ येथेच त्यांच्या मृतदेहावर मंगळवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहराचे ‘प्लॅनिंग’, पण गावात मिळाली नाही ‘जागा’तुळशीराम राठोड मुंबई महापालिकेत टाऊन प्लॅनर (नगररचनाकार) होते. मुंबईसारख्या महानगरातील नगरांचे ‘प्लॅनिंग’ त्यांच्याकडे होते. मात्र या कामाच्या निमित्ताने ते आपल्या वागदा या मूळगावापासून दूर झाले. महानगराचे प्लॅनिंग करताना ते वागदा गावातील नाते घट्ट करू शकले नाहीत. त्यामुळे ‘शहरी’ मृतदेह गावकऱ्यांनी नाकारला. तुळशीराम राठोड यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला. पण मुंबईतील कोरोनाचे भयावह वातावरण पाहून गावकऱ्यांनी या मृतदेहाला आपल्या गावात जागा दिली नाही.

तुळशीराम राठोड यांच्या पार्थिवावर वागदा येथे अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांच्याच काकाचे गाव असलेल्या जरंग येथे अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. परंतु तेथील गावकऱ्यांनीही नकार दिला. मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीमुळे सावधगिरी म्हणून गावकऱ्यांनी अशी भूमिका घेतली.- बाळकृष्ण राठोड,पोलीस पाटील, वागदा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस