शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या खर्चानंतरही जिल्हा अद्याप तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

पाणीटंचाई संपावी आणि भूजलस्रोतात वाढ व्हावी म्हणून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. त्यावर ५०० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला. तरीही जिल्ह्यातील पाणीटंचाई संपली नाही. जल प्रकल्पातून १८ टक्क्यांच्या वर सिंचन झाले नाही. नियोजनाचा अभाव आणि दुर्लक्षित धोरणामुळे हमखास पाऊस बरसणारा प्रांत जलसंपत्ती विपुल असतानाही दुष्काळाच्या झळा सोसत आहे.

ठळक मुद्देमुबलक पाऊस बरसणाऱ्या प्रांतात सतत दुष्काळ, ओलीत अपुरेच

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुबलक पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात पावसाचा प्रत्येक थेंब साचून राहावा म्हणून सिंचन प्रकल्प उभे झाले. पाणीटंचाई संपावी आणि भूजलस्रोतात वाढ व्हावी म्हणून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. त्यावर ५०० कोटींपेक्षा अधिक खर्च झाला. तरीही जिल्ह्यातील पाणीटंचाई संपली नाही. जल प्रकल्पातून १८ टक्क्यांच्या वर सिंचन झाले नाही. नियोजनाचा अभाव आणि दुर्लक्षित धोरणामुळे हमखास पाऊस बरसणारा प्रांत जलसंपत्ती विपुल असतानाही दुष्काळाच्या झळा सोसत आहे. २२ मार्च रोजी जलदिन साजरा होत असताना जिल्ह्यातील ही भयावह स्थिती समोर आली. यवतमाळ जिल्हा नैसर्गिक वनसंपदेने नटलेला आहे. जिल्ह्यात सतत पाऊस बरसतो. सह्याद्री पर्वतरांगेच्या शेवटच्या टोकावर असलेला हा जिल्हा पावसाचे ढग  रोखण्यसाठी पोषक वातावरण तयार करतो. यातून जिल्ह्यात मुबलक पाऊस बरसतो. मात्र, बरसलेला पाऊस साठवला जात नाही. तो मुरविण्यासाठी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योेजना आणण्यात आली. गाव, वाडे, वस्ती, पोड शिवारात नाले, ओढे आणि नदीचे पात्र खोल करण्यात आले. यावर ५५० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली. यानंतरही जिल्ह्यात पाणीटंचाईचा  प्रश्न कायम आहे. दरवर्षी टँकर लागतात. विहीर अधिग्रहित करावी लागते. केवळ उन्हाळ्याचा खर्च किमान ५ ते १० कोटींच्या घरात जातो. जिल्ह्यातील ५५० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. ६० ते ७० हजार लोक दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करतात. पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. हे चित्र अजूनही बदलले नाही. याउलट दरवर्षी पाण्याचा भूजलस्रोत खाली जात आहे. भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. ही झीज भरून काढण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम पाहिजे तसे होत नाही. परिणामी पावसाचे पाणी वाहून जाते. ते जमिनीत मुरतच नाही. जिल्ह्यातील लहान-मोठे प्रकल्प ठरले पांढरा हत्ती जिल्ह्यात मोठे, मध्यम, छोटे, असे २५० च्या जवळपास प्रकल्प आणि पाझर तलाव आहेत. याठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होतो. मात्र, उन्हाळ्यात हे प्रकल्प तळ गाठतात. प्रकल्पातून कार्यक्षेत्रात पाणी पोहोचविण्यासाठी कॅनॉलची रचना आहे. मात्र, शेवटच्या टाेकापर्यंत पाणी जात नाही. यामुळे कोट्ट्यवधींचा खर्च झाल्यानंतरही हे जल प्रकल्प पांढरा हत्ती ठरले आहेत. प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने अद्याप ओलीत होत नाही. ही जिल्ह्याची शाेकांतिका म्हणावी लागेल. जलयुक्त शिवार योजना राबवूनही जमिनीत पाणी मुरलेच नाही. मात्र या योजनेवरील कोट्यवधींचा खर्च मुरविण्यात यंत्रणा यशस्वी झाली. 

 

टॅग्स :Waterपाणी