शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

वणी, शिरपूर पोलिसांची अखेर एसपींपुढे पेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 9:46 PM

चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदाणीतील कोळसा चोरी प्रकरणात वसुलीची महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे पेशी झाली.

ठळक मुद्देकारवाईवर नजरा : पैनगंगा खाणीतील कोळसा चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदाणीतील कोळसा चोरी प्रकरणात वसुलीची महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे पेशी झाली.यातील एक कर्मचारी वणी ठाण्याचा तर दुसरे दोघे शिरपूर ठाण्यातील आहेत. एसपींनी त्यांची चोरीतील कोळसा वाहतुकीतून होणाऱ्या वसुली प्रकरणात झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते. पेशी झालेल्या शिरपूरच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक जण चोरीतील आरोपी पळून गेल्याच्या कारणावरुन काही महिन्यांपूर्वी निलंबित झाला होता. मात्र त्याने जोरदार मोर्चेबांधणी करून पुन्हा शिरपूर पोलीस ठाणे मिळविण्यात यश प्राप्त केले. वणी व शिरपूरसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेहमीच प्रचंड धडपड, रस्सीखेच पहायला मिळते. अनेकदा रॉयल्टीचा मार्गही वापरला जातो. या मागे या दोन ठाण्यांमागे होणारी सर्वाधिक आर्थिक उलाढाल हे प्रमुख कारण सांगितले जाते. जिल्ह्यात वणी हे वरकमाईत पहिल्या क्रमांकाचे तर शिरपूर दुसऱ्या क्रमांकाचे ठाणे मानले जाते. त्यामुळेच यवतमाळ जिल्ह्यात नियुक्ती होताच पोलीस अधिकाऱ्यांना वणी, शिरपूरची स्वप्ने पडू लागतात.पैनगंगा खाणीतून दरदिवशी चोरट्या मार्गाने दहा ते पंधरा ट्रक कोळसा शिरपूर मार्गे वणीत लालपुलिया भागात आणला जातो. तेथून या कोळशाची विल्हेवाट लावली जाते. बाजारभावाने आठ लाख रुपये किंमत असलेला हा कोळशाचा ट्रक दोन नंबरमध्ये साडेतीन ते चार लाखांत विकला जातो. या माध्यमातून दरदिवशी केवळ कोळशाची उलाढाल ५० ते ७५ लाखांच्या घरात जाते. त्याचे लाभार्थीही अनेक आहेत. म्हणूनच या व्यवहारातील वसुलीची जबाबदारी सांभाळणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना एसपींनी पाचारण केले होते. आता त्यांच्यावर व त्यांच्या वरिष्ठांवर काही कारवाई होते का याकडे लक्ष लागले आहे. कारवाई न झाल्यास ही पेशी वांझोटी ठरणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस