शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहरातील पुतळ्यांसमोर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:43 IST

फोटो पुसद : नगर परिषदेने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढून एक आठवडा उलटला. मात्र, पुन्हा तेथे अतिक्रमण करण्यात ...

फोटो

पुसद : नगर परिषदेने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढून एक आठवडा उलटला. मात्र, पुन्हा तेथे अतिक्रमण करण्यात आले. याच्या निषेधार्ह अखिल भारतीय समता परिषदेने सर्व पुतळ्यांसमोर भाजीपाला व फळ विक्रीचे हातगाडे लावून निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात रस्ते, जागा शिल्लक असताना मुद्दाम महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरच अतिक्रमण करण्यात आले. यामुळे पुतळ्याची वारंवार विटंबना होत आहे. नगर परिषदेकडून त्याला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केला आहे.

मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांना अतिक्रमण काढण्याची विनंती केली. मात्र, अद्याप अतिक्रमण काढण्यात आले नाही. रस्त्यावर अतिक्रमण करून भाजीपाला व फळे विकणारे मास्क वापरत नाहीत. सामाजिक अंतर ठेवत नाहीत. कोरोनाविषयी काळजी घेत नाही. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच आरोपही त्यांनी केला. काही लोकप्रतिनिधी अतिक्रमण करणाऱ्यांच्या पाठीशी असल्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप आत्माराम जाधव यांनी केला.

महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर अतिक्रमण करणारा फळविक्रेता नगर परिषद, महसूल, पोलीस प्रशासन आणि नागरिकांना वरचढ ठरत आहे. या कृतीच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आंदोलनाची हाक दिली आहे.

बॉक्स

सर्व पुतळ्यांसमोर दुकाने लावणार

आता समता परिषदेने धरणे किंवा उपोषण न करता संचारबंदी संपल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक, महात्मा गांधी, बाबासाहेब मुखरे, सुभाषचंद्र बोस आदींच्या पुतळ्यासमोरच भाजीपाला, फळे आदींचे गाडे लावण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी गरीब नागरिकांना व्यवसाय सुरू करून देण्याचे नियोजन केले. महात्मा फुले पुतळ्यासमोरील अतिक्रमण मुख्याधिकारी, नगरसेवक, आमदार, महसूल व पोलीस प्रशासन यांना मान्य असेल, तर त्यांनी आमचे अतिक्रमण मान्य करावे व आम्ही करणार असलेले अतिक्रमण काढू नये, त्यालाही संरक्षण द्यावे, अशी मागणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केली.

आता समता परिषदेने धरणे किंवा उपोषण न करता संचारबंदी संपल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक, महात्मा गांधी, बाबासाहेब मुखरे, सुभाषचंद्र बोस आदींच्या पुतळ्यासमोरच भाजीपाला, फळे आदींचे गाडे लावण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी गरीब नागरिकांना व्यवसाय सुरू करून देण्याचे नियोजन केले. महात्मा फुले पुतळ्यासमोरील अतिक्रमण मुख्याधिकारी, नगरसेवक, आमदार, महसूल व पोलीस प्रशासन यांना मान्य असेल, तर त्यांनी आमचे अतिक्रमण मान्य करावे व आम्ही करणार असलेले अतिक्रमण काढू नये, त्यालाही संरक्षण द्यावे, अशी मागणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केली.