शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

पुसद शहरातील पुतळ्यांसमोर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:43 AM

फोटो पुसद : नगर परिषदेने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढून एक आठवडा उलटला. मात्र, पुन्हा तेथे अतिक्रमण करण्यात ...

फोटो

पुसद : नगर परिषदेने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढून एक आठवडा उलटला. मात्र, पुन्हा तेथे अतिक्रमण करण्यात आले. याच्या निषेधार्ह अखिल भारतीय समता परिषदेने सर्व पुतळ्यांसमोर भाजीपाला व फळ विक्रीचे हातगाडे लावून निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात रस्ते, जागा शिल्लक असताना मुद्दाम महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरच अतिक्रमण करण्यात आले. यामुळे पुतळ्याची वारंवार विटंबना होत आहे. नगर परिषदेकडून त्याला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केला आहे.

मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांना अतिक्रमण काढण्याची विनंती केली. मात्र, अद्याप अतिक्रमण काढण्यात आले नाही. रस्त्यावर अतिक्रमण करून भाजीपाला व फळे विकणारे मास्क वापरत नाहीत. सामाजिक अंतर ठेवत नाहीत. कोरोनाविषयी काळजी घेत नाही. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच आरोपही त्यांनी केला. काही लोकप्रतिनिधी अतिक्रमण करणाऱ्यांच्या पाठीशी असल्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप आत्माराम जाधव यांनी केला.

महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर अतिक्रमण करणारा फळविक्रेता नगर परिषद, महसूल, पोलीस प्रशासन आणि नागरिकांना वरचढ ठरत आहे. या कृतीच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आंदोलनाची हाक दिली आहे.

बॉक्स

सर्व पुतळ्यांसमोर दुकाने लावणार

आता समता परिषदेने धरणे किंवा उपोषण न करता संचारबंदी संपल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक, महात्मा गांधी, बाबासाहेब मुखरे, सुभाषचंद्र बोस आदींच्या पुतळ्यासमोरच भाजीपाला, फळे आदींचे गाडे लावण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी गरीब नागरिकांना व्यवसाय सुरू करून देण्याचे नियोजन केले. महात्मा फुले पुतळ्यासमोरील अतिक्रमण मुख्याधिकारी, नगरसेवक, आमदार, महसूल व पोलीस प्रशासन यांना मान्य असेल, तर त्यांनी आमचे अतिक्रमण मान्य करावे व आम्ही करणार असलेले अतिक्रमण काढू नये, त्यालाही संरक्षण द्यावे, अशी मागणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केली.

आता समता परिषदेने धरणे किंवा उपोषण न करता संचारबंदी संपल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक, महात्मा गांधी, बाबासाहेब मुखरे, सुभाषचंद्र बोस आदींच्या पुतळ्यासमोरच भाजीपाला, फळे आदींचे गाडे लावण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी गरीब नागरिकांना व्यवसाय सुरू करून देण्याचे नियोजन केले. महात्मा फुले पुतळ्यासमोरील अतिक्रमण मुख्याधिकारी, नगरसेवक, आमदार, महसूल व पोलीस प्रशासन यांना मान्य असेल, तर त्यांनी आमचे अतिक्रमण मान्य करावे व आम्ही करणार असलेले अतिक्रमण काढू नये, त्यालाही संरक्षण द्यावे, अशी मागणी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केली.