शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

पाणीटंचाई लढ्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:18 IST

शहरात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सर्वातोपरी प्रयत्न करीत असताना आता या लढ्यात कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे.

ठळक मुद्देएक दिवसाचे वेतन : सामाजिक संघटनांचे सहकार्य

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सर्वातोपरी प्रयत्न करीत असताना आता या लढ्यात कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे. आपले एक दिवसाचे वेतन देण्याची संमती विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तसेच नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी शहरातील सामाजिक संघटना व प्रतिष्ठीत व्यापारी-उद्योजक यांनाही मदतीचे आवाहन केले. याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून टंचाई निवारणासाठी निधी उभारला जात आहे.पाणीटंचाईचे नैसर्गिक संकट निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक व शासकीय कर्मचाºयांनी आपले उत्तरदायित्व स्वीकारण्याची हमी घेतली आहे. टंचाईची तीव्रता उपाययोजनांच्या माध्यमातून कमी करण्याकरिता नगराध्यक्ष कांचनताई बाळासाहेब चौधरी यांनी विविध सामाजिक संघटना, गावातील प्रतिष्ठीत व्यापारी, उद्योजक यांची बैठक मंगळवारी नगरपरिषदेत बोलाविली होती. यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सुभाष राय उपस्थित होते. बैठकीत शहरातील टंचाई निवारणार्थ कुठल्या उपाययोजना करता येईल यावर सकारात्मक चर्चा झाली. अनेक ज्येष्ठांनी हमखास पाण्याचे स्रोत शहर परिसरात कुठे उपलब्ध आहे, याचीही माहिती दिली. बैठकीला शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी उपस्थित होते. टंचाई निवारणासाठी नगरपरिषदेपुढे आर्थिक मर्यादा आहेत. या संकटाच्या काळात दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी नगरपरिषद कर्मचाºयांनी आपला एक दिवसाचा पगार टंचाई उपाययोजनेत देण्याची ग्वाही दिली. हीच संकल्पना घेऊन संतोष ढवळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याशी संपर्क केला. त्यांनी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. अमोलकचंद महाविद्यालयातील प्राध्यापक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (आरटीओ), माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयांतर्गत कर्मचारी व शिक्षक, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा यांच्याशी चर्चा केली. या सर्वांनी एक दिवसाचे वेतन टंचाई उपाययोजनेत देण्याचे आश्वासन दिले.याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्याकडेसुद्धा हा प्रस्ताव ठेवणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले.टंचाई उपाययोजनेसाठी एक रुपयापासून एक दिवसाच्या पगारापर्यंत मिळणारी सर्वच मदत लोकोपयोगी ठरणारी आहे. एकट्या प्रशासनावर भार टाकून हे संकट सुटणारे नाही, या भावनेतून मदतीसाठी प्रत्येक जण पुढे येत असल्याचे नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी सांगितले. तसेच नगरपरिषदेने शहरातील जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.तानाजी सावंत यांच्याकडून पाच लाखांची लोकवर्गणीयवतमाळ विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांनी शहरातील टंचाई निवारणासाठी चार महिने दोन टँकर चालविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची लोकवर्गणी देण्याची तयारी दूरध्वनीवरून दर्शविली. लवकरच हे टँकर जनतेच्या सेवेत रुजू होतील, असे शिवसेना संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी सांगितले.४५ स्वयंसेवी संस्थांची समितीयवतमाळ शहरातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी नगराध्यक्षांनी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत तब्बल ४५ स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. या संस्थांच्या मदतीने शहरात टँकरद्वारे पाणी वितरण, पाणी वाटपाचे एटीएम आणि जलस्रोताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. या स्वयंसेवी संस्थांची एक समिती तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणी